शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. तर वालधुनी नदी किनाऱ्यावरील शेकडो नागरिकांनी पुराच्या भीतीने, घरातील संसार उपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी नेऊन घरे बंद करून सुरक्षितस्थळी धाव घेतली आहे.

संततधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्यास, पुराचे पाणी नदी किनाऱ्यावरील समतानगर, भारतनगर, वडोलगाव, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधीनगर, हिराघाट, शांतीनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरेनगर आदी परिसरात घुसते. महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी संततधार व नदीच्या पाण्याचा आढावा घेऊन नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच महापालिकेचे आपत्कालीन पथक तैनात ठेवल्याची माहिती दिली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहन घेऊन जाणारा एकमेव संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रस्ता बंद आहे.

वालधुनी नदीतील गाळ व कचरा नदी साफसफाईवेळी बाहेर काढल्याने, पुराचे पाणी अद्याप तरी नागरी वस्तीत घुसले नसल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. नदीची रुंदी व खोली केल्यास पुराचा धोका कमी होणार असल्याचे रगडे म्हणाले. स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे हेही नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क करीत आहेत.