शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

साताऱ्यातील ग्रामस्थांनी स्वच्छ केली स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:37 IST

अंत्यविधीच्यावेळी पाहिली गैरसोय; दुरवस्थेकडे अंबरनाथ पालिकेचे दुर्लक्ष, सरपंचाने हातात घेतला झाडू

- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ येथे एका अंत्यविधीसाठी आलेल्या सातारा येथील कोरेगावमधील ग्रामस्थांनी अंबरनाथमधील स्मशानभूमीची दुरवस्था पाहून ही स्मशानभूमी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. अंत्यविधीच्यावेळी झालेली गैरसोय आणि अस्वच्छता पाहून दोन दिवसांत लागलीच साताºयातील ग्रामस्थांनी एकत्रित येत मोरिवली गावातील स्मशानभूमी स्वच्छ केली. अंबरनाथ पालिकेलाही लाजवेल, असे काम या ग्रामस्थांनी केले आहे. एवढे सगळे करूनही पालिकेला स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही.अंबरनाथ शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था हा नवीन विषय राहिलेला नाही. मुख्य स्मशानभूमीसह शहरात अनेक ठिकाणी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीही साकारण्यात आली आहे. मात्र, या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी पालिकेला आणि पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळच नसल्याचे दिसते. मोरिवलीमध्ये ग्रामस्थांसाठी असलेली स्मशानभूमी ही झाडाझुडुपांत होती. २८ डिसेंबरला गावातील काकासाहेब मतकर यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी याच स्मशानभूमीवर नेण्यात येणार होते. मात्र, स्मशानभूमीची अवस्था बिकट असल्याने मोरिवली गावातील नागरिकांनी तात्पुरती स्वच्छता करून अंत्यविधी पार पाडला. या अंत्यसंस्कारासाठी साताºयातील कोरेगाव तालुक्यातील विखळे गावातील ग्रामस्थही आले होते. त्यांनीही स्मशानभूमीची अवस्था पाहिल्यावर स्वच्छता करण्याची गरज व्यक्त केली.अंत्यविधी पार पडल्यावर दोन दिवस झाले, तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली नाही. अखेर, ३१ डिसेंबरला राख सावरण्याच्या विधीच्यावेळी विखळे गावाचे सरपंच अप्पासाहेब मतकर यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. अंबरनाथकरांना जे शक्य झाले नाही, ते काम या सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केले. दिवसभर श्रमदान करत संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली. कुणाचीही मदत न घेता मतकर आणि त्यांच्या सहकाºयांनी संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करून एक आदर्श घालून दिला. ज्या गावाशी त्यांचा काहीएक संबंध नव्हता, अशा गावात त्यांनी आदर्श निर्माण केला. पुढारी कसा असावा, हे दाखविण्याचे काम मतकर यांनी केले आहे.अंबरनाथच्या नागरिकांची मान शरमेने खालीजे काम अंबरनाथ पालिका प्रशासनाने करणे गरजेचे होते. ते काम बाहेरील गावातील ग्रामस्थ येऊन करत असल्याने अंबरनाथकरांची मान शरमेने खाली गेली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या कामाचे कौतुक शहरभर होत आहे. समाजमाध्यमांवरही त्याची चर्चा रंगली आहे.