शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

विवेक पंडित वसईत पुन्हा सक्रीय होणार

By admin | Updated: March 7, 2016 02:13 IST

जनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा

शशी करपे,  वसईजनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा. सत्ता मिळविणे, निवडून येणे हे आपले उद्दीष्ट नाही. लोकांच्या हितासाठी लढत राहिले पाहिजे. त्यासाठी श्रमजीवीच्या फौजेसह आपल्यासोबत कायम राहिन. आव्हान मोठे आहे. पण, संघर्ष केल्यास वसईत २००९ ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार आणि जनआंदोलन समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी शनिवारी रात्री वसई गिरीज येथे झालेल्या जनआंदोलनाच्या सभेत बोलताना व्य्नत केला.गावाचा प्रश्न तापल्यानंतर वसईत राजकीय धु्रवीकरण होऊन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जनआंदोलनाच्या बॅनरखाली पंडितांनी विजय मिळवला होता. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी २१ नगरसेवक निवडून आणले होते. इतकेच नाही तर ठाणे जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा मिळवत वसई पंचायत समितीवरही सत्ता मिळवली होती. त्यामुळे वसईत ठाकूरांपुढे मोठे आव्हान तयार झाले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने ते वसईतून दूर गेले होते. पालिका , जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते दूर राहिल्याने जनआंदोलनाची पिछेहाट होऊन जनआंदोलन समिती एकाकी पडली होती.वसईपासून दुरावलेल्या पंडितांनी वसई वगळता पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामधील श्रमजीवीच्या माध्यमातून मोठमोठी आंदोलने सुरु केली. तसेच नुकत्याच झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचारात भाग घेतला होता. आता वसई आणि जनआंदोलनापासून दूर असलेले पंडित अचानक जनआंदोलनाच्या व्यासपीठावर हजर झाले. ५ मार्च २०१० रोजी पोलिसांनी वाघोली येथे लोकांवर केलेल्या अत्याचाराला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पंडित म्हणाले की, वसईत दिसत नसलो तरी वसईतील राजकारण सोडलेले नाही.पालघर विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात माझाही वाटा आहे. वसईतही त्यांना रोखणे अवघड नाही. वसईत २००९ ची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी चर्चा करीत न बसता अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून नव्या पिढीला सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे. नुसत्या चर्चा करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. मी स्वत: श्रमजीवीला सोबत घेऊन ताकदीनिशी जनआंदोलनाच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होईन, असे सांगितले. पंडित अद्यापही शिवसेनेचे उपनेते असून जनआंदोलन समितीचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे पंडित पुन्हा एकदा वसईच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.