शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

‘त्या’ नगरसेवकांच्या गावात संघर्ष समितीचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:34 IST

२७ गावांचा मुद्दा : विरोधकांशी साधणार संवाद

कल्याण : केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यास काही नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिली आहे.

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी उशिरा एक गोपनीय बैठक पार पाडली. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, गगाजन मांगरूळकर, दत्ता वझे आदी उपस्थित होते.महापालिकेतून २७ गावे वगळू नयेत, अशी मागणी केवळ पाच नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी समितीचे पदाधिकारी संवाद साधणार आहेत. त्यातून गाव वगळण्यास नागरिकांचा विरोध आहे की, तेथील नगरसेवक समितीच्या भूमिकेच्या विरोधात आहे, हे स्पष्ट होईल. संवाद साधण्याची ही प्रक्रिया मंत्रालयात पुन्हा दुसरी बैठक होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल.२०१५ मध्ये समितीने महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपने कमळाच्या निशाणीवर उमेदवार उभे केले. समितीचा पाठिंबा होता म्हणून हे नगरसेवक निवडून आले.भाजपने निवडणुकीतही फसवणूक केली. तसेच पाच वर्षे गावे वगळण्याचे गाजर दाखविले. आता महाविकास आघाडी सरकारकडून गावे वगळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना त्यात खोडा घालण्याचा प्रकार काही मंडळी करीत असल्याचा आरोप समितीने बैठकीत केला.पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत२७ गावांबाबत शिवसेनेची भूमिका यापूर्वी वेगळी होती. आता शिवसेना अनुकूल होत असताना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे, असाही सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका