शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोरोनाकाळातील ‘ती’ची ग्रामसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST

ठाणे : शहापूर तालुक्यातील दळखण गावात ग्रामसेवक पदावर कार्यरत असणाऱ्या माधवी कदम यांचा प्रशासकीय प्रवास आणि कोरोनाकाळात त्यांनी गावाची ...

ठाणे : शहापूर तालुक्यातील दळखण गावात ग्रामसेवक पदावर कार्यरत असणाऱ्या माधवी कदम यांचा प्रशासकीय प्रवास आणि कोरोनाकाळात त्यांनी गावाची खऱ्या अर्थाने केलेली सेवा वाखाणण्यासारखी आहे.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्या ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्या. सांगली जिल्ह्यात पहिली पोस्टिंग मिळाली. परिस्थितीच माणसाला समजदार बनवते हेच माधवी यांच्याबाबतीत घडले. त्यांची कौटुंबिक स्थिती तशी बेताचीच होती. वडील अल्प भूधारक शेतकरी, कुटुंबाची जबाबदारी यांच्यावरच होती. लग्नानंतर २०१२ साली त्या ठाण्यात आल्या. कल्याणच्या नडगाव ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. २०१९ साली बदली होऊन त्या दळखण गावात ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्या. उत्तम कामे केले. मात्र, खरी परीक्षा होती ती कोरोनाकाळात. या गावातही सुरुवातीला रुग्णसंख्या वाढत होती आणि मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्याही ५० टक्के होती. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह त्या अग्रस्थानी होत्या. गावातील बांधव उपाशी राहू नये यासाठी दात्यांच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा करण्याकडेही त्यांचे लक्ष होते. गावातील गरोदर महिला व वयोवृद्ध मंडळी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरत होते. यासाठी गावामध्ये प्राथमिक उपचार करण्यासाठी हॉस्पिटल व ॲम्ब्युलन्सची सेवा चालू करण्यात त्या पुढे होत्या. ‘घरी माझी ६ वर्षांची मुलगी आहे, त्यामुळे या काळात काम करताना थोडी काळजी वाटत होती; पण आपण ज्या गावात काम करतो त्या गावातील जनतेचे हित प्रथम लक्षात घेत मी काम केले. माझ्या कुटुंबियांच्या सहकार्याशिवाय हे काम करणे शक्य नाही’, असे माधवी कदम सांगतात.