शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाडा नगरपंचायतीला कोलदांडा भाजपाचा?

By admin | Updated: May 23, 2016 02:24 IST

या पंचायत समितीची काठावर असलेली भाजपच्या हातातली सत्ता वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी ते राहत असलेल्या वाडा या शहरासाठी घोषित होऊ घातलेल्या नगरपंचायतीला खोडा घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे

वसंत भोईर, वाडा या पंचायत समितीची काठावर असलेली भाजपच्या हातातली सत्ता वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी ते राहत असलेल्या वाडा या शहरासाठी घोषित होऊ घातलेल्या नगरपंचायतीला खोडा घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. जनतेची पाठराखण करून नगरपंचायत मागावी तर पक्षाच्या हातून पंचायत समितीतील सत्ता जाते आणि सत्ता राखावी तर जनता मागणी करीत असलेली नगरपंचायतीची मागणी सोडून द्यावी लागते, अशा विचित्र कचाट्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सापडले आहेत. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण शासनाचे असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या तालुक्यांच्या गावांसाठी नगरपंचायतींची घोषणा नुकतीच शासनाने केली आहे. मात्र वाडयासारख्या तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीला यातून वगळल्याने नगरपंचायत होण्यात कोणी कोलदांडा घातला. असा प्रश्न होता त्याचे उत्तर जनतेला मिळाले आहे. जिल्हा परिषदेने जिल्हयातील मोखाडा, विक्र मगड, तलासरी व वाडा या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्या संदर्भातील प्रस्ताव ७ नोव्हेंबर २०१५ रोजी ग्रामविकास विभागाकडे पाठविले होते. या प्रस्तावानुसार वरील चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीना नगर पंचायतीचा दर्जा देणे आवश्यक होते. मात्र ७ मे २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हयातील विक्रमगड,मोखाडा व तलासरी या नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली. मात्र यातून झपाटयÞाने विस्तारणाऱ्या वाडा सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरविकास विभागाने ९ फेब्रुवारी २०१६ रोजी फक्त विक्र मगड येथे नगरपंचायत स्थापन करण्या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ विक्र मगड येथे नगरपंचायत करण्याचे राजकीय इच्छाशक्ती नेमकी कोणाची होती असा प्रश्न उपस्थित होतो. शासनाने केवळ विक्रमगड चाच प्रस्ताव मागविल्याने जिल्हाधिकारी पालघर यांनी २२ मार्च २०१६ रोजी विक्र मगड येथे नगरपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. असे असताना विक्रमगड, तलासरी व मोखाडा येथे नगरपंचायतीची घोषणा झाली. मात्र वाडा यातून वगळल्याने कोणाचे राजकीय बळ कमी पडले की जाणीवपूर्वक वाडा वगळण्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. वाडा तालुका हा औद्योगिकीकरणासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो कारखाने डी प्लस झोनमुळे वाडा तालुक्यात आहेत. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण या कंपन्यामुळे नोकरी कामधंद्यासाठी आलेल्यांची संख्या वाड्यात वाढली आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी येथे राहतात. त्यामुळे वाडा गावाचे नागरीकरण झपाटयÞाने वाढत आहे. २०११ च्या जनगणने नुसार असणाऱ्या आकडेवारीपेक्षा दुपटीहून अधिक लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे वाडा गावात नागरी समस्यांचा ताण वाढत आहे. या नागरी समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता ग्रामपंचायतीची नसल्याने सर्वात आधी वाड्यात नगरपंचायत होणे अपेक्षित होते. वाड्याची नगरपंचायत व्हावी या करिता स्थानिकांनी सातत्याने लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेकडे मागणी केली होती. तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्यापासून वाडावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र वाड्याला वगळल्याने जनतेत नाराजी पसरली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे वाड्यात राहात असून त्यांचे निवासस्थान असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा न मिळणे हा त्यांचा सत्ताकारणातील दुबळेपणा मानला जातो आहे. त्यामुळे ते त्यांच्या पक्षातच टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर स्थानिक पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होते. वाडा ग्रामपंचायतीचा संपूर्ण एकच गण आहे आणि येथे भाजपाचा सदस्य निवडून आला आहे. सध्या वाडा पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता असून भाजपाचे ६, शिवसेना ५, राष्ट्रवादी कॉग्रेसचा १ असे पक्षीय बलाबल असून येथे नगरपंचायत झाली तर भाजपाचे संख्याबळ एकने कमी होते. त्यामुळे वाडा पंचायत समितीचा आगामी पदाधिकारी निवडणूकीत याचा फटका भाजपाला बसू शकतो या भीतीने हा रडीचा डाव राज्यसरकारने खेळला आहे. च्वाडा येथे शहरीकरण झपाटयÞाने वाढत आहे. ग्रामपंचायत हा विकास करण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नगरपंचायत होणे गरजेचे आहे. जनतेच्या बाजूने आम्ही असू अशी प्रतिक्रि या श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी दिली. च्राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली लवकरच आम्ही नगर विकास मंत्र्याची भेट घेऊन नगरपंचायतीची निर्मिती करू अशी प्रतिक्रि या भाजपाचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार यांनी दिली. च्विष्णू सवरा हे जिल्हयाचे पालकमंत्री आहेत की आपल्या विक्र मगड मतदार संघाचे आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. चारही तालुक्याचे प्रस्ताव असताना शासनाने फक्त वाड्यालाच का वगळले? याचा जाब सवरांनाच विचारणे आवश्यक असून त्यामागे त्यांचे राजकीय हितसंबंध गुंतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी केला आहे.