शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारीच्या फटक्याने एस. टी. महामंडळाचे दोन वर्षांत ७० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:28 IST

अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नसल्याचा फटका वारकऱ्यांसह एस. ...

अजित मांडके

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नसल्याचा फटका वारकऱ्यांसह एस. टी. महामंडळालाही बसला आहे. मागील दोन वर्षे ठाणे जिल्ह्यातून वारीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एकही बस सुटलेली नाही. यापूर्वी ठाणे विभागातून सुमारे ३५० च्या आसपास बसगाड्या वारीसाठी पंढरपूरला जात होत्या. गेल्या दोन वर्षांत एसटीला ७० लाखांच्या आसपास उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीची जशी वारकऱ्यांना ओढ लागते, तशीच ओढ एसटीला देखील लागते. वारकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाची दरवर्षी लगबग असते. ठाणे एसटी विभागाकडून आठ आगारांतून पंढरपूरला जाण्यासाठी दरवर्षी ३५० बसगाड्या सोडल्या जात होत्या. पंढरपूरला जाईपर्यंत या बसमधील वातावरण भक्तिमय होऊन जात होते. राज्य शासनाने केवळ मानाच्या दहा पालख्याच पंढरपूरला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला. एसटी महामंडळाचा देखील हिरमोड झाला.

..............

दरवर्षी पंढरपूरसाठी किती बसगाड्या सोडल्या जायच्या - ३५०

त्यातून किती उत्पन्न मिळायचे - ३५ लाख

एसटीतून दरवर्षी साधारण कितीजण प्रवास करायचे - २२ हजारांच्या आसपास

जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या - एकही नाही

मानाच्या दहा पालख्या जात असल्याने जिल्ह्यातून एकही पालखी पंढरपूरला जात नव्हती.

................................

वारकऱ्यांचे गावी मन रमेना

मी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला नित्यनेमाने जात असतो. परंतु, मागील वर्षी जाता आले नाही. त्यामुळे विठ्ठलाकडे प्रार्थना केली होती की, यंदा तरी मला तुझ्या दर्शनासाठी येऊ दे. मात्र, यंदादेखील कोरोनाचे सावट असल्याने पंढरपूरची वारी चुकली आहे.

- रवी जडे, वारकरी

.............

वारीत गेल्यावर मन प्रसन्न होते. नवी ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा घरी येत असतो. मात्र, सलग दोन वर्षे वारीला जाता आलेले नाही. त्यामुळे घरात मन रमत नाही. आता तरी विठ्ठलाने कोरोनाला रोखून पुढील वर्षी तरी वारीला येण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा.

- प्रकाश ताम्हाणे, वारकरी

...........

ठाणे विभागातून दरवर्षी ३५० बसगाड्या वारीसाठी सोडल्या जात होत्या. परंतु, दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने वारीसाठी बसगाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत.

- विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रण, एसटी, ठाणे

............