शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

काळूनदीतील पाणी आटल्याने भाजीपाला सुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

वासिंद : काळूनदीतील पाणी कमी झाल्याने तसेच ऐन उन्हाळ्यात पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील सोडण्यात येणारे पाणी अद्यापही नदीपात्रात ...

वासिंद : काळूनदीतील पाणी कमी झाल्याने तसेच ऐन उन्हाळ्यात पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील सोडण्यात येणारे पाणी अद्यापही नदीपात्रात न सोडल्याने येथील शेतकऱ्यांचा लागवड केलेला भाजीपाला पाण्याअभावी सुकू लागला असून जनावरांचाही पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यातील पाणी सोडावे अशी मागणी होत आहे.

शहापूर व मुरबाड तालुक्यातील गेगाव नांदवळ, शेळवली, शिंदीपाडा, मानिवली, भादाणे, कोलठण, अल्याणी आदी गावपाड्यांवरील या भागात सध्या मोठ्या प्रमाणात शेकडो एकरात भेंडी, कारली, मिरची, काकडी इतर भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी काळूनदीतील पाण्याचा वापर केला जातो. परंतु सध्या कडाक्याच्या उन्हात नदीतील पाणी कमी झाले आहे. तसेच लागवडीसाठी दरवर्षी या ठिकाणी असलेल्या पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. परंतु यंदा बंधाऱ्यांतील पाणी अद्याप सोडले नसल्यामुळे येथील भाजीपाल्यासाठी पाण्याची कमतरता जाणवत आहे.

याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांचा भाजीपाला व जनावरांचा पाणीप्रश्न लक्षात घेता संबंधित विभागांनी त्वरित बंधाऱ्यातील पाणी सोडावे, अशी मागणी आगरी सेना ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण अंदाडे, सरचिटणीस कृष्णा परटोले, लहू डोंगरे यांनी केली असून अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.