शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी संप्रदायाने समाज बदल टिपावेत

By admin | Updated: May 1, 2017 05:57 IST

वारकरी सांप्रदाय हा सर्वांना सामावून व सांभाळून घेणारा आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सांप्रदायाने २१ व्या शतकातील समाजाच्या

डोंबिवली : वारकरी सांप्रदाय हा सर्वांना सामावून व सांभाळून घेणारा आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सांप्रदायाने २१ व्या शतकातील समाजाच्या मानसिकतेतील बदल ध्यानात घ्यावेत, अशी सूचना हभप बाबामहाराज सातारकर यांनी केली.रोटरी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मातोश्री बेबीबाई पाटील यांच्या स्मरणार्थ मयुरेश्वर मित्र मंडळ, राजमाता जिजाई महिला हित मंडळ आणि बबन गायकवाड यांच्या पुढाकाराने नुकतेच देसलेपाडा-भोपर येथील ‘लोढा हेरिटेज गाडन’मध्ये नुकतेच सातारकर महाराज यांचे प्रवचन झाले. ते म्हणाले, की आई-वडील हे डोळ््याला दिसत असून ही कळत नाहीत. मग न दिसणारा पण असणारा देव कसा कळणार. देव, दीप आणि प्रकाश हे समीकरण आहे. जी सत्ता प्रकाशित करते तो देव. बोलून, चालून, ऐकून याचे नाम चालू आहे, तो देव आहे. माणूस देवाजवळ सुखाची याचना करतो. परंतु देवाजवळ सुख नाही. देव सुखरूप आहे, तर सुख देण्यासाठी संत आहेत. समाधान पाहिजे असेल तर कीर्तनात बसा. आत्मा हा सर्वांजवळच आहे. परंतु ज्याच्या संगतीत आत्मा लक्षात येतो. त्याला महात्मा म्हणतात. देहरूपी क्षेत्रावर आपली मालकी असली तरी या देहातील देव दाखवणारा संत आहे. आपले घर सुशोभित दिसावे, यासाठी घराची ज्या प्रमाणे सजावट केली जाते, त्याप्रमाणे प्रत्येकाने देवाची आराधना करून मन स्वच्छ केले पाहिजे. वारकरी सांप्रदाय निर्माण होण्याचे कारण अध्यात्म तर आहेच, पण सामाजिकही आहे. विठ्ठल विटेवर उभे राहण्याचे कारण आई-वडिलांची सेवा आहे. सुख पाहिजे असेल तर माणसाला संतांच्या जवळ जावे लागेल, असा संदेश त्यांनी दिला. (प्रतिनिधी)