शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

मेट्रो कारशेडचा सर्व्हे गावकऱ्यांनी पुन्हा उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:24 IST

एमएमआरडीएच्या वतीने घोडबंदर भागातील मोघरपाडा गावात जिल्हाधिकारी कार्यालय व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात शेतक-यांना विश्वासात न घेता मेट्रो कारशेडचा सर्व्हे सुरू केला होता.

ठाणे : एमएमआरडीएच्या वतीने घोडबंदर भागातील मोघरपाडा गावात जिल्हाधिकारी कार्यालय व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात शेतक-यांना विश्वासात न घेता मेट्रो कारशेडचा सर्व्हे सुरू केला होता. परंतु यामध्ये पुन्हा आमदार प्रताप सरनाईक आणि इतर गावक-यांनी हस्तक्षेप करून तो उधळून लावला. आधी शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांचे पुनर्वसन करा, मगच सर्व्हे करा, अशी भूमिका घेऊन जिल्हाधिका-यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.घोडबंदर रोडवरील या प्रकारानंतर एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत लोकप्रतिनिधी व शेतकºयांना विश्वासात घेऊनच सर्व्हे केला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले.ओवळा-मोघरपाडा येथे खारभूमी परिसर असून जुना सर्व्हे नंबर २८ (नवीन सर्व्हे नंबर ३०) येथे वर्षानुवर्षे शेतकरी भातशेती करतात. १८७ कुटुंबे येथे शेती करत आहेत. प्रत्यक्षात आजही शेती करणाºयांची संख्या जास्त आहे. काही लोक येथे खाडीकिनारी मासेमारी करायचे. खाडीचे भरती-ओहोटीचे पाणी शेतात यायचे व यामुळे भातशेतीचे नुकसान व्हायचे. त्यामुळे या परिसरात त्यावेळच्या सरकारने १९६० साली शेतकºयांना एक बंधारा बांधायला लावला. यामुळे जमिनीचे रक्षण होऊन शेतीचे क्षेत्र वाढले. १९६० मध्ये १६७ लोकांना भातशेती करण्यासाठी प्रत्येकी ६४ गुंठे जागा सरकारकडून देण्यात आली. इतरांना तोंडी भातशेती करण्यासाठी त्यावेळच्या अधिकाºयांनी येथील जमीन दिली, पण कसणाºया शेतकºयांच्या नावाची नोंद सरकारदरबारी पुढे झाली नाही.>कारशेडसाठी हवी १०० एकर जागाआता मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीएने मेट्रो कारशेडचे आरक्षण ओवळा-मोघरपाडा येथे खारभूमी जागेत टाकले आहे. या कारशेडसाठी सुमारे १०० एकर जागा एमएमआरडीएला हवी असून त्यासाठी त्यांचे अधिकारी सोमवारी कारशेडच्या सर्वेक्षणासाठी गेले होते. मात्र, त्यांनी कसल्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचा दावा यावेळी शेतकºयांनी केला.यावेळी स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, युवासेनेचे रवी घरत, संजय पाटील, राम ठाकूर, आदींसह मोठ्या संख्येने गावकरीसहभागी होते.>कारशेडसाठी ओवळा-मोघरपाडा येथे शेतकºयांची जमीन एमएमआरडीएला हवी आहे. परंतु, त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेतकºयांचे समाधान करा, त्यांना न्याय द्या आणि मगच कारशेडचे काम सुरू करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.