शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. तर वालधुनी नदी किनाऱ्यावरील शेकडो नागरिकांनी पुराच्या भीतीने, घरातील संसार उपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी नेऊन घरे बंद करून सुरक्षितस्थळी धाव घेतली आहे.

संततधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्यास, पुराचे पाणी नदी किनाऱ्यावरील समतानगर, भारतनगर, वडोलगाव, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधीनगर, हिराघाट, शांतीनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरेनगर आदी परिसरात घुसते. महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी संततधार व नदीच्या पाण्याचा आढावा घेऊन नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच महापालिकेचे आपत्कालीन पथक तैनात ठेवल्याची माहिती दिली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहन घेऊन जाणारा एकमेव संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रस्ता बंद आहे.

वालधुनी नदीतील गाळ व कचरा नदी साफसफाईवेळी बाहेर काढल्याने, पुराचे पाणी अद्याप तरी नागरी वस्तीत घुसले नसल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. नदीची रुंदी व खोली केल्यास पुराचा धोका कमी होणार असल्याचे रगडे म्हणाले. स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे हेही नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क करीत आहेत.