शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

कल्याणमध्ये एपीएमसीबाहेरच विकला भाजीपाला; पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:45 IST

चार हजार क्विंटल मालाची आवक, समितीतील खरेदी-विक्रीला बसला फटका

कल्याण : केडीएमसीने केलेले लॉकडाऊन उठताच मंगळवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) खरेदी-विक्री सुरू झाली. मात्र, केडीएमसी व पोलिसांनी कारवाई न केल्याने बाजार समितीच्या आवाराबाहेरच भाजीपाल्याच्या गाड्या उभ्या करून त्याची विक्री झाली. त्याचा फटका बाजार समितीमधील खरेदी-विक्रीला बसला आहे.

लॉकडाऊनमध्येही २४ मार्चपासून एपीएमसी सुरू होती. मात्र, सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने तेथील बाजाराचे केडीएमसी हद्दीत आठ ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले. किरकोळ खरेदी-विक्रीवर बंधने आणत केवळ घाऊक खरेदी-विक्रीला मुभा दिली होती. परंतु, वाढत्या रुग्णांमुळे केडीएमसीने २ ते १९ जुलैपर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन घेतल्याने एपीएमसीही बंद ठेवण्यात आली. मात्र, मंगळवारपासून पहाटे ५ ते सायंकाळी ५ दरम्यान खरेदी-विक्रीला परवानगी दिली गेली आहे.

एपीएमसीमध्ये मंगळवारी पहाटे ५ पासून बाजार समितीच्या आवारात खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. मात्र, त्याआधीच मध्यरात्री १२ वाजल्यापासून नाशिक, अहमदनगर, पुणे येथून भाजीपाल्याच्या गाड्या कल्याण एपीएमसीच्या परिसरात दाखल झाल्या होत्या. पहाटे बाजार सुरू होण्यापूर्वीच या गाड्यांमधील माल संबंधितांनी रस्त्यावरच विकण्यास सुुरुवात केली.

परिणामी गाड्या बाजार समितीच्या आवारात न गेल्याने तेथील खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला फटका बसला. दरम्यान, रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांवर पोलीस व केडीएमसीने कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. तसे झाले तरच एपीएमसीतील व्यवहाराला तेजी प्राप्त होईल, याकडे एपीएमसीचे उपसचिव यशवंत पाटील यांनी लक्ष वेधले.

एपीएमसीचे सचिव श्यामकांत चौधरी म्हणाले की, मंगळवारी पहिल्याच दिवशी विविध ठिकाणांहून शेतमालाच्या ७० गाड्या आल्या होत्या. त्यातून दोन हजार क्विंटल भाजीपाला, एक हजार ३०० क्विंटल कांदा-बटाटा आणि ७०० क्विंटल अन्नधान्याचा माल आला आहे.पहाटे ५ पासून किमान ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. एपीएमसीत एकूण ६०० गाळे असून, त्यापैकी २५० गाळे एक दिवसाआड उघडून व्यवहार करण्यास मुभा दिली आहे.

किरकोळ विक्रेत्यांना दिलासा, श्रावण महिन्यामुळे भाजीपाला महागण्याची शक्यता

कल्याण एपीएमसी सुरू झाल्याने किरकोळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा त्यांना नवी मुंबई एपीएमसीत स्वत:चे वाहन घेऊन जावे लागत होते. वाहतूक खर्च व मालाची विक्री किंमत याचा ताळमेळ घालावा लागत होता. त्यामुळे जुलैमधील लॉकडाऊनच्या काळात केडीएमसी हद्दीत जास्तीच्या दराने भाजी विकली गेली. मंगळवारपासून श्रावण सुरू झाल्याने अनेकांचा भाजीपाला सेवनावर जास्त भर असणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kalyanकल्याण