शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विवेक पंडित वसईत पुन्हा सक्रीय होणार

By admin | Updated: March 7, 2016 02:13 IST

जनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा

शशी करपे,  वसईजनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा. सत्ता मिळविणे, निवडून येणे हे आपले उद्दीष्ट नाही. लोकांच्या हितासाठी लढत राहिले पाहिजे. त्यासाठी श्रमजीवीच्या फौजेसह आपल्यासोबत कायम राहिन. आव्हान मोठे आहे. पण, संघर्ष केल्यास वसईत २००९ ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार आणि जनआंदोलन समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी शनिवारी रात्री वसई गिरीज येथे झालेल्या जनआंदोलनाच्या सभेत बोलताना व्य्नत केला.गावाचा प्रश्न तापल्यानंतर वसईत राजकीय धु्रवीकरण होऊन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जनआंदोलनाच्या बॅनरखाली पंडितांनी विजय मिळवला होता. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी २१ नगरसेवक निवडून आणले होते. इतकेच नाही तर ठाणे जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा मिळवत वसई पंचायत समितीवरही सत्ता मिळवली होती. त्यामुळे वसईत ठाकूरांपुढे मोठे आव्हान तयार झाले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने ते वसईतून दूर गेले होते. पालिका , जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते दूर राहिल्याने जनआंदोलनाची पिछेहाट होऊन जनआंदोलन समिती एकाकी पडली होती.वसईपासून दुरावलेल्या पंडितांनी वसई वगळता पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामधील श्रमजीवीच्या माध्यमातून मोठमोठी आंदोलने सुरु केली. तसेच नुकत्याच झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचारात भाग घेतला होता. आता वसई आणि जनआंदोलनापासून दूर असलेले पंडित अचानक जनआंदोलनाच्या व्यासपीठावर हजर झाले. ५ मार्च २०१० रोजी पोलिसांनी वाघोली येथे लोकांवर केलेल्या अत्याचाराला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पंडित म्हणाले की, वसईत दिसत नसलो तरी वसईतील राजकारण सोडलेले नाही.पालघर विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात माझाही वाटा आहे. वसईतही त्यांना रोखणे अवघड नाही. वसईत २००९ ची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी चर्चा करीत न बसता अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून नव्या पिढीला सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे. नुसत्या चर्चा करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. मी स्वत: श्रमजीवीला सोबत घेऊन ताकदीनिशी जनआंदोलनाच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होईन, असे सांगितले. पंडित अद्यापही शिवसेनेचे उपनेते असून जनआंदोलन समितीचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे पंडित पुन्हा एकदा वसईच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.