शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वालधुनी नदी स्वच्छतेसाठी स्थानिक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:37 IST

नदी परिसराची केली पाहणी; नियम डावलून बांधकामे झाल्याने पुराचे पाणी शिरले होते घरांत

कल्याण : वालधुनी नदीचे केडीएमसीच्या चुकीमुळे नाल्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे योगीधाम आणि आसपासच्या परिसरात थोड्या पावसानेही पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. केडीएमसी प्रशासन नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेत नसेल तर आम्ही स्वत: पुढाकार घेऊन नदी स्वच्छता करू, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. भाजप कल्याण शहर महिला अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी रविवारी नदी परिसराची पाहणी केली.पश्चिमेतील गौरीपाडा येथील घोलपनगर प्रवेशद्वार ते गुरुआत्मन परिसरातील योगीधाम, भवानीनगर, कैलास गार्डन, वास्तुसिद्धी, त्रिमूर्ती कॉलनी, मिलिंदनगर या भागात जवळपास चाळीस हजार लोकसंख्येची वस्ती आहे. हा संपूर्ण परिसर वालधुनी नदीच्या सखल पात्राला लागून आहे. या सखल भागात काही विकासकांनी आपली बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात बेकायदा भरणी आणि नियमांचे पालन न केल्याने पावसाळयात पुराचे पाणी इमारती तसेच चाळींमध्ये शिरल्याने या परिसरातील रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.या परिसरात साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. केडीएमसीने या परिसरातील कर माफ करावा, जेणेकरून या पैशाने नदीची आम्हीच सफाई करू,असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वालधुनी नदीची रविवारी रत्नपारखी यांच्यासह नदी बिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा, अनुष्का शर्मा, सुनील उत्तेकर, मनसेचे कार्यकर्ते गणेश नाईक, नूर बिरवाडकर, भक्ती साळवी, तृप्ती राणे, शोभा थदानी, जयश्री सावंत आदींनी पाहणी केली.नदीचा उल्लेख केला नालाकेडीएमसीच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्टसिटी’ प्रकल्पाचे कामही याच भागात होत आहे. भरणीमुळे या भागातील नदीच्या आणि पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या भागातील विविध बांधकाम तसेच प्रकल्पांना केडीएमसीने मंजुरी देताना वालधुनी नदीचा उल्लेख नाला असा केला असल्याचा आरोप भाजपच्या कल्याण शहर महिला अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला.