शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

उघड्यावर जाणाऱ्यांवर पुन्हा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:30 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भाग पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या

नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भाग पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पंधरवड्यात केल्यानंतर नगरविकास विभागाने आता नागरी भागातील हागणदारीमुक्तीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी त्यात सातत्य राखले जात नसल्याने शासनाने सर्व नागरी संस्थांना वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ३० मे २०१८ ची डेडलाईन दिली आहे.नगरविकास विभाग एवढ्यावरच थांबला नसून बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयांचे जिओ टॅगिंग करून ती आधारशी संलग्न करण्याचे बंधन घातले आहे. याशिवाय पुढील तीन महिने उघड्यावर शौचास बसणाºयांवर वॉच ठेवण्याची मोहीम उघडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हागणदारीमुक्तीस बळ मिळेल, असा विश्वास शासनाला वाटत आहे.संपूर्ण भारत देश आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने २ आॅक्टोबर २०१४ रोजी देशभर ‘स्वच्छ भारत अभियाना’स सुरूवात झाली. घनकचरा व्यवस्थापन आणि हागणदारी मुक्त देश ही उद्दीष्ट यासाठी ठेवली होती. आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यात सातत्य नसल्याचे आढळले आहे. शिवाय अनेक कुटुंबानी अनुदानाचा पहिला हप्ता घेऊन उर्वरीत काम पूर्ण न करता उघड्यावर जाणे पसंत केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संपूर्ण शहर हागणदारीमुक्त होण्यात अडचणी येत आहेत. जी शहरे यापूर्वी हागणदारीमुक्त झाली होती, त्या शहरांत पुन्हा उघड्यावर जाणाºयांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्व महापालिकांसह नगरपालिकांनी पुढील तीन महिने आपल्या कार्यक्षेत्रात दररोज सकाळी उघड्यावर शौच करणाºयांवर वॉच ठेवण्याची मोहीम पुन्हा उघडावी, असे बजावण्यात आले आहे. राज्यातील शहरांचा हागणदारीमुक्त शहर हा दर्जा टिकवण्याकरीता सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची उत्तम देखभाल करणे गरजेचे असून याकरीता त्याठिकाणी वीज, पाण्याची अखंड उपलब्धता असणे आवश्यक आहे. तसेच शौचालयांचे दरवाजे, शौचकुपे व्यवस्थीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दक्ष राहण्यास बजावण्यात आले आहे.