शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

काळूनदीतील पाणी आटल्याने भाजीपाला सुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

वासिंद : काळूनदीतील पाणी कमी झाल्याने तसेच ऐन उन्हाळ्यात पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील सोडण्यात येणारे पाणी अद्यापही नदीपात्रात ...

वासिंद : काळूनदीतील पाणी कमी झाल्याने तसेच ऐन उन्हाळ्यात पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील सोडण्यात येणारे पाणी अद्यापही नदीपात्रात न सोडल्याने येथील शेतकऱ्यांचा लागवड केलेला भाजीपाला पाण्याअभावी सुकू लागला असून जनावरांचाही पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यातील पाणी सोडावे अशी मागणी होत आहे.

शहापूर व मुरबाड तालुक्यातील गेगाव नांदवळ, शेळवली, शिंदीपाडा, मानिवली, भादाणे, कोलठण, अल्याणी आदी गावपाड्यांवरील या भागात सध्या मोठ्या प्रमाणात शेकडो एकरात भेंडी, कारली, मिरची, काकडी इतर भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी काळूनदीतील पाण्याचा वापर केला जातो. परंतु सध्या कडाक्याच्या उन्हात नदीतील पाणी कमी झाले आहे. तसेच लागवडीसाठी दरवर्षी या ठिकाणी असलेल्या पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. परंतु यंदा बंधाऱ्यांतील पाणी अद्याप सोडले नसल्यामुळे येथील भाजीपाल्यासाठी पाण्याची कमतरता जाणवत आहे.

याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांचा भाजीपाला व जनावरांचा पाणीप्रश्न लक्षात घेता संबंधित विभागांनी त्वरित बंधाऱ्यातील पाणी सोडावे, अशी मागणी आगरी सेना ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण अंदाडे, सरचिटणीस कृष्णा परटोले, लहू डोंगरे यांनी केली असून अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.