शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

‘बीएसयूपी’ घरांची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:37 IST

केडीएमसीत लाभार्थ्यांच्या चकरा : प्रशासनाकडून चालढकल, घरभाडेही थकले

कल्याण : डोंबिवलीतील इंदिरानगरमधील बीएसयूपी प्रकल्पातील १७५ लाभार्थ्यांना घर मिळालेले नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या माने यांनी न्यायालयीन लढा देऊ न आदेश मिळवूनही त्याची पूर्तता महापालिका करत नाही. याबाबत, ‘करू, बघू’ अशी उत्तरे देऊ न प्रशासन वेळ काढत असल्याने घराची प्रतीक्षा कधी संपणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

इंदिरानगरमधील रहिवाशांनी घरे रिकामी केली. त्या जागेवर महापालिकेने बीएसयूपी प्रकल्प हाती घेतला. २००९ पासून हा प्रकल्प सुरू असून हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण करून घरे बांधून तयार करायची होती. कंत्राटदाराकडून प्रकल्प पूर्ण करण्यात दिरंगाई झाली. २०१४ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाली, तरी प्रकल्प पूर्ण झाला नाही. १८ महिन्यांची मुदत उलटली असून आॅगस्ट २०१४ मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक माने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने २०१५ मध्ये आदेश दिले की, कंत्राटदार, महापालिका व याचिकाकर्ते यांनी समन्वय साधून घरे देण्याचा निर्णय घ्यावा. आॅगस्ट २०१५ पासून प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येकी पाच हजार रुपये घरभाडे संबंधित कंत्राटदाराने द्यावे. कंत्राटदाराने चार महिने भाडे दिले. त्यानंतर, २०१६ पासून लाभार्थ्यांचे घरभाडे थकले आहे. घरही दिले जात नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. न्यायालयाने आदेश देताना कंत्राटदार काम करत नसल्यास त्याच्याकडून ३० दिवसांत काम काढून घ्यावे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चास दोन महिन्यांच्या आत मंजुरी द्यावी. तीन महिन्यांच्या आत नवा कंत्राटदार नेमून पात्र लाभार्थ्यांना सहा महिन्यांच्या आत घरे द्यावीत. कंत्राटदार भाडे देत नसल्यास कंत्राटदाराच्या सुरक्षा अनामत रकमेतून भाड्याची रक्कम द्यावी, असा कालबद्ध कार्यक्रम दिला होता.

डिसेंबर २०१५ अखेर घरांचे वाटप केले जावे, अशी डेडलाइन न्यायालयाने आखून दिली होती. ही डेडलाइन महापालिकेने पाळलेली नाही. २०१५ मध्ये दिलेल्या न्यायालयीन आदेशाचा अवमान महापालिका प्रशासनाने केला आहे. लाभार्थ्यांना घरे मिळावीत, यासाठी न्यायालयात दाद मागितली. प्रशासन न्यायालयाच्या आदेशालाही जुमानत नसल्याने लाभार्थ्यांना न्याय मिळालेला नाही. कमलालाल श्रीवास्तव, शंकर नाईक, रामचंद्र देसाई या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला. आणखीन किती लाभार्थ्यांचा मृत्यू होण्याची वाट महापालिका पाहत आहे, असा सवाल माने यांनी केला आहे. महापौर व आयुक्तांकडे यासाठी पाठपुरावा करूनही ते केवळ बघू, करू, असे सांगतात. त्यामुळे दाद मागायची, विचारणा करायची तर कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.

बीएसयूपी लाभार्थी निश्चित करण्याचे काम पाहणारे मालमत्ता विभागाचे करनिर्धारक व संकलक विनय कुलकर्णी हे जबाबदार असल्याचा आरोप माने यांनी केला आहे. कुलकर्णी यांची या खात्यातून अन्य खात्यात बदली करण्यात यावी. त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.अन्याय केल्याचा प्रश्नच नाही!च्मालमत्ता विभागाचे करनिर्धारक व संकलक कुलकर्णी म्हणाले की, पुनर्वसन समितीचे अध्यक्ष उपायुक्त धनाजी तोरसकर आहेत. त्या समितीत अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यातील सदस्य सचिवपदी मी आहे.च्समितीने लाभार्थ्यांकडून सर्व कागदपत्रे घेऊ न ती तपासण्यात आली आहेत. त्यानुसार, पात्र ठरलेल्यांना घरे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे यात कोणावर अन्याय करण्याचा विषयच नाही. पूर्ण प्रक्रियेनुसारच कार्यवाही करण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले.