शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२७ गावांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना गावबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:03 IST

२७ गावांतील प्रश्न सोडवण्याकडे कानाडोळा करणाºया खासदार, आमदारांना गावबंदी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे. यापूर्वीही असाच इशारा समितीने दिला होता.

डोंबिवली - २७ गावांतील प्रश्न सोडवण्याकडे कानाडोळा करणाºया खासदार, आमदारांना गावबंदी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे. यापूर्वीही असाच इशारा समितीने दिला होता.संघर्ष समितीची बैठक शनिवारी हॉरिझॉन सभागृहात सायंकाळी पार पडली. या बैठकीला समितीचे गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गणेश म्हात्रे, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर, दत्ता वझे आणि भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. २७ गावे महापालिकेतून वेगळे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलेले नाही. आधी नगरपालिका करा, मगच कल्याण ग्रोथ सेंटर उभारा, असा इशारा समितीच्या वतीने यापूर्वीच दिला होता. मात्र, भाजपा सरकारला आधी ग्रोथ सेंटर उभारण्याची घाई झालेली आहे. हे ग्रोथ सेंटर नेमके कोणाच्या फायद्याचे आहे, असा सवाल समितीच्या वतीने उपस्थित केला आहे.ग्रोथ सेंटर हे टीपीएस (टाउन प्लानिंग स्कीम) धर्तीवर विकसित केले जाणार आहे. त्यात ज्यांची जमीन विकासासाठी घेतली जाणार आहे, त्यांना ८० टक्के जमीन विकसित करून द्यायची मागणी बाधितांनी केली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ५० टक्केच जमीन विकसित करून देण्यात येईल, असे विचाराधीन आहे, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दाट लोकवस्तीची गावे कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये घेण्यात आलेली नाही. एक हजार ८९ हेक्टर जागेवर ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. त्यापैकी ८४७ हेक्टर जागा ही ग्रोथ सेंटरला वापरली जाणार आहे. उर्वरित २४१ हेक्टर जागा ही गावठाणासाठी शिल्लक राहणार आहे. ग्रोथ सेंटर उभारल्यावर विकासकर लागू नये. मात्र, हा कर लागणार आहे. त्यातून बाधितांची सुटका होणार नाही. या विविध मागण्यांचा विचार न करता ग्रोथ सेंंटरचे घोडे पुढे दामटवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.२७ गावांसह अंबरनाथ तालुक्यातील नव्या घरांची नोंदणी ११ महिन्यांपासून बंद आहे. कल्याण तालुक्यात चार महिन्यांपासून नोंदणी बंद आहे. २७ गावांत २००६ पासून एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण होते. या नियोजन प्राधिकरणाने २००६ पासून मे २०१८ पर्यंत केवळ ५१ बांधकामांना बांधकाम करण्याची अधिकृत परवानगी दिलेली आहे. नोंदणी बंद असताना छुप्या पद्धतीने काही लोक नोंदणी करत आहेत, याकडेही समितीने लक्ष वेधले.या विविध प्रश्नांवर आमदार, खासदारांशी पत्रव्यवहार करून मार्ग काढण्यासाठी शेवटचा पर्याय आहे. त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, तर त्यांना गावबंदी केली जाईल.बैठकीनंतर पालकमंत्र्यांशी झाला संवादबैठकीनंतर सर्वपक्षीय समितीने शिवसेना आमदार सुभाष भोईर यांची भेट घेतली. भोईर यांनी समितीच्या पदाधिकाºयांचे बोलणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत करून दिले. लवकरच याविषयी बैठक घेण्याचे आश्वासन शिंदे यांनी पदाधिकाºयांना दिले आहे.दरम्यान, गावातील राजकीय कार्यकर्त्यांनी अमुक एक खासदार व आमदार एका पक्षाचा आहे, म्हणून पुढे येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढल्याचे बोलले जाते.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्याkdmcकल्याण डोंबिवली महापालिका