शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत मिळवून देण्याची विशाल कोळी यांची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 18:04 IST

दरम्यान मागील दोन वर्षे सातत्याने मच्छिमारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. मत्स्य व्यवसायासाठी तसेच नौका बांधणीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा पेचप्रसंग मच्छिमार बांधवांसमोर उभा ठाकलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई :-किनारपट्टीवर धडकलेले मे- जून 2020 मधील निसर्ग चक्रीवादळ तर मार्च -एप्रिल मध्ये आलेले कोरोना विषाणूचे संकट यांमुळे आधीच मत्स्योद्योगाचे अर्थकारण कोसळल आहे.एकूणच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारने लक्ष देऊन हातभार लावला पाहिजे या मागणीसाठी अर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विशाल कोळी यांनी राज्याच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे लेखी पत्र देत मागणी केली आहे.

दरम्यान मागील दोन वर्षे सातत्याने मच्छिमारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.मत्स्य व्यवसायासाठी तसेच नौका बांधणीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा पेचप्रसंग मच्छिमार बांधवांसमोर उभा ठाकलेला आहे.त्याचप्रमाणे टाळेबंदीमुळे मासळीच्या निर्यातीवर असलेले निर्बंध, मासेमारी हंगाम उशिराने सुरू करण्याची होत असलेली मागणी आणि मासळी बाजार सुरू करण्याबाबत असलेली अनिश्‍चितता अशा एक ना अनेक कारणांमुळे मच्छिमार समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा काळात आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या मच्छीमार बांधवांना मदत मिळण्याकामी अर्नाळा ग्रामपंचायत समितीचे माजी सदस्य विशाल दामोदर कोळी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

अशाही परिस्थितीत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वसईच्या विविध भाागातील समुद्र किनार्‍यांवर सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीचे अतोनात नुकसन झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने बोंबील, करंदी, मांदेळी आणि जवळा ही सर्व मासळी पावसात भिजून गेली असल्याने ती खराब होऊन मच्छिमारांवर ती टाकून देण्याची वेळ आली आहे.

परिणामी सुक्या मासळीच्या प्रक्रियेत संपूर्ण कुटुंब कामात गुंतलेले असते. तसेच मासळी सुकविण्याच्या कामात मोठे श्रमही घ्यावे लागतात. परिणामत: वारंवार होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छिमार लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे आणि म्हणूनच पुढे व्यवसाय कसा करावा हा प्रश्‍न समोर उभा आहे.मच्छिमार समाजाची झालेली ही दयनीय अवस्था लक्षात घेता, राज्य शासनाने तातडीने मदत प्रत्यक्षात मच्छीमारापर्यंत पोहचविणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे या समाजाला भरीव आर्थिक मदत आणि इतर बाबतीत सवलत देण्याची विनंती अर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विशाल दामोदर कोळी यांनी मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमार