शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मतदानाचे कर्तव्य टाळून चाकरमानी निघाले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:28 IST

मतांच्या टक्केवारीवर परिणामाची शक्यता : सुट्यांचे नियोजन आखले, कोकणवासी आघाडीवर

ठाणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू असताना ऐन मतदानाच्या दिवशी सुटी आणि त्याआधी दोन दिवस, पुढे एक दिवसाची रजा टाकली की, सलग पाच दिवसांची सुटी मिळणार आहे. या पाच दिवसांचे गणित आखून अनेकांनी पिकनिकला जाण्याचे, तर चाकरमान्यांनी गावाला जाण्याचे प्लॅन आखले आहेत. ठाण्यातून महाराष्टÑभर जाणाऱ्या एसटीचे बुकिंग आजच्या तारखेला ४० टक्के फुल्ल झाले असून येत्या आठ दिवसांत ते १०० टक्कयांवर जाणार आहे. त्यामुळे मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्यासाठी आतापासूनच विविध पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.

ठाणे मतदारसंघात येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणेकडून चार हजार बॅनर, पोस्टर, जाहिरातींच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू असून लोकशाहीचा अधिकार बजावावा, असे आवाहनही केले जात आहे. विविध पक्षांकडूनसुद्धा मतदारांना प्रलोभने दाखवून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत आहे. परंतु, मतदानाची जी तारीख दिली आहे, त्यामुळे मोठा घोळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. २९ एप्रिलला मतदानासाठी सुटी असणार आहे. त्याआधी २७ एप्रिल हा चौथा शनिवार आणि त्यानंतर लागलीच रविवार अशा या दोन सुट्या होत आहेत. त्यानंतर, मतदानाची तिसरी सुटी आणि पुन्हा एक दिवस रजा टाकली, तर १ मे ची सुद्धा चाकरमान्यांना सुटी मिळत आहे. पाच दिवसांत केवळ एकच दिवस रजा टाकावी लागत असल्याने अनेकांनी त्यादृष्टीने प्लानिंग सुरू केले आहे. काहींनी पिकनिकला जाण्याचा, तर काहींनी थेट गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे.

मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्यासाठी आता विविध पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सीबीएसई सोडले, तर इतर शाळांना १० एप्रिलनंतर सुट्या लागणार आहेत.सीबीएसई शाळांना १ मेपासून सुटी आहे. तेथील पालकांनीही सुट्यांचे नियोजन आखले आहे. त्यामुळे १० एप्रिलनंतरचे एसटीचे बुकिंग ४० टक्के फुल्ल झाले आहे. आठ दिवसांत ते १०० टक्कयांवर जाऊ शकते. यामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा नंबर पहिला असून, त्याखालोखाल मराठवाडा आणि खान्देशच्या चाकरमान्यांचा नंबर आहे. आठ दिवसांत २६ एप्रिलपासूनचे बुकिंग फुल्ल होणार असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारी होणार आहे.