शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

विक्रमगडमध्ये नगरपंचायत निवडणुकीची धूम ७७ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: November 7, 2016 02:29 IST

विक्रमगड नव्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची धूम सर्वत्र सुरु झाली असून नाक्यावर, गल्लीबोळात सध्या नगरपंचायत निवडणुकीचेच वारे वाहतांना दिसत आहेत़ ही निवडणूक

विक्रमगड नव्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची धूम सर्वत्र सुरु झाली असून नाक्यावर, गल्लीबोळात सध्या नगरपंचायत निवडणुकीचेच वारे वाहतांना दिसत आहेत़ ही निवडणूक येत्या २७ नोव्हेंबर रोजी होत असून नविन १७ प्रभागात ७७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी चार जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडल्या असल्याने १३ जागां भाजपा लढवित आहे. निलेश सांबरे प्रणीत विकास आघाडी तयार करण्यांत आली असून त्यांनी १७ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे़ तर १३ जागांवर श्रमजीवी, ६ जागांवर राष्ट्रवादी, काही जागांवर मनसे व काहींवर अपक्ष असे एकूण ७७ उमेदवार सध्या रिंगणात आहेत़ ११ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल़दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून पक्षामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली असतांनाही त्यांना एैन वेळेवर उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातील काहींनी इतर पक्षांशी छुपी हातमिळवणी करुन प्रचार सुरु केल्याची माहिती आहे़ त्यामुळे जर या नाराज उमेदवारांनी इतर पक्षास मदत केल्यास भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच विकास आघाडीने देखील पूर्ण ताकदपणाला लावून व्यूहरचना आखल्याने त्याचाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे़ कारण मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या पॅनलला यश मिळालेले आहे़या निवडणुकीतील मतदान आजवर झालेली विकासकामे व उमेदवारांची प्रतिमा यावरच होणार आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या विक्रमगड शहराबरोरच अंतर्गत गाव-पाडयांना नगरपंचायत तारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ विक्रमगड नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस चाललेली अनाधिकृत बांधकामे, गावठाण जागेवरील अतिक्रमणे, वारंवार खंडीत होणारा पाणीपुरवठा, खेडो-पाडी निर्माण होणारी पाणीटंचाई, रोजगाराअभावी होणारे नागरिकांचे स्थलांतर, अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट, प्रसाधगृहाचा अभाव, आदी समस्यांनी ग्रासलेल्या विक्रमगड शहरात भाजपा-सेनेचे नेतृत्व आहे. तालुका पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर राबविलेल्या अनेक विकासात्मक योजनांमुळे परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही़ त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये जनमत कोणत्या पक्षाच्या बाजूने राहते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे़ परंतु या निवडणुकीमध्ये भाजपा-सेना युतीव्यतिरिक्त अन्य पक्षांची एकमेकांशी युती नसल्याने ही निवडणुक त्रिशंकू होण्याची चिन्हे दिसत आहेत़तर भाजपा सरचिटणीस विजय औसरकर यांना या नगरपंचायतीच्या निवडणूकीची सूत्रे दिली आहेत. त्यांचेकडून या पदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप ही या नाराज उमेदवारांकडून केला जात आहे़ त्यामुळे या निवडणुकीत नाराज कार्यकर्ते, त्यांचे उमेदवार यांचेकडून बंडखोरी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे़