शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रतारा मंद वारा...! ला झाली ५५ वर्षे! मराठी भावगीतातील पहिल्या युगल गीताचे गारुड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:31 IST

मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त्याचे गारूड आजही कायम आहे.

- नंदकुमार टेणी 

ठाणे : मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त्याचे गारूड आजही कायम आहे. या गीताच्या निर्मितीची कथाही मोठी रंजक आहे.ही गोष्ट १९६२ ची, आकाशवाणी मुंबईवर प्रख्यात संगीतकार यशवंत देव हे भाव सरगम हा कार्यक्रम सादर करायचे. त्याची निर्मितीही तेच करायचे. एक दिवस ते आणि खळे काका संध्याकाळी आकाशवाणीत गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात देव यांनी सहज इंदौर केंद्र लावले. त्यावर एक गायक गात होता. त्यावर खळे म्हणाले, अरे यशवंत, असा आवाज आपण कधी ऐकलाच नाही रे. हा गायक कोण आहे? त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. त्यांनी इंदौर केंद्राला फोन लावला. तेव्हा ए. आर. दाते नावाचा तो नवा गायक असून तो ए क्लास आर्टीस्ट असून सध्या मुंबईत आहे. त्यांचा पत्ता कळवितो, ही माहिती इंदौर केंद्राने दिली.पत्ता मिळाल्यावर खळे आणि देव यांनी आकाशवाणीसाठी भावगीत गाण्याची पाच-सहा कॉन्ट्रॅक्ट पाठविली, पण उत्तर आले नाही. शेवटी एक दिवस खळे हे जाऊन धडकले. पाहता तो रसिकाग्रणी रामू भैय्या दाते साक्षात समोर उभे. खळे सुद्धा मध्य प्रदेशचे. खळेंनी येण्याचे कारण सांगितले. कॉन्ट्रॅक्ट पाठविले तो रामू भैय्याचा मुलगा असल्याचे कळाले. त्याला रामू भैय्यांनी बोलाविले. तुला पाच सहा कॉन्ट्रॅक्ट मुंबई आकाशवाणीने पाठविली तरी उत्तर का दिले नाही? असे विचारले. मी आजवर कधीही मराठी गीत गायलो नाही. हिंदी गीते आणि गझल गाण्याचाच मला अनुभव आहे. मध्य प्रदेशी ढंगाचे मराठी कोणाला आवडत नाही. पुण्या-मुंबईचे लोक त्याची खिल्ली उडवितात, मग मी मराठी भावगीत गाण्याचे धाडस कसे करू?, असे उत्तर त्याने दिले.त्यावर खळे म्हणाले, तुमच्यासाठी माझ्याकडे एक गीत आहे. ते तुम्हीच गायले पाहिजे, अशी माझी इच्छा नव्हे तर जिद्द आहे. हे युगल गीत आहे. ते तुम्ही गायले नाही तर मी ते तसेच ठेवेन. कारण ते तुम्हाला डोळ््यासमोर ठेऊनच पाडगावकरांनी लिहिले आहे. मग रामू भैय्या दातेंनी समजाविल्यावर हा तरूण गायक तयार झाला. सुधा मल्होत्रा व त्याच्या आवाजात हे गीत मुंबई आकाशवाणीत रेकॉर्ड झाले. त्याचे रेकॉर्डिंग यशवंत देव यांनी निर्माता म्हणून स्वत: केले होते. उद्घोषणा मी तयार करते आहे, असे निवेदिका कमालीनी विजयकर यांनी सांगितले.विजयकर म्हणाल्या, सुधा मल्होत्रा हे नाव बरोबर आहे पण गायकाचे नाव ए. आर. दाते, असे आहे. आपण नाव आणि आडनाव असे सांगतो. त्यामुळे ए. आर. दाते असे नाव सांगता येणार नाही. खळे आणि देव यांना गायकाचे नाव माहिती नव्हते. अंदाजानेच ते म्हणाले, त्याला घरात अरू अरू म्हणतात. म्हणजे बहुदा ते अरूण असावे. गाणे प्रसारीत होताना उद्घोषणा ऐकल्यावर दाते उडाले. त्यांना वाटले दुसराच कोणी तरी अरूण दाते आहे. गाणे ऐकल्यावर आपलाच आवाज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी फोन करून देव आणि खळेंना विचारल्यावर पुढच्या वेळी दुरूस्ती करू, असे सांगितले. मात्र शुक्रताराने एवढी प्रचंड लोकप्रियता मिळविली की, दातेंना नाव अरविंद असले तरी अरूणच ठेवावे लागले.सुधा मल्होत्रा गंमतीने म्हणतात की, हे गाणे इतके लोकप्रिय होईल हे मला माहित असते तर मी पाडगावकर, देव व खळे यांना ते युगल गीत न ठेवता एकल गीत करायला लावले असते.- गीताच्या रेकॉर्डिंगवेळी पाडगावकर, खळे, देव यांच्याबरोबरच प्रख्यात गायक केशवराव भोळे उपस्थित होते. त्यांनीही दातेंना शाबासकी दिली. गीताच्या लोकप्रियतेमुळे अवघ्या तीन महिन्यांतच त्याची एच.एम.व्ही.ने ध्वनिमुद्रिका काढली, ते वर्ष १९६३ होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :musicसंगीत