शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

विमुक्त जाती, भटक्या जमातींचे विद्यार्थी वाऱ्यावर!

By admin | Updated: July 27, 2015 01:46 IST

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. परिणामी, महाविद्यालयातील विद्यार्थी वाऱ्यावर आहेत, पण सामाजिक न्याय विभागाने मात्र या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वि.जा.भ.ज. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षेकत्तर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रा. सी.के. शिंदे यांनी सांगितले की, २६ जून २००८ सालच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान तत्त्वावर राज्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली. दऱ्या-खोऱ्यात, पाडा, तांड्यावर राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बंजारा, धनगर, वंजारी, केवट, भोई, झिंगाभोई, बेलदार अशा विविध जातीमधील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. टप्पा अनुदानामध्ये २०१२-१३ सालापासून २५ टक्के, २०१३-१४मध्ये ५० टक्के, २०१४-१५ साली ७५ टक्के, आणि २०१५-१६ साली महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र शासन स्तरावर दरवर्षी टाळाटाळ होत असल्याने महाविद्यालये अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी, शासनाविरोधात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाने अद्याप शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. परिणामी, आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या भटक्या आणि विमुक्त समाजाचे विद्यार्थी महाविद्यालय बंद असल्याने उनाडक्या करत फिरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.