शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

पाणी दरवाढीला आज मंजुरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:18 IST

केडीएमसी प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीत : गळती, चोरी रोखण्यात आले अपयश

कल्याण : केडीएमसी हद्दीत ३० तास पाणीकपात लागू असताना आता प्रशासनातर्फे पाणी दरवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत मांडला जाणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ समितीकडून फेटाळली जाण्याची शक्यता आहे. आधीच अपुरा पाणीपुरवठा होत असताना पाणीगळती व चोरी रोखण्यातही प्रशासनाला यश आलेले नाही. त्याकडे दुर्लक्ष करून नियमित पाणीबिले भरणाऱ्यांवर पाणी दरवाढ लादण्यात काय अर्थ आहे? असा सवाल केला जात आहे.

सध्या महापालिका प्रति एक हजार लिटर पाणीपुरवठ्यासाठी सात रुपये दर आकारते. त्यात तीन रुपयांची वाढ प्रशासनाने प्रस्तावित केली आहे. त्यामुळे प्रति एक हजार लिटर पाण्यासाठी ग्राहकांना १० रुपये मोजावे लागतील. त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाºया ग्राहकांकडून १० रुपयांऐवजी २० रुपये दर आकारला जाईल. त्यामुळे जास्त पाणी वापरणाºयांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.‘पाणीपुरवठा विभागाकडून पाणीगळती रोखली जात नाही. हजारो बेकायदा नळजोडण्यांद्वारे दररोज पाणीचोरी होते. परंतु, पाणीपुरवठा विभागाला नियमित पाणीबिले भरणाºया ग्राहकांच्या माथी ही दरवाढ मारायची आहे. पाणी फुकट पिणाºयांचा भार बिले भरणाºयांनी का सोसायचा,’ असा सवाल शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य वामन म्हात्रे यांनी केला आहे.

‘महापालिकेने चुकीच्या पद्धतीने पाणीपुरवठा योजनांचे नियोजन केले आहे. त्यासाठी घेतलेले कर्ज पालिका बिल भरणाºया ग्राहकांच्या जीवावरच फेडत आहे. महापालिका हद्दीतील लोकसंख्या १६ लाख आहे. महापालिकेकडून दररोज होणारा पाणीपुरवठा व प्रत्यक्षात लोकसंख्या पाहता जास्तीचे पाणी कोण वापरत आहे? यातील फरक ६५ दशलक्ष लिटरचा आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. नागरिकांना पुरेसे पाणी द्या, पाणीचोरी रोखा,’ अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे.६५ दशलक्ष लिटर पाणी मुरते कुठे?, पालिकेकडे लेखाजोखा नाहीप्रशासनातर्फे दरवर्षी पाणी दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जातो. मात्र, स्थायी समिती व महासभेकडून तो फेटाळला जातो. महापालिका दररोज ३१० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा महापालिका हद्दीत करते. याव्यतिरिक्त २७ गावांत ३० दशलक्ष पुरवठा एमआयडीसीकडून केला जातो.त्याचे बिल महापालिका एमआयडीसीला भरते. एका व्यक्तीला १५० लिटर पाणी लागते. महापालिका पुरवित असलेले पाणी, लोकसंख्येचा निकष व दरडोई पुरवठ्याचा लिटरचा हिशेब पाहता २४५ दशलक्ष लिटर पाणी महापालिकेस पुरेसे आहे. त्या व्यतिरिक्त ६५ दक्षलक्ष लिटर पाणी कुठे मुरते, याचा लेखाजोखा महापालिकेकडे नाही.गळती कधी रोखणार?महापालिकेने २००९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार २१.५ टक्के इतकी पाणीगळती आहे. ती रोखण्यासाठी काही उपाययोजना महापालिकेच्या हाती नाही. महापालिकेने ९० हजार पाणीमीटर बसविले आहेत. त्याचे बिलिंग मीटर प्रमाणे कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे पाण्याचा वापर कोण किती करतो, याचे मोजमाप नाही.पाणीपुरवठा देखभालदुरुस्तीचा खर्चपाणी शुद्धीकरणासाठी : २ कोटी रुपयेआस्थापना : १८ कोटी रुपयेकर्जाचा हप्ता : २० कोटी रुपयेलघु पाटबंधारे व एमआयडीसी : १८ कोटी रुपयेविजेचे बिल : ४० कोटीजलवाहिनी टाकणे : ५० कोटी रुपयेएकूण : १४८ कोटी रुपयेकर्जाचा हप्ता २० कोटींचाजवाहरलाल नेहरू नागरी पुनर्रुत्थान अभियानातून केडीएमसीने १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उभारली आहे. त्यासाठी महापालिकेने एमएमआरडीएकडून २३३ कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचा दरवर्षी २० कोटींचा कर्जाचा हप्ता महापालिका २०१३ पासून देते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत १०० कोटीचे कर्ज फिटले तर उर्वरित १३३ कोटींचे कर्ज फेडणे बाकी आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका