शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

वॉल दुरस्त, पाणी पुरवठा सुरळीत; उल्हासनगर पुर्वेला पाणी टंचाई, नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:11 IST

उल्हासनगर पूर्वेत गेल्या आठवड्यापासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : गेल्या एका आठवड्यापासून अनियमित होत असलेल्या पाणी पुरावाठयाच्या निषेधार्थ मराठा सेक्शन येथील शेकडो नागरिक आज रस्त्यावर आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका वठवून महापालिका पाणीपुरवठा अधिकारी यांना फोन करून पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढला. 

उल्हासनगर पूर्वेत गेल्या आठवड्यापासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. ऐण कोरोना काळात पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला होता. मराठा सेक्शन जिजा माता गार्डन परिसरातील शेकडो नागरिक बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान कोयांडे पुतळ्या जवळ एकत्र येवुन महापालिका विरोधात घोषणाबाजी करू लागले. सदर प्रकार विठ्ठलवाडी पोलिसांना समजल्यावर, पोलिस अधिकारी यांनी कोरोना महामारी याची आठवण करून देवून नागरिकांना शांत केले. त्यापैकी काही जणांना पोलिस ठाण्यात घेवून जावून महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी जी सोनावणे यांच्या सोबत संपर्क साधला. सोनावणे यांनी त्वरित पाणी टँकरची व्यवस्था करून जलवाहिनी वरील वॉलचे काम झाल्याने रात्री पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन पोलिसांसह नागरिकांना दिले. 

शहर पूर्वेला पाणी पुरवठा करण्यात येत आलेल्या मुख्य जलवाहिनी वरील दोन पाणी वॉल खराब झाले. पहिल्या वॉलची दुरस्ती केल्यानंतर दुसऱ्या वॉलच्या दुरस्तीचे काम सुरू केले. दरम्यान उच्च दाबाने पाणी पुरवठा झाल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहर पूर्वेतील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनावणे यांनी दिली. जलवाहिनी दुरस्तीचे काम पूर्ण झाले असून रात्री पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती सोनावणे यांनी दिली. तो पर्यंत मराठा सेक्शन जिजामाता गार्डन येथील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केल्याचे सोनावणे यांचे म्हणणे आहे. ऐण कोरोना काळात पाणी टंचाई निर्माण झाला असून महापालिकेने वेळीच याची दखल घेतली नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरल्याचे माहिती मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिली आहे.

पाण्याच्या एका हंड्या साठी वणवण गेल्या आठवड्यपासून शहर पूर्व मध्ये पाणी टंचाई निर्माण होऊन, महिला पाण्याच्या एका हंड्या साठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली. अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी दिली. पाणी पुरवठा विभाग अध्यावत करण्याची गरज असून पाणी टंचाई अशीच काय राहिल्यास आंदोलनास करण्याचा इशारा गंगोत्री यांनी महापालिकेला दिला आहे

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर