शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

उघड्यावर जाणाऱ्यांवर पुन्हा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:30 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भाग पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या

नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भाग पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पंधरवड्यात केल्यानंतर नगरविकास विभागाने आता नागरी भागातील हागणदारीमुक्तीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी त्यात सातत्य राखले जात नसल्याने शासनाने सर्व नागरी संस्थांना वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ३० मे २०१८ ची डेडलाईन दिली आहे.नगरविकास विभाग एवढ्यावरच थांबला नसून बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयांचे जिओ टॅगिंग करून ती आधारशी संलग्न करण्याचे बंधन घातले आहे. याशिवाय पुढील तीन महिने उघड्यावर शौचास बसणाºयांवर वॉच ठेवण्याची मोहीम उघडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हागणदारीमुक्तीस बळ मिळेल, असा विश्वास शासनाला वाटत आहे.संपूर्ण भारत देश आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने २ आॅक्टोबर २०१४ रोजी देशभर ‘स्वच्छ भारत अभियाना’स सुरूवात झाली. घनकचरा व्यवस्थापन आणि हागणदारी मुक्त देश ही उद्दीष्ट यासाठी ठेवली होती. आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यात सातत्य नसल्याचे आढळले आहे. शिवाय अनेक कुटुंबानी अनुदानाचा पहिला हप्ता घेऊन उर्वरीत काम पूर्ण न करता उघड्यावर जाणे पसंत केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संपूर्ण शहर हागणदारीमुक्त होण्यात अडचणी येत आहेत. जी शहरे यापूर्वी हागणदारीमुक्त झाली होती, त्या शहरांत पुन्हा उघड्यावर जाणाºयांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्व महापालिकांसह नगरपालिकांनी पुढील तीन महिने आपल्या कार्यक्षेत्रात दररोज सकाळी उघड्यावर शौच करणाºयांवर वॉच ठेवण्याची मोहीम पुन्हा उघडावी, असे बजावण्यात आले आहे. राज्यातील शहरांचा हागणदारीमुक्त शहर हा दर्जा टिकवण्याकरीता सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची उत्तम देखभाल करणे गरजेचे असून याकरीता त्याठिकाणी वीज, पाण्याची अखंड उपलब्धता असणे आवश्यक आहे. तसेच शौचालयांचे दरवाजे, शौचकुपे व्यवस्थीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दक्ष राहण्यास बजावण्यात आले आहे.