शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

उल्हास नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. तर वालधुनी नदी किनाऱ्यावरील शेकडो नागरिकांनी पुराच्या भीतीने, घरातील संसार उपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी नेऊन घरे बंद करून सुरक्षितस्थळी धाव घेतली आहे.

संततधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्यास, पुराचे पाणी नदी किनाऱ्यावरील समतानगर, भारतनगर, वडोलगाव, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधीनगर, हिराघाट, शांतीनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरेनगर आदी परिसरात घुसते. महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी संततधार व नदीच्या पाण्याचा आढावा घेऊन नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच महापालिकेचे आपत्कालीन पथक तैनात ठेवल्याची माहिती दिली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहन घेऊन जाणारा एकमेव संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रस्ता बंद आहे.

वालधुनी नदीतील गाळ व कचरा नदी साफसफाईवेळी बाहेर काढल्याने, पुराचे पाणी अद्याप तरी नागरी वस्तीत घुसले नसल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. नदीची रुंदी व खोली केल्यास पुराचा धोका कमी होणार असल्याचे रगडे म्हणाले. स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे हेही नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क करीत आहेत.