शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वॉर्डनचा वापर दंड ‘वसुली’साठी; अंबरनाथमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:42 IST

वाहतूककोंडी मात्र जैसे थे, नगराध्यक्षांकडूनही नाराजी

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा नेहमीच वाहतूककोंडीत सापडत असल्याने ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले आहेत. त्यांचे मानधनही पालिकेच्या वतीने देण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांत या वॉर्डनचे काम हे सामाधानकारक दिसत नाही. वाहतूककोंडी शहरात असतानाही काही वाहतूक पोलीस ट्रॅफिक वार्डनना सोबत घेऊन एमआयडीसी रस्त्यावर दंड ‘वसुली’चे काम करत आहेत. कोंडी रोखण्यासाठी दिलेल्या वॉर्डनचा गैरवापर वाहतूक पोलीस करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नगराध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण - बदलापूर राज्य महामर्गावर शाळा सुटण्याच्या वेळेत होणारी वाहतूककोंडी ही शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. या कोंडीवरून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वादही होत आहेत. ही कोंडी सोडवण्यात वाहतूक विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोपही होत आहे. वाहतूक विभागाकडे कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्त करण्यात आली आहे. या वॉर्डनचे मानधन पालिकेच्या वतीने दिले जाते. त्यामुळे वॉर्डनकडून कोंडी सुटली जावी, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र, कोंडी असतानाही कमी कर्मचारी हे वॉर्डनला घेऊन एमआयडीसी भागात दंड ‘वसुली’चे काम करतात.

वॉर्डनची दादागिरी वाढली आहे, ते दुचाकीस्वारांना अडवून त्यांचे लायसन्सही तपासतात. त्यांना अधिकार नसतानाही ते गाड्यांचे कागदपत्र, लायसन्स तपासण्याचे काम करतात. या वॉर्डनला आवरण्याची मागणी होत आहे. वॉर्डनच्या माध्यमातून केवळ वाहतूककोंडी सोडवण्याचे काम करणे अपेक्षित असताना त्यांना वाहतूक विभागाचे अधिकारी इतर कामासाठी वापरत असल्याने त्यांचे मानधन बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कोंडी सोडवण्याचे काम द्या, मगच मानधनआधी वॉर्डनला वाहतूककोंडी सोडवण्याचे काम द्यावे मगच मानधन दिले जाईल, अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.अंबरनाथमधील पालिका कार्यालयातील चौक, पोलीस स्टेशन चौक आणि विम्को नाका चौकात कोंडी ही नित्याची बाब ठरली आहे. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस हजर राहण्याची मागणी केली जात आहे. वॉर्डनचा गैरवापर सुरू झाल्याने त्याचा फटका शहरातील कोंडीवर होताना दिसत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी