शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

विवेक पंडित वसईत पुन्हा सक्रीय होणार

By admin | Updated: March 7, 2016 02:13 IST

जनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा

शशी करपे,  वसईजनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा. सत्ता मिळविणे, निवडून येणे हे आपले उद्दीष्ट नाही. लोकांच्या हितासाठी लढत राहिले पाहिजे. त्यासाठी श्रमजीवीच्या फौजेसह आपल्यासोबत कायम राहिन. आव्हान मोठे आहे. पण, संघर्ष केल्यास वसईत २००९ ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार आणि जनआंदोलन समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी शनिवारी रात्री वसई गिरीज येथे झालेल्या जनआंदोलनाच्या सभेत बोलताना व्य्नत केला.गावाचा प्रश्न तापल्यानंतर वसईत राजकीय धु्रवीकरण होऊन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जनआंदोलनाच्या बॅनरखाली पंडितांनी विजय मिळवला होता. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी २१ नगरसेवक निवडून आणले होते. इतकेच नाही तर ठाणे जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा मिळवत वसई पंचायत समितीवरही सत्ता मिळवली होती. त्यामुळे वसईत ठाकूरांपुढे मोठे आव्हान तयार झाले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने ते वसईतून दूर गेले होते. पालिका , जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते दूर राहिल्याने जनआंदोलनाची पिछेहाट होऊन जनआंदोलन समिती एकाकी पडली होती.वसईपासून दुरावलेल्या पंडितांनी वसई वगळता पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामधील श्रमजीवीच्या माध्यमातून मोठमोठी आंदोलने सुरु केली. तसेच नुकत्याच झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचारात भाग घेतला होता. आता वसई आणि जनआंदोलनापासून दूर असलेले पंडित अचानक जनआंदोलनाच्या व्यासपीठावर हजर झाले. ५ मार्च २०१० रोजी पोलिसांनी वाघोली येथे लोकांवर केलेल्या अत्याचाराला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पंडित म्हणाले की, वसईत दिसत नसलो तरी वसईतील राजकारण सोडलेले नाही.पालघर विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात माझाही वाटा आहे. वसईतही त्यांना रोखणे अवघड नाही. वसईत २००९ ची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी चर्चा करीत न बसता अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून नव्या पिढीला सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे. नुसत्या चर्चा करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. मी स्वत: श्रमजीवीला सोबत घेऊन ताकदीनिशी जनआंदोलनाच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होईन, असे सांगितले. पंडित अद्यापही शिवसेनेचे उपनेते असून जनआंदोलन समितीचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे पंडित पुन्हा एकदा वसईच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.