शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शिरवाडी गावाला जंगल संरक्षणासाठी टेहळणी टॉवर

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

‘हिरव्या देवाची यात्रा’ हा महोत्सव सुरू करून जंगल संवर्धनाच्या उपाययोजना व जंगलाचे महत्त्व पटवून देणाऱ्या विविध स्पर्धा घेतल्या.

ठाणे : मुरबाड तालुक्यातील काही आदिवासीपाड्यांमध्ये आठ दिवसांपासून ‘हिरव्या देवाची यात्रा’ हा महोत्सव सुरू करून जंगल संवर्धनाच्या उपाययोजना व जंगलाचे महत्त्व पटवून देणाऱ्या विविध स्पर्धा घेतल्या. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या यात्रेत सहभाग घेऊन पाड्याच्या समस्या समजून घेतल्या. याशिवाय, जंगल संरक्षण करण्यास उपयुक्त ठरणारे टेहळणी टॉवर शिरवाडी या गावासाठी मंजूर केले. जंगलाचे संरक्षण करणाऱ्या या आदिवासींना मोठमोठे वनपट्टे मिळालेले आहेत. पण, ते गावात असताना या जंगलातील झाडांची चोरीने कत्तल केली जाते. वणवे लावले जातात. लाकडांची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. यास कायमचा आळा घालण्यासाठी गावाजवळ मोठे टॉवर उभारून रात्रीबेरात्री त्यावरून जंगलाची पाहणी करणे शक्य आहे. यासाठी गावात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना या आदिवासींनी स्वत:ऐवजी जंगल संरक्षणासाठी टॉवर उभारणीची मागणी केली. एक टॉवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मंजूर करून इतर गावांच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले. सध्या उद्भवलेली दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी व पाण्याची उपलब्धता होण्यासाठी जंगलात पावसाचे पाणी जिरवण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. रोजगार हमीद्वारे ही कामे हाती घेऊन लोकांना रोजगारही उपलब्ध करणे शक्य होणार आहे. या वेळी येथील आदिवासी कुटुंबीयांनी वृक्षलागवडीसाठी सात हजार ८९९ वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यासाठी महसूल व वन विभागाने रोपे उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. या महोत्सव कालावधीत ७१ मुलांनी पर्यावरण प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभाग घेतला. मुलांनी पर्यावरण प्रश्नमंजूषा स्पर्धेत भाग घेतला. पाच गावांतील ७१ महिलांनी रानभाज्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.