शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत मिळवून देण्याची विशाल कोळी यांची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 18:04 IST

दरम्यान मागील दोन वर्षे सातत्याने मच्छिमारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. मत्स्य व्यवसायासाठी तसेच नौका बांधणीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा पेचप्रसंग मच्छिमार बांधवांसमोर उभा ठाकलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई :-किनारपट्टीवर धडकलेले मे- जून 2020 मधील निसर्ग चक्रीवादळ तर मार्च -एप्रिल मध्ये आलेले कोरोना विषाणूचे संकट यांमुळे आधीच मत्स्योद्योगाचे अर्थकारण कोसळल आहे.एकूणच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारने लक्ष देऊन हातभार लावला पाहिजे या मागणीसाठी अर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विशाल कोळी यांनी राज्याच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे लेखी पत्र देत मागणी केली आहे.

दरम्यान मागील दोन वर्षे सातत्याने मच्छिमारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.मत्स्य व्यवसायासाठी तसेच नौका बांधणीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा पेचप्रसंग मच्छिमार बांधवांसमोर उभा ठाकलेला आहे.त्याचप्रमाणे टाळेबंदीमुळे मासळीच्या निर्यातीवर असलेले निर्बंध, मासेमारी हंगाम उशिराने सुरू करण्याची होत असलेली मागणी आणि मासळी बाजार सुरू करण्याबाबत असलेली अनिश्‍चितता अशा एक ना अनेक कारणांमुळे मच्छिमार समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा काळात आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या मच्छीमार बांधवांना मदत मिळण्याकामी अर्नाळा ग्रामपंचायत समितीचे माजी सदस्य विशाल दामोदर कोळी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

अशाही परिस्थितीत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वसईच्या विविध भाागातील समुद्र किनार्‍यांवर सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीचे अतोनात नुकसन झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने बोंबील, करंदी, मांदेळी आणि जवळा ही सर्व मासळी पावसात भिजून गेली असल्याने ती खराब होऊन मच्छिमारांवर ती टाकून देण्याची वेळ आली आहे.

परिणामी सुक्या मासळीच्या प्रक्रियेत संपूर्ण कुटुंब कामात गुंतलेले असते. तसेच मासळी सुकविण्याच्या कामात मोठे श्रमही घ्यावे लागतात. परिणामत: वारंवार होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छिमार लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे आणि म्हणूनच पुढे व्यवसाय कसा करावा हा प्रश्‍न समोर उभा आहे.मच्छिमार समाजाची झालेली ही दयनीय अवस्था लक्षात घेता, राज्य शासनाने तातडीने मदत प्रत्यक्षात मच्छीमारापर्यंत पोहचविणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे या समाजाला भरीव आर्थिक मदत आणि इतर बाबतीत सवलत देण्याची विनंती अर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विशाल दामोदर कोळी यांनी मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमार