शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

‘त्या’ नगरसेवकांच्या गावात संघर्ष समितीचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:34 IST

२७ गावांचा मुद्दा : विरोधकांशी साधणार संवाद

कल्याण : केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यास काही नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिली आहे.

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी उशिरा एक गोपनीय बैठक पार पाडली. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, गगाजन मांगरूळकर, दत्ता वझे आदी उपस्थित होते.महापालिकेतून २७ गावे वगळू नयेत, अशी मागणी केवळ पाच नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी समितीचे पदाधिकारी संवाद साधणार आहेत. त्यातून गाव वगळण्यास नागरिकांचा विरोध आहे की, तेथील नगरसेवक समितीच्या भूमिकेच्या विरोधात आहे, हे स्पष्ट होईल. संवाद साधण्याची ही प्रक्रिया मंत्रालयात पुन्हा दुसरी बैठक होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल.२०१५ मध्ये समितीने महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपने कमळाच्या निशाणीवर उमेदवार उभे केले. समितीचा पाठिंबा होता म्हणून हे नगरसेवक निवडून आले.भाजपने निवडणुकीतही फसवणूक केली. तसेच पाच वर्षे गावे वगळण्याचे गाजर दाखविले. आता महाविकास आघाडी सरकारकडून गावे वगळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना त्यात खोडा घालण्याचा प्रकार काही मंडळी करीत असल्याचा आरोप समितीने बैठकीत केला.पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत२७ गावांबाबत शिवसेनेची भूमिका यापूर्वी वेगळी होती. आता शिवसेना अनुकूल होत असताना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे, असाही सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका