शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

भटकंती कट्ट्यावर उलगडली ‘विष्णू द गामा’ची रंजक सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 00:04 IST

ठाण्यात कार्यक्रम : ५० देशांमध्ये पायी फिरले

ठाणे : जग फिरण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मनाशी बाळगत ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अपार मेहनत करणारा फिरस्ता म्हणजे विष्णूदास चापके. त्यांनी तीन वर्षांत तीन खंड आणि सुमारे ५० देशांमध्ये पायी भटकंती केली आहे. या पायी केलेल्या भटकंतीवेळी आलेले विविध रंजक अनुभव ऐकण्याची संधी अलीकडेच ‘भटकंती कट्टा’ ठाणे यांनी आयोजित केलेल्या ‘विष्णू द गामा’ या कार्यक्र माच्या निमित्ताने मिळाली.

मराठवाड्यातील परभणी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चापके यांना जग फिरण्याची प्रेरणा समुद्रमार्गे बोटीतून जगप्रदक्षिणा करणारे नौदल अधिकारी कप्टन दिलीप दोंदे यांच्याकडून मिळाली. जगप्रदक्षिणा करण्याचा विचार मनात आला तरी तो प्रत्यक्षात आणणे अतिशय कठीण होते. अनेक अडीअडचणी आल्या. सर्वात मोठी अडचण होती ती पैशांची. परंतु सुहृदांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे ही जगप्रदक्षिणा पूर्ण करता आली, असे चापके यांनी नमूद केले. त्यांना आलेले भलेबुरे अनुभव, एकट्याने परदेश प्रवास करताना पैशांचे नियोजन कसे करायचे, एका देशातून दुसऱ्या देशात जाताना व्हिसा काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याबाबत त्यांनी माहिती दिली.विश्वप्रदक्षिणेवेळी चापके चिली देशात असताना तिथे लागलेल्या वणव्यामुळे त्यांना पुढे जाणे शक्य होत नव्हते. जर्मनी, अमेरिकेची विमाने पाणी फवारणी करुन जंगलात लागलेला वणवा विझवण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी त्यांना आईचा फोन आला. पंधरा दिवसांपूर्वी ही ते तिथेच होते आणि आताही तू तिथेच का असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा चापके यांनी आईला कारण सांगितले.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण