शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

तौउके चक्रीवादळग्रस्तांना पावणेतीन कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्के घरे पूर्णपणे बरबाद झाली. दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळ्या अशी तब्बल २ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपयांची नुकसानभरपाई या चक्रीवादळग्रस्तांना अद्यापही न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

तौउके चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ठाणे जिल्ह्याला बसला आहे. या वादळानंतर आता नुकसानीच्या पाऊलखुणा आणि जखमा आता भळभळू लागल्या आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर या १ हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यांच्या या ४८१ हेक्टरवरील मालाचे तब्बल ८६ लाख ३४ हजारांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या कालावधीत तीन जणांचा मृत्यू होऊन दोघे जखमी झाले आहेत. त्यापोटी मिळणाऱ्या १२ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या प्रतीक्षेत नातेवाईक आहेत.

मीरा-भाईंदरच्या ५२ कुटुंबांचे तब्बल दोन लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. २१ कच्च्या घरांचे, तीन पक्क्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यासाठी २२ लाख ८० हजारांची भरपाई शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय २ हजार १८१ घरांची अंशत: नुकसानभरपाई १ कोटी ३० लाख ८६ हजार मिळण्याची गरज आहे, तर २४५ पक्क्या घरांच्या अंशत: नुकसानीचे १४ लाख ७० हजार भरपाई या वादळग्रस्तांना मिळण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीची भरपाई वेळीच मिळाल्यास या नुकसानग्रस्तांना यंदाचा पावसाळा त्रासदायक होणार नाही. या नैसर्गिक नुकसानीसह कोरोनामुळे गेलेला रोजगार या वादळग्रस्तांच्या जीवावर उठलेला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातील आलेला आंबा, काजूसह रोपवाटिकांमधील रोपे, केळी, उन्हाळी भात आदींच्या नुकसानीचा जिल्ह्यातील १६४ गावांमधील एक हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलीनेट तुटले, घरांवरी पत्रे उडाली आहेत. मच्छीमारी करणाऱ्या दोन बोटींचे पूर्णपणे नुकसान तर पाच बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे. याशिवाय मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची १४६ जाळ्या तुटल्यामुळे तीन लाख ८० हजार रुपयांचा फटका त्यांना बसला आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या तीन हजार २०० रोपांचे तर भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील चार हजार ४५० रोपांचे या वादळात नुकसान झाले. य़ामधील आंबा कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, साग, शेवगा आदी रोपांची मोठी रक्कम या पावसाळ्यात या शेतकऱ्यांना मिळाली असती.

...............

--