शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

उल्हास नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. तर वालधुनी नदी किनाऱ्यावरील शेकडो नागरिकांनी पुराच्या भीतीने, घरातील संसार उपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी नेऊन घरे बंद करून सुरक्षितस्थळी धाव घेतली आहे.

संततधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्यास, पुराचे पाणी नदी किनाऱ्यावरील समतानगर, भारतनगर, वडोलगाव, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधीनगर, हिराघाट, शांतीनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरेनगर आदी परिसरात घुसते. महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी संततधार व नदीच्या पाण्याचा आढावा घेऊन नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच महापालिकेचे आपत्कालीन पथक तैनात ठेवल्याची माहिती दिली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहन घेऊन जाणारा एकमेव संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रस्ता बंद आहे.

वालधुनी नदीतील गाळ व कचरा नदी साफसफाईवेळी बाहेर काढल्याने, पुराचे पाणी अद्याप तरी नागरी वस्तीत घुसले नसल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. नदीची रुंदी व खोली केल्यास पुराचा धोका कमी होणार असल्याचे रगडे म्हणाले. स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे हेही नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क करीत आहेत.