शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

तौउके चक्रीवादळग्रस्तांना पावणेतीन कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्के घरे पूर्णपणे बरबाद झाली. दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळ्या अशी तब्बल २ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपयांची नुकसानभरपाई या चक्रीवादळग्रस्तांना अद्यापही न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

तौउके चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ठाणे जिल्ह्याला बसला आहे. या वादळानंतर आता नुकसानीच्या पाऊलखुणा आणि जखमा आता भळभळू लागल्या आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर या १ हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यांच्या या ४८१ हेक्टरवरील मालाचे तब्बल ८६ लाख ३४ हजारांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या कालावधीत तीन जणांचा मृत्यू होऊन दोघे जखमी झाले आहेत. त्यापोटी मिळणाऱ्या १२ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या प्रतीक्षेत नातेवाईक आहेत.

मीरा-भाईंदरच्या ५२ कुटुंबांचे तब्बल दोन लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. २१ कच्च्या घरांचे, तीन पक्क्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यासाठी २२ लाख ८० हजारांची भरपाई शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय २ हजार १८१ घरांची अंशत: नुकसानभरपाई १ कोटी ३० लाख ८६ हजार मिळण्याची गरज आहे, तर २४५ पक्क्या घरांच्या अंशत: नुकसानीचे १४ लाख ७० हजार भरपाई या वादळग्रस्तांना मिळण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीची भरपाई वेळीच मिळाल्यास या नुकसानग्रस्तांना यंदाचा पावसाळा त्रासदायक होणार नाही. या नैसर्गिक नुकसानीसह कोरोनामुळे गेलेला रोजगार या वादळग्रस्तांच्या जीवावर उठलेला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातील आलेला आंबा, काजूसह रोपवाटिकांमधील रोपे, केळी, उन्हाळी भात आदींच्या नुकसानीचा जिल्ह्यातील १६४ गावांमधील एक हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलीनेट तुटले, घरांवरी पत्रे उडाली आहेत. मच्छीमारी करणाऱ्या दोन बोटींचे पूर्णपणे नुकसान तर पाच बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे. याशिवाय मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची १४६ जाळ्या तुटल्यामुळे तीन लाख ८० हजार रुपयांचा फटका त्यांना बसला आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या तीन हजार २०० रोपांचे तर भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील चार हजार ४५० रोपांचे या वादळात नुकसान झाले. य़ामधील आंबा कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, साग, शेवगा आदी रोपांची मोठी रक्कम या पावसाळ्यात या शेतकऱ्यांना मिळाली असती.

...............

--