शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

चार महिन्यांपासून प्रतीक्षाच, रेल्वेवर एमएसआरडीसीचा लेटलतिफीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:57 IST

कल्याण-शीळ महामार्गावर ब्रिटिशांनी १०४ वर्षांपूर्वी बांधलेल्या पत्रीपुलाचे आयुर्मान संपुष्टात आले आहे.

अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावर ब्रिटिशांनी १०४ वर्षांपूर्वी बांधलेल्या पत्रीपुलाचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यासंदर्भात ब्रिटिश सरकारने १९९६-९७ मध्ये केडीएमसीला पत्र पाठवून माहिती दिली आहे, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, हा पूल एमएसआरडीसीअंतर्गत येत असून त्याचे डांबरीकरण करण्याखेरीज त्यांनी विशेष डागडुजी केलेली नाही. तर, नवीन पूल बांधण्याकरिता अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव चार महिन्यांपासून मध्य रेल्वेकडे प्रलंबित आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.जुना पत्रीपूल धोकादायक असल्याचे पत्र आयआयटीने मध्य रेल्वेला दिले आहे. त्यामुळे हा पूल तत्काळ वाहतुकीस बंद करावा आणि पाडावा, असे रेल्वेने केडीएमसीला कळवले आहे. केडीएमसीचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले की, पत्रीपूल एमएसआरडीसीच्या अखत्यारित येतो. त्यामुळे रेल्वेने दिलेल्या सूचनेची माहिती एमएसआरडीसीला तातडीने पत्राद्वारे कळवण्यात येत आहे. नवीन पत्रीपूल १९९९-२००० मध्ये युती सरकारच्या काळात बांधून पूर्ण झाला. जुना पूलही वापरात असल्याने नवीन पुलावरून एकावेळी दोन मोठी वाहने जाऊ शकतील, एवढाच रुंद बांधण्यात आला. जुन्या पुलावरून शीळहून कल्याणकडे जाणारी, तर नवीन पुलावरून कल्याणहून शीळच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू होती. मात्र, आता शीळहून कल्याणकडे जाणारी अवजड वाहने जुन्याऐवजी नवीन पुलावरून वळवण्यात आली आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी जुना पत्रीपूल सुरू आहे. वाहतूकव्यवस्थेतील या बदलांमुळे पत्रीपूल परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी होऊ लागली आहे.एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे म्हणाले की, कल्याण-शीळ मार्गासह भिवंडी-माणकोलीपर्यंतचा रस्ता चारवरून सहापदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी २१२ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यामध्ये लोढा, पत्रीपूल, तसेच भिवंडी-माणकोलीफाटा येथील पुलांचाही प्रस्ताव आहे. एमएसआरडीसी पत्रीपुलावर डांबरीकरण, खड्डे भरणे आदी कामे सातत्याने करत आहे. पुलाखालचा भाग मध्य रेल्वेच्या अखत्यारित होता. त्याची देखभाल ते करत होते. आता तेथे नवा उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात रेल्वे आणि आमच्या विभागाच्या अधिकाºयांनी चारपाच वेळा पाहणी केली. बैठकाही झाल्या आहेत. पुलाच्या मंजुरीसाठी त्याची लांबी, उंची याबाबत पाहणी अहवाल (जेईडी) रेल्वेकडे साधारण चार महिन्यांपासून पडून आहे. त्यानुसार, त्यांच्याही चार प्रमुख विभागांच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, मंजुरी पुढील आठवड्यात मिळणार आहे. त्यानंतर, तातडीने अंतिम आराखडा मंजूर करून तत्काळ पूल बांधण्याचे काम हाती घेतले जाईल, असे बोरडे यांनी स्पष्ट केले.>हलक्या वाहनांचीही वाहतूक थांबवा : धोकादायक बनलेल्या जुन्या पत्रीपुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. अवजड वाहने नवीन पुलावरून वळवली आहेत. परंतु, वेगात आलेली वाहने जुन्या पुलाच्या दिशेने येतात. त्यामुळे ती हाइट बॅरिअरला (लोखंडी कमान) धडकतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक बांदेकर म्हणाले. जुन्या पुलावरून जाणाºया हलक्या वाहनांचीही वाहतूकही तातडीने थांबवावी, अशी मागणी ठाण्यातील वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पत्राद्वारे करण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता महाव्यवस्थापकांसमवेत ते बैठकीत व्यस्त असल्याचे म्हणाले.>आम्हाला पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्याचे कोणत्याही प्रकारचे अध्यादेश मिळालेले नाहीत. त्यामुळे या पुलावरून सध्या तरी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. परंतु, भविष्यात जर हा पूल बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले, तर संबंधित विभागानेच वाहतूकविषयी पर्याय उपलब्ध करून द्यावेत. या वाहतुकीमुळे पोलिसांचीच कोंडी झाली आहे.- अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक (वाहतूक)

टॅग्स :dombivaliडोंबिवली