शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

गावविकासासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

ठाणे : गावच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. ...

ठाणे : गावच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. यासाठी गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून गावकऱ्यांनी सामूहिक एकजूट दाखवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नियोजन भवन येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने २०१८-१९चा स्मार्ट ग्राम पुरस्कार व २०१९-२० चा आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव या पुरस्कारांचे वितरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींना तालुका आणि जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरवले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषी व पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे आदींसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, रेखा कंठे आदी उपस्थित होते.

ग्रामविकासासाठी आबांनी मांडलेल्या संकल्पनेवर आजही गावविकास सुरू आहे. लोकोपयोगी व सामाजिक एकोपा जपण्याची स्वयंप्रेरणा जनमानसात रुजवण्याचे काम आबांनी केले, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील गावे राज्यासाठी आदर्श निर्माण करणारी व्हावीत असा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयातून गावच्या विकासासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सुचवले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आदींनी मत मांडले.

‘विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही’

प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी शासन आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.

फाेटाे : १६ठाणे सुंदर गाव पुरस्कार