शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचे कर्तव्य टाळून चाकरमानी निघाले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:28 IST

मतांच्या टक्केवारीवर परिणामाची शक्यता : सुट्यांचे नियोजन आखले, कोकणवासी आघाडीवर

ठाणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू असताना ऐन मतदानाच्या दिवशी सुटी आणि त्याआधी दोन दिवस, पुढे एक दिवसाची रजा टाकली की, सलग पाच दिवसांची सुटी मिळणार आहे. या पाच दिवसांचे गणित आखून अनेकांनी पिकनिकला जाण्याचे, तर चाकरमान्यांनी गावाला जाण्याचे प्लॅन आखले आहेत. ठाण्यातून महाराष्टÑभर जाणाऱ्या एसटीचे बुकिंग आजच्या तारखेला ४० टक्के फुल्ल झाले असून येत्या आठ दिवसांत ते १०० टक्कयांवर जाणार आहे. त्यामुळे मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्यासाठी आतापासूनच विविध पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.

ठाणे मतदारसंघात येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणेकडून चार हजार बॅनर, पोस्टर, जाहिरातींच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू असून लोकशाहीचा अधिकार बजावावा, असे आवाहनही केले जात आहे. विविध पक्षांकडूनसुद्धा मतदारांना प्रलोभने दाखवून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत आहे. परंतु, मतदानाची जी तारीख दिली आहे, त्यामुळे मोठा घोळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. २९ एप्रिलला मतदानासाठी सुटी असणार आहे. त्याआधी २७ एप्रिल हा चौथा शनिवार आणि त्यानंतर लागलीच रविवार अशा या दोन सुट्या होत आहेत. त्यानंतर, मतदानाची तिसरी सुटी आणि पुन्हा एक दिवस रजा टाकली, तर १ मे ची सुद्धा चाकरमान्यांना सुटी मिळत आहे. पाच दिवसांत केवळ एकच दिवस रजा टाकावी लागत असल्याने अनेकांनी त्यादृष्टीने प्लानिंग सुरू केले आहे. काहींनी पिकनिकला जाण्याचा, तर काहींनी थेट गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे.

मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्यासाठी आता विविध पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सीबीएसई सोडले, तर इतर शाळांना १० एप्रिलनंतर सुट्या लागणार आहेत.सीबीएसई शाळांना १ मेपासून सुटी आहे. तेथील पालकांनीही सुट्यांचे नियोजन आखले आहे. त्यामुळे १० एप्रिलनंतरचे एसटीचे बुकिंग ४० टक्के फुल्ल झाले आहे. आठ दिवसांत ते १०० टक्कयांवर जाऊ शकते. यामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा नंबर पहिला असून, त्याखालोखाल मराठवाडा आणि खान्देशच्या चाकरमान्यांचा नंबर आहे. आठ दिवसांत २६ एप्रिलपासूनचे बुकिंग फुल्ल होणार असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारी होणार आहे.