शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

तौउके चक्रीवादळग्रस्तांना पावणेतीन कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्के घरे पूर्णपणे बरबाद झाली. दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळ्या अशी तब्बल २ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपयांची नुकसानभरपाई या चक्रीवादळग्रस्तांना अद्यापही न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

तौउके चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ठाणे जिल्ह्याला बसला आहे. या वादळानंतर आता नुकसानीच्या पाऊलखुणा आणि जखमा आता भळभळू लागल्या आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर या १ हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यांच्या या ४८१ हेक्टरवरील मालाचे तब्बल ८६ लाख ३४ हजारांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या कालावधीत तीन जणांचा मृत्यू होऊन दोघे जखमी झाले आहेत. त्यापोटी मिळणाऱ्या १२ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या प्रतीक्षेत नातेवाईक आहेत.

मीरा-भाईंदरच्या ५२ कुटुंबांचे तब्बल दोन लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. २१ कच्च्या घरांचे, तीन पक्क्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यासाठी २२ लाख ८० हजारांची भरपाई शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय २ हजार १८१ घरांची अंशत: नुकसानभरपाई १ कोटी ३० लाख ८६ हजार मिळण्याची गरज आहे, तर २४५ पक्क्या घरांच्या अंशत: नुकसानीचे १४ लाख ७० हजार भरपाई या वादळग्रस्तांना मिळण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीची भरपाई वेळीच मिळाल्यास या नुकसानग्रस्तांना यंदाचा पावसाळा त्रासदायक होणार नाही. या नैसर्गिक नुकसानीसह कोरोनामुळे गेलेला रोजगार या वादळग्रस्तांच्या जीवावर उठलेला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातील आलेला आंबा, काजूसह रोपवाटिकांमधील रोपे, केळी, उन्हाळी भात आदींच्या नुकसानीचा जिल्ह्यातील १६४ गावांमधील एक हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलीनेट तुटले, घरांवरी पत्रे उडाली आहेत. मच्छीमारी करणाऱ्या दोन बोटींचे पूर्णपणे नुकसान तर पाच बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे. याशिवाय मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची १४६ जाळ्या तुटल्यामुळे तीन लाख ८० हजार रुपयांचा फटका त्यांना बसला आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या तीन हजार २०० रोपांचे तर भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील चार हजार ४५० रोपांचे या वादळात नुकसान झाले. य़ामधील आंबा कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, साग, शेवगा आदी रोपांची मोठी रक्कम या पावसाळ्यात या शेतकऱ्यांना मिळाली असती.

...............

--