शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महानेटच्या केबलसाठी रस्त्यांसह झाडांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:38 IST

मेक इन इंडिया कामास स्थगिती द्या । जि.प. सदस्याचा संताप

ठाणे : कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जिल्हा परिषदेचे रस्ते खोदून, लगतची झाडे तोडून महानेटची केबल टाकण्याचे काम जिल्ह्यात मनमानीपणे सुरू आहे. याविरोधात जिल्ह्यातील ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यास अनुसरून जिल्हा परिषदेचे सदस्य कैलास जाधव यांनी बांधकाममंत्र्यासह नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून बांधकाम विभागास चांगलेच धारेवर धरले आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या व सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यात तब्बल दोन हजार ५०० किमीचे रस्ते आहेत. त्यांची दुरुस्ती व डागडुजीसाठी करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत. तरीदेखील त्यांची दयनीय अवस्था आहे. त्यात आता मेक इन इंडिया महानेट व अन्य कंपन्यांची केबल टाकण्यासाठी पक्के रस्ते खोदून रस्त्याची वाट लावत आहे. ग्रामस्थांच्या सततच्या या तक्रारीस अनुसरून जाधव यांनी शिंदे यांच्या निदर्शनात ही गंभीर बाब आणून देऊन जिल्हा परिषदेस धारेवर धरले आहे. जिल्ह्यातील गावखेड्यांच्या रस्त्यांचे कडे तोडून मोठमोठी चर खोदले जात आहेत. यात आड येणारी झाडे, औषधी वनस्पती, झाडांना चोहोबाजूने बांधलेले काँक्रिटचे कठडे, कुंपण तोडून झाडेझुडुपे नष्ट करून केबल टाकण्यासाठी मोठमोठ्या चाऱ्या रस्त्यांच्या कडेला खोदल्या जात असल्याची गंभीर बाब त्यांनी पालकमंंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. या खोदलेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांत व मातीच्या ढिगाऱ्यांमुळे रस्त्यांवर अपघातासारख्या जीवघेण्या संकटाला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहेत. रस्त्यालगतची झाडे तोडल्याने मोठ्या प्रमाणात धूप होत असल्यामुळे त्याचा ग्रामस्थांवर दूरगामी परिणाम होत आहे.

रस्त्यांच्या मनमानी खोदकामाकडे जि.प.चे दुर्लक्ष१रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी मनमानी पद्धतीने खोदले जात असतानाही या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे.२यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम प्रशासनास आता चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. या मेक इन इंडिया महानेटच्या कामास त्वरित बंद करून रस्ते खोदण्याच्या संकटातून मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांसह जाधव यांनी प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले आहे.३हे खड्डे खोदण्याचे काम वेळीच न थांबवल्यास ग्रामस्थ रस्त्यांवर उतरून त्यांचे रस्ते वाचवण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता लक्ष लागले आहे.