शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विमुक्त जाती, भटक्या जमातींचे विद्यार्थी वाऱ्यावर!

By admin | Updated: July 27, 2015 01:46 IST

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. परिणामी, महाविद्यालयातील विद्यार्थी वाऱ्यावर आहेत, पण सामाजिक न्याय विभागाने मात्र या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वि.जा.भ.ज. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षेकत्तर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रा. सी.के. शिंदे यांनी सांगितले की, २६ जून २००८ सालच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान तत्त्वावर राज्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली. दऱ्या-खोऱ्यात, पाडा, तांड्यावर राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बंजारा, धनगर, वंजारी, केवट, भोई, झिंगाभोई, बेलदार अशा विविध जातीमधील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. टप्पा अनुदानामध्ये २०१२-१३ सालापासून २५ टक्के, २०१३-१४मध्ये ५० टक्के, २०१४-१५ साली ७५ टक्के, आणि २०१५-१६ साली महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र शासन स्तरावर दरवर्षी टाळाटाळ होत असल्याने महाविद्यालये अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी, शासनाविरोधात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाने अद्याप शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. परिणामी, आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या भटक्या आणि विमुक्त समाजाचे विद्यार्थी महाविद्यालय बंद असल्याने उनाडक्या करत फिरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.