शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

महासभेत असंवेदनशीलतेचे दर्शन, खड्ड्यांवर चर्चेऐवजी नौटंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:56 AM

कल्याण परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेले असताना मंगळवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी खड्ड्यांवर चर्चा करण्याएवजी गोंधळ घातला.

कल्याण : कल्याण परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेले असताना मंगळवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी खड्ड्यांवर चर्चा करण्याएवजी गोंधळ घातला. त्यामुळे संवेदनशीलतेचे दर्शन घडले. चिखलात माखून आलेल्या अपक्ष नगरसेवकाने सुरुवातीला गोंधळ घातला. तर, सत्ताधारी भाजपाच्या उपमहापौर व नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर, मनसेच्या गटनेत्याने महापौरांसमोरील राजदंड पळविला. या प्रचंड गोंधळामुळे महापौरांनी सभा तहकूब केली. सत्ताधारी शिवसेना-भाजपाला खड्ड्यांच्या गंभीर मुद्यावर चर्चाच करायची नसल्याने त्यांनी नौटंकी करून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्ष मनसेने केला आहे.अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हे चिखलात माखलेल्या अवस्थेत महासभेत आले. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी त्यांना असे करू नका, असे समजावले. सुरक्षारक्षकांनीही त्यांना महासभेत जाण्यापासून मज्जाव केला. मात्र तानकी यांनी त्यांचा विरोध न जुमानता सभागृहात प्रवेश केला. सभागृहातही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांचे ऐकले नाही. खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीला लावून धरली. त्यावर सचिवांनी श्रद्धांजलीचे प्रस्ताव अनेकांनी मांडले आहेत, असे सांगितले. मात्र, त्यांचे काही एक ऐकून न घेता तानकी जोरात बोलत होते. महासभेने पाच मृतांना श्रद्धांजली वाहिली. सभेच्या सुरुवातीस भाजपा उपमहापौर उपेक्षा भोईर व अन्य सदस्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत ठिय्या धरला. त्यात तानकीही सहभागी झाले. तेव्हा हे आंदोलन करू नका जागेवर बसा असे, आदेश महापौर विनीता राणे यांनी दिले. मात्र, सभेत गदारोळ सुरू झाला.भोईर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमहापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी व दीपेश म्हात्रे यांनी केली. भाजपाचे स्थायी समिती सभापती राहुल दामले हे आंदोलनात सहभागी न होता मागे उभे होते. ‘स्थायी समिती सभापती काम करीत नाही. खड्डे बुजविले गेले नाहीत असाच या आंदोलनाचा अर्थ होतो. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने करावी,’ असा उपरोधिक टोला शेट्टी यांनी लगावला. या गदारोळात मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी राजदंड पळवून बाहेर पळ काढला. दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या हातातील राजदंड पुन्हा आणून जागेवर ठेवला. महापौरांनी सभा तहकूब करत राष्ट्रगीत सुरू केले.>महापौरांचे कोणीच ऐकत नव्हतेमहापौरांचे कोणी ऐकतच नव्हते. त्यामुळे त्या राजदंडाचा काय उपयोग. त्यामुळे महापौरांसमोरील राजदंड पळविला. शिवसेना-भाजपाची नौटंकी रोखण्यासाठी हे कृत्य केले. हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करावी, असे आव्हानही मनसेचे गटनेते भोईर यांनी यांनी शिवसेनेला दिले आहे.कातडी वाचवण्याचा प्रयत्न?विरोधी पक्षनेते मंदार हळबे म्हणाले की, शिवसेना-भाजपला रस्त्यावरील खड्डे प्रश्नावर काडीमात्र गांभीर्य नाही. सभेतील गोंधळ थांबविण्यासाठी राष्ट्रगीताचा आयुधाचा वापर करून ते सुरू करत सभा संपविली. ही लोकशाहीची पायमल्ली आहे. खड्ड्यामुळे लोकांचे जीव गेले. त्यावर शिवसेना-भाजपा राजकारण करत आहे. त्यांनी कातडी वाचवण्याचा प्रयत्न यातून केला असला तरी पुढच्या सभेत विरोधी पक्ष त्यांना सोडणार नाही.>निलंबनाच्या चर्चेऐवजी बगलशिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर म्हणाले, भाजपा उपमहापौरांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याऐवजी ठिय्या दिला. भाजपाचे तीन आमदार व एक राज्यमंत्री असून जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आंदोलन केले. महासभेत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा विषय होता. त्याला बगल देण्यासाठी भाजपाने हे आंदोलन मुद्दामून केले आहे. त्यामुळे भाजपाचा निषेध व्यक्त केला आहे.>आरोप तथ्यहीनउपमहापौर भोईर यांनी सांगितले की, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ठिय्या दिला होता. त्यामुळे आमचा उद्देश प्रामाणिक होता. त्यात कोणतीही स्टंटबाजी नव्हती. त्यामुळे विरोधकांचा आरोपात काही तथ्य नाही.कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारी ४८३ खड्ड्यांपैकी ३६९ खड्डे बुजविल्याची माहिती दिली आहे. हे खड्डे १६ किलोमीटरच्या अंतरात होेते. बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १६२९ चौरस मीटर इतके होते. काँक्रिट रस्त्यावरील १२५ चौरस मीटर खड्ड्यांची तर, आतापर्यंत चार दिवसात ३५ चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका