शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शुक्रतारा मंद वारा...! ला झाली ५५ वर्षे! मराठी भावगीतातील पहिल्या युगल गीताचे गारुड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:31 IST

मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त्याचे गारूड आजही कायम आहे.

- नंदकुमार टेणी 

ठाणे : मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त्याचे गारूड आजही कायम आहे. या गीताच्या निर्मितीची कथाही मोठी रंजक आहे.ही गोष्ट १९६२ ची, आकाशवाणी मुंबईवर प्रख्यात संगीतकार यशवंत देव हे भाव सरगम हा कार्यक्रम सादर करायचे. त्याची निर्मितीही तेच करायचे. एक दिवस ते आणि खळे काका संध्याकाळी आकाशवाणीत गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात देव यांनी सहज इंदौर केंद्र लावले. त्यावर एक गायक गात होता. त्यावर खळे म्हणाले, अरे यशवंत, असा आवाज आपण कधी ऐकलाच नाही रे. हा गायक कोण आहे? त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. त्यांनी इंदौर केंद्राला फोन लावला. तेव्हा ए. आर. दाते नावाचा तो नवा गायक असून तो ए क्लास आर्टीस्ट असून सध्या मुंबईत आहे. त्यांचा पत्ता कळवितो, ही माहिती इंदौर केंद्राने दिली.पत्ता मिळाल्यावर खळे आणि देव यांनी आकाशवाणीसाठी भावगीत गाण्याची पाच-सहा कॉन्ट्रॅक्ट पाठविली, पण उत्तर आले नाही. शेवटी एक दिवस खळे हे जाऊन धडकले. पाहता तो रसिकाग्रणी रामू भैय्या दाते साक्षात समोर उभे. खळे सुद्धा मध्य प्रदेशचे. खळेंनी येण्याचे कारण सांगितले. कॉन्ट्रॅक्ट पाठविले तो रामू भैय्याचा मुलगा असल्याचे कळाले. त्याला रामू भैय्यांनी बोलाविले. तुला पाच सहा कॉन्ट्रॅक्ट मुंबई आकाशवाणीने पाठविली तरी उत्तर का दिले नाही? असे विचारले. मी आजवर कधीही मराठी गीत गायलो नाही. हिंदी गीते आणि गझल गाण्याचाच मला अनुभव आहे. मध्य प्रदेशी ढंगाचे मराठी कोणाला आवडत नाही. पुण्या-मुंबईचे लोक त्याची खिल्ली उडवितात, मग मी मराठी भावगीत गाण्याचे धाडस कसे करू?, असे उत्तर त्याने दिले.त्यावर खळे म्हणाले, तुमच्यासाठी माझ्याकडे एक गीत आहे. ते तुम्हीच गायले पाहिजे, अशी माझी इच्छा नव्हे तर जिद्द आहे. हे युगल गीत आहे. ते तुम्ही गायले नाही तर मी ते तसेच ठेवेन. कारण ते तुम्हाला डोळ््यासमोर ठेऊनच पाडगावकरांनी लिहिले आहे. मग रामू भैय्या दातेंनी समजाविल्यावर हा तरूण गायक तयार झाला. सुधा मल्होत्रा व त्याच्या आवाजात हे गीत मुंबई आकाशवाणीत रेकॉर्ड झाले. त्याचे रेकॉर्डिंग यशवंत देव यांनी निर्माता म्हणून स्वत: केले होते. उद्घोषणा मी तयार करते आहे, असे निवेदिका कमालीनी विजयकर यांनी सांगितले.विजयकर म्हणाल्या, सुधा मल्होत्रा हे नाव बरोबर आहे पण गायकाचे नाव ए. आर. दाते, असे आहे. आपण नाव आणि आडनाव असे सांगतो. त्यामुळे ए. आर. दाते असे नाव सांगता येणार नाही. खळे आणि देव यांना गायकाचे नाव माहिती नव्हते. अंदाजानेच ते म्हणाले, त्याला घरात अरू अरू म्हणतात. म्हणजे बहुदा ते अरूण असावे. गाणे प्रसारीत होताना उद्घोषणा ऐकल्यावर दाते उडाले. त्यांना वाटले दुसराच कोणी तरी अरूण दाते आहे. गाणे ऐकल्यावर आपलाच आवाज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी फोन करून देव आणि खळेंना विचारल्यावर पुढच्या वेळी दुरूस्ती करू, असे सांगितले. मात्र शुक्रताराने एवढी प्रचंड लोकप्रियता मिळविली की, दातेंना नाव अरविंद असले तरी अरूणच ठेवावे लागले.सुधा मल्होत्रा गंमतीने म्हणतात की, हे गाणे इतके लोकप्रिय होईल हे मला माहित असते तर मी पाडगावकर, देव व खळे यांना ते युगल गीत न ठेवता एकल गीत करायला लावले असते.- गीताच्या रेकॉर्डिंगवेळी पाडगावकर, खळे, देव यांच्याबरोबरच प्रख्यात गायक केशवराव भोळे उपस्थित होते. त्यांनीही दातेंना शाबासकी दिली. गीताच्या लोकप्रियतेमुळे अवघ्या तीन महिन्यांतच त्याची एच.एम.व्ही.ने ध्वनिमुद्रिका काढली, ते वर्ष १९६३ होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :musicसंगीत