शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
3
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
'२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
6
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
7
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
8
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
9
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
10
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
11
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
12
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
13
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
14
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
15
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
16
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
17
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
18
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
19
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
20
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी

साताऱ्यातील ग्रामस्थांनी स्वच्छ केली स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:37 IST

अंत्यविधीच्यावेळी पाहिली गैरसोय; दुरवस्थेकडे अंबरनाथ पालिकेचे दुर्लक्ष, सरपंचाने हातात घेतला झाडू

- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ येथे एका अंत्यविधीसाठी आलेल्या सातारा येथील कोरेगावमधील ग्रामस्थांनी अंबरनाथमधील स्मशानभूमीची दुरवस्था पाहून ही स्मशानभूमी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. अंत्यविधीच्यावेळी झालेली गैरसोय आणि अस्वच्छता पाहून दोन दिवसांत लागलीच साताºयातील ग्रामस्थांनी एकत्रित येत मोरिवली गावातील स्मशानभूमी स्वच्छ केली. अंबरनाथ पालिकेलाही लाजवेल, असे काम या ग्रामस्थांनी केले आहे. एवढे सगळे करूनही पालिकेला स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही.अंबरनाथ शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था हा नवीन विषय राहिलेला नाही. मुख्य स्मशानभूमीसह शहरात अनेक ठिकाणी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीही साकारण्यात आली आहे. मात्र, या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी पालिकेला आणि पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळच नसल्याचे दिसते. मोरिवलीमध्ये ग्रामस्थांसाठी असलेली स्मशानभूमी ही झाडाझुडुपांत होती. २८ डिसेंबरला गावातील काकासाहेब मतकर यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी याच स्मशानभूमीवर नेण्यात येणार होते. मात्र, स्मशानभूमीची अवस्था बिकट असल्याने मोरिवली गावातील नागरिकांनी तात्पुरती स्वच्छता करून अंत्यविधी पार पाडला. या अंत्यसंस्कारासाठी साताºयातील कोरेगाव तालुक्यातील विखळे गावातील ग्रामस्थही आले होते. त्यांनीही स्मशानभूमीची अवस्था पाहिल्यावर स्वच्छता करण्याची गरज व्यक्त केली.अंत्यविधी पार पडल्यावर दोन दिवस झाले, तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली नाही. अखेर, ३१ डिसेंबरला राख सावरण्याच्या विधीच्यावेळी विखळे गावाचे सरपंच अप्पासाहेब मतकर यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. अंबरनाथकरांना जे शक्य झाले नाही, ते काम या सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केले. दिवसभर श्रमदान करत संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली. कुणाचीही मदत न घेता मतकर आणि त्यांच्या सहकाºयांनी संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करून एक आदर्श घालून दिला. ज्या गावाशी त्यांचा काहीएक संबंध नव्हता, अशा गावात त्यांनी आदर्श निर्माण केला. पुढारी कसा असावा, हे दाखविण्याचे काम मतकर यांनी केले आहे.अंबरनाथच्या नागरिकांची मान शरमेने खालीजे काम अंबरनाथ पालिका प्रशासनाने करणे गरजेचे होते. ते काम बाहेरील गावातील ग्रामस्थ येऊन करत असल्याने अंबरनाथकरांची मान शरमेने खाली गेली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या कामाचे कौतुक शहरभर होत आहे. समाजमाध्यमांवरही त्याची चर्चा रंगली आहे.