शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

घोडबंदरच्या २०६ प्रकल्पांना पाच वर्षात पाणी कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 04:12 IST

पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश दिल्यानंतर पुन्हा गेल्या पाच वर्षात या भागात किती बांधकामांना ओसी दिली

ठाणे : पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश दिल्यानंतर पुन्हा गेल्या पाच वर्षात या भागात किती बांधकामांना ओसी दिली आणि किती बांधकामांना पाणी कनेक्शन दिले याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने मागील पाच वर्षात येथे २०९ प्रकल्पांना ओसी दिली असून त्यातील २०६ प्रकल्पांना १४७८ पाण्याचे कनेक्शन दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, न्यायालयाने अद्यापही जैसे थे आदेश कायमच ठेवले आहेत. त्यामुळे स्थगिती केव्हा उठणार या प्रतिक्षेत विकासक वाट पाहत आहेत. दुसरीकडे या भागात सुरू असलेल्या नव्या तब्बल २८५ इमारतींना याचा फटका बसला आहे.जुने ठाणे अपुरे पडू लागल्याने नवे ठाणे अर्थात घोडबंदरकडे पाहिले जात आहे. मागील सात ते आठ वर्षात या भागाचा विकास झपाट्याने झाला आहे. रस्ता रुंदीकरण झाल्याने या भागात बड्या बिल्डरांनी घुसखोरीस सुरुवात केली. या परिसरात अनेक इमारती उभ्या असल्या असल्यातरी त्याठिकाणचे भाव अधिक असल्याने बहुसंख्य इमारतीमधील विक्री अभावी फ्लॅट रिमामेच आहेत. यामुळे त्यांच्या विक्रीसाठी विकासकांनी ग्राहकांना विविध योजनांचे आमिष दाखवले आहे. आजही येथील नव्याने तयार झालेल्या इमारतींमधील ४० टक्के फलॅट रिकामे आहेत.दरम्यान आता न्यायालयाने पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ९ जूनपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये असे निर्देश पालिकेला दिले होते. हे स्थगिती आदेश उठविलेले नाहीत. दुसरीकडे ओसीदेखील न देण्याचे न्यायालयाचे निर्देश असल्याने त्याचा फटका आता या भागात सुरू असलेल्या २८५ इमारतींच्या बांधकामांना बसला आहे. या बांधकामांना न्यायालयाचे पुढील निर्देश येत नाही तो पर्यंत ओसी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच या इमारतींना ओसी नाही म्हणून पाणीपुरवठा देखील न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळेच आता या इमारती उभ्या असल्या तरी पाणी नसल्याने त्यातील फ्लॅटच्या बुकिंगवर परिणाम झाला आहे.९१ दशलक्ष ली.च्या जागी ८८ दशलक्ष ली.चा पुरवठामागील पाच वर्षात घोडबंदर भागात किती प्रकल्पांना ओसी दिली आणि किती बांधकामांना पाणी कनेक्शन दिले. याची माहिती न्यायालयाने मागीतली होती. त्यानुसार या भागात मागील पाच वर्षात २०९ प्रकल्पांना ओसी दिली असून यातील २०६ प्रकल्पांना पाणी कनेक्शन दिल्याची माहिती पालिकेने न्यायालयापुढे सादर केली आहे.शिवाय नव्याने इमारती उभ्या राहत असल्या तरी येथील पाच लाख लोकसंख्येला पुरेल एवढा पुरेसा पाणीपुरवठा या घोडबंदर भागाला होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. आजघडीला या भागाता ९१ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असतांना येथे ८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.तसेच या भागातील पाणी योजना आणखी सक्षम करण्यासाठी रिमॉडेलींगची योजना आणून तिचे कामही युद्ध पातळीवर सुरू केल्याचे पालिकेने यापूर्वीच न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे भविष्यात या भागाला पाणीटंचाई भेडसावणार नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, न्यायालयाने अद्यापही स्थगिती आदेश न उठल्याने येथील २८५ इमारतींच्या बांधकामांना मात्र फटका बसला आहे.