शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

वालधुनी नदी स्वच्छतेसाठी स्थानिक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:37 IST

नदी परिसराची केली पाहणी; नियम डावलून बांधकामे झाल्याने पुराचे पाणी शिरले होते घरांत

कल्याण : वालधुनी नदीचे केडीएमसीच्या चुकीमुळे नाल्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे योगीधाम आणि आसपासच्या परिसरात थोड्या पावसानेही पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. केडीएमसी प्रशासन नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेत नसेल तर आम्ही स्वत: पुढाकार घेऊन नदी स्वच्छता करू, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. भाजप कल्याण शहर महिला अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी रविवारी नदी परिसराची पाहणी केली.पश्चिमेतील गौरीपाडा येथील घोलपनगर प्रवेशद्वार ते गुरुआत्मन परिसरातील योगीधाम, भवानीनगर, कैलास गार्डन, वास्तुसिद्धी, त्रिमूर्ती कॉलनी, मिलिंदनगर या भागात जवळपास चाळीस हजार लोकसंख्येची वस्ती आहे. हा संपूर्ण परिसर वालधुनी नदीच्या सखल पात्राला लागून आहे. या सखल भागात काही विकासकांनी आपली बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात बेकायदा भरणी आणि नियमांचे पालन न केल्याने पावसाळयात पुराचे पाणी इमारती तसेच चाळींमध्ये शिरल्याने या परिसरातील रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.या परिसरात साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. केडीएमसीने या परिसरातील कर माफ करावा, जेणेकरून या पैशाने नदीची आम्हीच सफाई करू,असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वालधुनी नदीची रविवारी रत्नपारखी यांच्यासह नदी बिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा, अनुष्का शर्मा, सुनील उत्तेकर, मनसेचे कार्यकर्ते गणेश नाईक, नूर बिरवाडकर, भक्ती साळवी, तृप्ती राणे, शोभा थदानी, जयश्री सावंत आदींनी पाहणी केली.नदीचा उल्लेख केला नालाकेडीएमसीच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्टसिटी’ प्रकल्पाचे कामही याच भागात होत आहे. भरणीमुळे या भागातील नदीच्या आणि पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या भागातील विविध बांधकाम तसेच प्रकल्पांना केडीएमसीने मंजुरी देताना वालधुनी नदीचा उल्लेख नाला असा केला असल्याचा आरोप भाजपच्या कल्याण शहर महिला अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला.