शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वॉल दुरस्त, पाणी पुरवठा सुरळीत; उल्हासनगर पुर्वेला पाणी टंचाई, नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:11 IST

उल्हासनगर पूर्वेत गेल्या आठवड्यापासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : गेल्या एका आठवड्यापासून अनियमित होत असलेल्या पाणी पुरावाठयाच्या निषेधार्थ मराठा सेक्शन येथील शेकडो नागरिक आज रस्त्यावर आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका वठवून महापालिका पाणीपुरवठा अधिकारी यांना फोन करून पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढला. 

उल्हासनगर पूर्वेत गेल्या आठवड्यापासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. ऐण कोरोना काळात पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला होता. मराठा सेक्शन जिजा माता गार्डन परिसरातील शेकडो नागरिक बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान कोयांडे पुतळ्या जवळ एकत्र येवुन महापालिका विरोधात घोषणाबाजी करू लागले. सदर प्रकार विठ्ठलवाडी पोलिसांना समजल्यावर, पोलिस अधिकारी यांनी कोरोना महामारी याची आठवण करून देवून नागरिकांना शांत केले. त्यापैकी काही जणांना पोलिस ठाण्यात घेवून जावून महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी जी सोनावणे यांच्या सोबत संपर्क साधला. सोनावणे यांनी त्वरित पाणी टँकरची व्यवस्था करून जलवाहिनी वरील वॉलचे काम झाल्याने रात्री पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन पोलिसांसह नागरिकांना दिले. 

शहर पूर्वेला पाणी पुरवठा करण्यात येत आलेल्या मुख्य जलवाहिनी वरील दोन पाणी वॉल खराब झाले. पहिल्या वॉलची दुरस्ती केल्यानंतर दुसऱ्या वॉलच्या दुरस्तीचे काम सुरू केले. दरम्यान उच्च दाबाने पाणी पुरवठा झाल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहर पूर्वेतील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनावणे यांनी दिली. जलवाहिनी दुरस्तीचे काम पूर्ण झाले असून रात्री पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती सोनावणे यांनी दिली. तो पर्यंत मराठा सेक्शन जिजामाता गार्डन येथील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केल्याचे सोनावणे यांचे म्हणणे आहे. ऐण कोरोना काळात पाणी टंचाई निर्माण झाला असून महापालिकेने वेळीच याची दखल घेतली नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरल्याचे माहिती मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिली आहे.

पाण्याच्या एका हंड्या साठी वणवण गेल्या आठवड्यपासून शहर पूर्व मध्ये पाणी टंचाई निर्माण होऊन, महिला पाण्याच्या एका हंड्या साठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली. अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी दिली. पाणी पुरवठा विभाग अध्यावत करण्याची गरज असून पाणी टंचाई अशीच काय राहिल्यास आंदोलनास करण्याचा इशारा गंगोत्री यांनी महापालिकेला दिला आहे

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर