शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कल्याणमध्ये एपीएमसीबाहेरच विकला भाजीपाला; पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:45 IST

चार हजार क्विंटल मालाची आवक, समितीतील खरेदी-विक्रीला बसला फटका

कल्याण : केडीएमसीने केलेले लॉकडाऊन उठताच मंगळवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) खरेदी-विक्री सुरू झाली. मात्र, केडीएमसी व पोलिसांनी कारवाई न केल्याने बाजार समितीच्या आवाराबाहेरच भाजीपाल्याच्या गाड्या उभ्या करून त्याची विक्री झाली. त्याचा फटका बाजार समितीमधील खरेदी-विक्रीला बसला आहे.

लॉकडाऊनमध्येही २४ मार्चपासून एपीएमसी सुरू होती. मात्र, सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने तेथील बाजाराचे केडीएमसी हद्दीत आठ ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले. किरकोळ खरेदी-विक्रीवर बंधने आणत केवळ घाऊक खरेदी-विक्रीला मुभा दिली होती. परंतु, वाढत्या रुग्णांमुळे केडीएमसीने २ ते १९ जुलैपर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन घेतल्याने एपीएमसीही बंद ठेवण्यात आली. मात्र, मंगळवारपासून पहाटे ५ ते सायंकाळी ५ दरम्यान खरेदी-विक्रीला परवानगी दिली गेली आहे.

एपीएमसीमध्ये मंगळवारी पहाटे ५ पासून बाजार समितीच्या आवारात खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. मात्र, त्याआधीच मध्यरात्री १२ वाजल्यापासून नाशिक, अहमदनगर, पुणे येथून भाजीपाल्याच्या गाड्या कल्याण एपीएमसीच्या परिसरात दाखल झाल्या होत्या. पहाटे बाजार सुरू होण्यापूर्वीच या गाड्यांमधील माल संबंधितांनी रस्त्यावरच विकण्यास सुुरुवात केली.

परिणामी गाड्या बाजार समितीच्या आवारात न गेल्याने तेथील खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला फटका बसला. दरम्यान, रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांवर पोलीस व केडीएमसीने कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. तसे झाले तरच एपीएमसीतील व्यवहाराला तेजी प्राप्त होईल, याकडे एपीएमसीचे उपसचिव यशवंत पाटील यांनी लक्ष वेधले.

एपीएमसीचे सचिव श्यामकांत चौधरी म्हणाले की, मंगळवारी पहिल्याच दिवशी विविध ठिकाणांहून शेतमालाच्या ७० गाड्या आल्या होत्या. त्यातून दोन हजार क्विंटल भाजीपाला, एक हजार ३०० क्विंटल कांदा-बटाटा आणि ७०० क्विंटल अन्नधान्याचा माल आला आहे.पहाटे ५ पासून किमान ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. एपीएमसीत एकूण ६०० गाळे असून, त्यापैकी २५० गाळे एक दिवसाआड उघडून व्यवहार करण्यास मुभा दिली आहे.

किरकोळ विक्रेत्यांना दिलासा, श्रावण महिन्यामुळे भाजीपाला महागण्याची शक्यता

कल्याण एपीएमसी सुरू झाल्याने किरकोळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा त्यांना नवी मुंबई एपीएमसीत स्वत:चे वाहन घेऊन जावे लागत होते. वाहतूक खर्च व मालाची विक्री किंमत याचा ताळमेळ घालावा लागत होता. त्यामुळे जुलैमधील लॉकडाऊनच्या काळात केडीएमसी हद्दीत जास्तीच्या दराने भाजी विकली गेली. मंगळवारपासून श्रावण सुरू झाल्याने अनेकांचा भाजीपाला सेवनावर जास्त भर असणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kalyanकल्याण