शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
4
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
6
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
8
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
9
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
10
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
11
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
12
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
13
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
14
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
15
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
16
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
17
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
18
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
19
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
20
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील ग्रामस्थांनी स्वच्छ केली स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:37 IST

अंत्यविधीच्यावेळी पाहिली गैरसोय; दुरवस्थेकडे अंबरनाथ पालिकेचे दुर्लक्ष, सरपंचाने हातात घेतला झाडू

- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ येथे एका अंत्यविधीसाठी आलेल्या सातारा येथील कोरेगावमधील ग्रामस्थांनी अंबरनाथमधील स्मशानभूमीची दुरवस्था पाहून ही स्मशानभूमी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. अंत्यविधीच्यावेळी झालेली गैरसोय आणि अस्वच्छता पाहून दोन दिवसांत लागलीच साताºयातील ग्रामस्थांनी एकत्रित येत मोरिवली गावातील स्मशानभूमी स्वच्छ केली. अंबरनाथ पालिकेलाही लाजवेल, असे काम या ग्रामस्थांनी केले आहे. एवढे सगळे करूनही पालिकेला स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही.अंबरनाथ शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था हा नवीन विषय राहिलेला नाही. मुख्य स्मशानभूमीसह शहरात अनेक ठिकाणी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीही साकारण्यात आली आहे. मात्र, या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी पालिकेला आणि पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळच नसल्याचे दिसते. मोरिवलीमध्ये ग्रामस्थांसाठी असलेली स्मशानभूमी ही झाडाझुडुपांत होती. २८ डिसेंबरला गावातील काकासाहेब मतकर यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी याच स्मशानभूमीवर नेण्यात येणार होते. मात्र, स्मशानभूमीची अवस्था बिकट असल्याने मोरिवली गावातील नागरिकांनी तात्पुरती स्वच्छता करून अंत्यविधी पार पाडला. या अंत्यसंस्कारासाठी साताºयातील कोरेगाव तालुक्यातील विखळे गावातील ग्रामस्थही आले होते. त्यांनीही स्मशानभूमीची अवस्था पाहिल्यावर स्वच्छता करण्याची गरज व्यक्त केली.अंत्यविधी पार पडल्यावर दोन दिवस झाले, तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली नाही. अखेर, ३१ डिसेंबरला राख सावरण्याच्या विधीच्यावेळी विखळे गावाचे सरपंच अप्पासाहेब मतकर यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. अंबरनाथकरांना जे शक्य झाले नाही, ते काम या सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केले. दिवसभर श्रमदान करत संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली. कुणाचीही मदत न घेता मतकर आणि त्यांच्या सहकाºयांनी संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करून एक आदर्श घालून दिला. ज्या गावाशी त्यांचा काहीएक संबंध नव्हता, अशा गावात त्यांनी आदर्श निर्माण केला. पुढारी कसा असावा, हे दाखविण्याचे काम मतकर यांनी केले आहे.अंबरनाथच्या नागरिकांची मान शरमेने खालीजे काम अंबरनाथ पालिका प्रशासनाने करणे गरजेचे होते. ते काम बाहेरील गावातील ग्रामस्थ येऊन करत असल्याने अंबरनाथकरांची मान शरमेने खाली गेली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या कामाचे कौतुक शहरभर होत आहे. समाजमाध्यमांवरही त्याची चर्चा रंगली आहे.