शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये नगरपंचायत निवडणुकीची धूम ७७ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: November 7, 2016 02:29 IST

विक्रमगड नव्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची धूम सर्वत्र सुरु झाली असून नाक्यावर, गल्लीबोळात सध्या नगरपंचायत निवडणुकीचेच वारे वाहतांना दिसत आहेत़ ही निवडणूक

विक्रमगड नव्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची धूम सर्वत्र सुरु झाली असून नाक्यावर, गल्लीबोळात सध्या नगरपंचायत निवडणुकीचेच वारे वाहतांना दिसत आहेत़ ही निवडणूक येत्या २७ नोव्हेंबर रोजी होत असून नविन १७ प्रभागात ७७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी चार जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडल्या असल्याने १३ जागां भाजपा लढवित आहे. निलेश सांबरे प्रणीत विकास आघाडी तयार करण्यांत आली असून त्यांनी १७ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे़ तर १३ जागांवर श्रमजीवी, ६ जागांवर राष्ट्रवादी, काही जागांवर मनसे व काहींवर अपक्ष असे एकूण ७७ उमेदवार सध्या रिंगणात आहेत़ ११ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल़दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून पक्षामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली असतांनाही त्यांना एैन वेळेवर उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातील काहींनी इतर पक्षांशी छुपी हातमिळवणी करुन प्रचार सुरु केल्याची माहिती आहे़ त्यामुळे जर या नाराज उमेदवारांनी इतर पक्षास मदत केल्यास भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच विकास आघाडीने देखील पूर्ण ताकदपणाला लावून व्यूहरचना आखल्याने त्याचाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे़ कारण मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या पॅनलला यश मिळालेले आहे़या निवडणुकीतील मतदान आजवर झालेली विकासकामे व उमेदवारांची प्रतिमा यावरच होणार आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या विक्रमगड शहराबरोरच अंतर्गत गाव-पाडयांना नगरपंचायत तारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ विक्रमगड नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस चाललेली अनाधिकृत बांधकामे, गावठाण जागेवरील अतिक्रमणे, वारंवार खंडीत होणारा पाणीपुरवठा, खेडो-पाडी निर्माण होणारी पाणीटंचाई, रोजगाराअभावी होणारे नागरिकांचे स्थलांतर, अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट, प्रसाधगृहाचा अभाव, आदी समस्यांनी ग्रासलेल्या विक्रमगड शहरात भाजपा-सेनेचे नेतृत्व आहे. तालुका पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर राबविलेल्या अनेक विकासात्मक योजनांमुळे परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही़ त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये जनमत कोणत्या पक्षाच्या बाजूने राहते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे़ परंतु या निवडणुकीमध्ये भाजपा-सेना युतीव्यतिरिक्त अन्य पक्षांची एकमेकांशी युती नसल्याने ही निवडणुक त्रिशंकू होण्याची चिन्हे दिसत आहेत़तर भाजपा सरचिटणीस विजय औसरकर यांना या नगरपंचायतीच्या निवडणूकीची सूत्रे दिली आहेत. त्यांचेकडून या पदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप ही या नाराज उमेदवारांकडून केला जात आहे़ त्यामुळे या निवडणुकीत नाराज कार्यकर्ते, त्यांचे उमेदवार यांचेकडून बंडखोरी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे़