शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शिवसेनेच्या नगरसेवकांवर तीन पथके ठेवणार वॉच

By admin | Updated: May 27, 2016 04:19 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना रवींद्र फाटक यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने खास व्यूहरचना आखली आहे.

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना रवींद्र फाटक यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने खास व्यूहरचना आखली आहे. तिचा एक भाग म्हणून पक्षातील अथवा मित्र पक्षातील एकही मत फुटले, तरी त्याची माहिती पक्षाने तयार केलेल्या खास टीमला तत्काळ कळणार आहे. तसेच पक्षातील एकही मत फुटू नये, यासाठीदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: लक्ष घालून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपामधील खासदार, आमदार आणि नगरसेवकही कामाला लागले आहेत. विविध ठिकाणी मेळावे घेणे, प्रत्येक नगरसेवकाला भेटणे आदींसह रात्रीच्या निनावी स्थळी बैठका घेण्याचे कामही सुरू आहे.ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक असा सामना रंगतदार स्थितीत आला आहे. आता प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाल्याने आपल्या पक्षातील मतांसोबतच इतर पक्षांतील मते आपल्याकडे कशी वळवता येतील, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी दोन्ही पक्षांकडून सुरू झाली आहे. त्यातही बविआने डावखरे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेची सर्वच नेते मंडळी मताधिक्य वाढवण्यासाठी व्यूहरचना आखत आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्या पक्षातील एकही मत फुटू नये, यासाठी शिवसेनेतील काही नगरसेवक, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी टीम तयार केली असून ती याकडे लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील आपल्या पक्षातील प्रत्येक नगरसेवकाच्या हालचाली टिपण्याचे काम त्यांच्याकडून सध्या सुरू आहे. तर, दुसऱ्या पक्षातील काही नगरसेवक खेचण्यासाठीदेखील दुसऱ्या एका विशिष्ट टीमचे गठण केले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या दिवशीदेखील पक्षातील एखादे जरी मत फुटले, तरी त्याची माहिती तत्काळ शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेबरोबरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निकालावरच भविष्यातील विधान परिषदेच्या इतर जागांची आणि महापालिका निवडणुकांची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे तिला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वसंत डावखरे आणि शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यातील चुरस वाढलेली आहे. दरम्यान, शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपानेही मित्रधर्म गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हाच संदेश जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या नगरसेवकांपर्यंत जाण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात येणार आहेत. येत्या २८ मे रोजी दुपारी ४ वाजता ते ठाण्यात मेळावा घेणार आहेत. मात्र, तो कुठे असेल, हे मात्र अद्यापही निश्चित झालेले नाही. परंतु, वागळे इस्टेट येथील एखाद्या सभागृहात ही बैठक घेतली जाईल, असे मानले जात आहे. ते मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. भाजपा खासदार कपिल पाटील यांनीदेखील या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत.