शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

साताऱ्यातील ग्रामस्थांनी स्वच्छ केली स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:37 IST

अंत्यविधीच्यावेळी पाहिली गैरसोय; दुरवस्थेकडे अंबरनाथ पालिकेचे दुर्लक्ष, सरपंचाने हातात घेतला झाडू

- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ येथे एका अंत्यविधीसाठी आलेल्या सातारा येथील कोरेगावमधील ग्रामस्थांनी अंबरनाथमधील स्मशानभूमीची दुरवस्था पाहून ही स्मशानभूमी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. अंत्यविधीच्यावेळी झालेली गैरसोय आणि अस्वच्छता पाहून दोन दिवसांत लागलीच साताºयातील ग्रामस्थांनी एकत्रित येत मोरिवली गावातील स्मशानभूमी स्वच्छ केली. अंबरनाथ पालिकेलाही लाजवेल, असे काम या ग्रामस्थांनी केले आहे. एवढे सगळे करूनही पालिकेला स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही.अंबरनाथ शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था हा नवीन विषय राहिलेला नाही. मुख्य स्मशानभूमीसह शहरात अनेक ठिकाणी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीही साकारण्यात आली आहे. मात्र, या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी पालिकेला आणि पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळच नसल्याचे दिसते. मोरिवलीमध्ये ग्रामस्थांसाठी असलेली स्मशानभूमी ही झाडाझुडुपांत होती. २८ डिसेंबरला गावातील काकासाहेब मतकर यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी याच स्मशानभूमीवर नेण्यात येणार होते. मात्र, स्मशानभूमीची अवस्था बिकट असल्याने मोरिवली गावातील नागरिकांनी तात्पुरती स्वच्छता करून अंत्यविधी पार पाडला. या अंत्यसंस्कारासाठी साताºयातील कोरेगाव तालुक्यातील विखळे गावातील ग्रामस्थही आले होते. त्यांनीही स्मशानभूमीची अवस्था पाहिल्यावर स्वच्छता करण्याची गरज व्यक्त केली.अंत्यविधी पार पडल्यावर दोन दिवस झाले, तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली नाही. अखेर, ३१ डिसेंबरला राख सावरण्याच्या विधीच्यावेळी विखळे गावाचे सरपंच अप्पासाहेब मतकर यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. अंबरनाथकरांना जे शक्य झाले नाही, ते काम या सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केले. दिवसभर श्रमदान करत संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली. कुणाचीही मदत न घेता मतकर आणि त्यांच्या सहकाºयांनी संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करून एक आदर्श घालून दिला. ज्या गावाशी त्यांचा काहीएक संबंध नव्हता, अशा गावात त्यांनी आदर्श निर्माण केला. पुढारी कसा असावा, हे दाखविण्याचे काम मतकर यांनी केले आहे.अंबरनाथच्या नागरिकांची मान शरमेने खालीजे काम अंबरनाथ पालिका प्रशासनाने करणे गरजेचे होते. ते काम बाहेरील गावातील ग्रामस्थ येऊन करत असल्याने अंबरनाथकरांची मान शरमेने खाली गेली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या कामाचे कौतुक शहरभर होत आहे. समाजमाध्यमांवरही त्याची चर्चा रंगली आहे.