शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वारीच्या फटक्याने एस. टी. महामंडळाचे दोन वर्षांत ७० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:28 IST

अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नसल्याचा फटका वारकऱ्यांसह एस. ...

अजित मांडके

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नसल्याचा फटका वारकऱ्यांसह एस. टी. महामंडळालाही बसला आहे. मागील दोन वर्षे ठाणे जिल्ह्यातून वारीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एकही बस सुटलेली नाही. यापूर्वी ठाणे विभागातून सुमारे ३५० च्या आसपास बसगाड्या वारीसाठी पंढरपूरला जात होत्या. गेल्या दोन वर्षांत एसटीला ७० लाखांच्या आसपास उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीची जशी वारकऱ्यांना ओढ लागते, तशीच ओढ एसटीला देखील लागते. वारकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाची दरवर्षी लगबग असते. ठाणे एसटी विभागाकडून आठ आगारांतून पंढरपूरला जाण्यासाठी दरवर्षी ३५० बसगाड्या सोडल्या जात होत्या. पंढरपूरला जाईपर्यंत या बसमधील वातावरण भक्तिमय होऊन जात होते. राज्य शासनाने केवळ मानाच्या दहा पालख्याच पंढरपूरला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला. एसटी महामंडळाचा देखील हिरमोड झाला.

..............

दरवर्षी पंढरपूरसाठी किती बसगाड्या सोडल्या जायच्या - ३५०

त्यातून किती उत्पन्न मिळायचे - ३५ लाख

एसटीतून दरवर्षी साधारण कितीजण प्रवास करायचे - २२ हजारांच्या आसपास

जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या - एकही नाही

मानाच्या दहा पालख्या जात असल्याने जिल्ह्यातून एकही पालखी पंढरपूरला जात नव्हती.

................................

वारकऱ्यांचे गावी मन रमेना

मी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला नित्यनेमाने जात असतो. परंतु, मागील वर्षी जाता आले नाही. त्यामुळे विठ्ठलाकडे प्रार्थना केली होती की, यंदा तरी मला तुझ्या दर्शनासाठी येऊ दे. मात्र, यंदादेखील कोरोनाचे सावट असल्याने पंढरपूरची वारी चुकली आहे.

- रवी जडे, वारकरी

.............

वारीत गेल्यावर मन प्रसन्न होते. नवी ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा घरी येत असतो. मात्र, सलग दोन वर्षे वारीला जाता आलेले नाही. त्यामुळे घरात मन रमत नाही. आता तरी विठ्ठलाने कोरोनाला रोखून पुढील वर्षी तरी वारीला येण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा.

- प्रकाश ताम्हाणे, वारकरी

...........

ठाणे विभागातून दरवर्षी ३५० बसगाड्या वारीसाठी सोडल्या जात होत्या. परंतु, दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने वारीसाठी बसगाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत.

- विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रण, एसटी, ठाणे

............