शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तौउके चक्रीवादळग्रस्तांना पावणेतीन कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्के घरे पूर्णपणे बरबाद झाली. दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळ्या अशी तब्बल २ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपयांची नुकसानभरपाई या चक्रीवादळग्रस्तांना अद्यापही न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

तौउके चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ठाणे जिल्ह्याला बसला आहे. या वादळानंतर आता नुकसानीच्या पाऊलखुणा आणि जखमा आता भळभळू लागल्या आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर या १ हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यांच्या या ४८१ हेक्टरवरील मालाचे तब्बल ८६ लाख ३४ हजारांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या कालावधीत तीन जणांचा मृत्यू होऊन दोघे जखमी झाले आहेत. त्यापोटी मिळणाऱ्या १२ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या प्रतीक्षेत नातेवाईक आहेत.

मीरा-भाईंदरच्या ५२ कुटुंबांचे तब्बल दोन लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. २१ कच्च्या घरांचे, तीन पक्क्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यासाठी २२ लाख ८० हजारांची भरपाई शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय २ हजार १८१ घरांची अंशत: नुकसानभरपाई १ कोटी ३० लाख ८६ हजार मिळण्याची गरज आहे, तर २४५ पक्क्या घरांच्या अंशत: नुकसानीचे १४ लाख ७० हजार भरपाई या वादळग्रस्तांना मिळण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीची भरपाई वेळीच मिळाल्यास या नुकसानग्रस्तांना यंदाचा पावसाळा त्रासदायक होणार नाही. या नैसर्गिक नुकसानीसह कोरोनामुळे गेलेला रोजगार या वादळग्रस्तांच्या जीवावर उठलेला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातील आलेला आंबा, काजूसह रोपवाटिकांमधील रोपे, केळी, उन्हाळी भात आदींच्या नुकसानीचा जिल्ह्यातील १६४ गावांमधील एक हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलीनेट तुटले, घरांवरी पत्रे उडाली आहेत. मच्छीमारी करणाऱ्या दोन बोटींचे पूर्णपणे नुकसान तर पाच बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे. याशिवाय मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची १४६ जाळ्या तुटल्यामुळे तीन लाख ८० हजार रुपयांचा फटका त्यांना बसला आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या तीन हजार २०० रोपांचे तर भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील चार हजार ४५० रोपांचे या वादळात नुकसान झाले. य़ामधील आंबा कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, साग, शेवगा आदी रोपांची मोठी रक्कम या पावसाळ्यात या शेतकऱ्यांना मिळाली असती.

...............

--