शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

विमुक्त जाती, भटक्या जमातींचे विद्यार्थी वाऱ्यावर!

By admin | Updated: July 27, 2015 01:46 IST

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. परिणामी, महाविद्यालयातील विद्यार्थी वाऱ्यावर आहेत, पण सामाजिक न्याय विभागाने मात्र या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वि.जा.भ.ज. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षेकत्तर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रा. सी.के. शिंदे यांनी सांगितले की, २६ जून २००८ सालच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान तत्त्वावर राज्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली. दऱ्या-खोऱ्यात, पाडा, तांड्यावर राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बंजारा, धनगर, वंजारी, केवट, भोई, झिंगाभोई, बेलदार अशा विविध जातीमधील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. टप्पा अनुदानामध्ये २०१२-१३ सालापासून २५ टक्के, २०१३-१४मध्ये ५० टक्के, २०१४-१५ साली ७५ टक्के, आणि २०१५-१६ साली महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र शासन स्तरावर दरवर्षी टाळाटाळ होत असल्याने महाविद्यालये अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी, शासनाविरोधात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाने अद्याप शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. परिणामी, आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या भटक्या आणि विमुक्त समाजाचे विद्यार्थी महाविद्यालय बंद असल्याने उनाडक्या करत फिरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.