शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वेदांतमध्ये चार नव्हे, पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 01:02 IST

नातेवाईकांचा आरोप, उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका

ठाणे : वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यू झाल्याचा दावा केला जात असला, तरी यात चार नव्हे, तर पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच विठ्ठल राठोड यांचाही मृत्यूही झाल्याचा आरोप दिलीप राठोड यांनी केला आहे.

वेदांत रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५३ रुग्ण दाखल होते. त्यातीलच अरुण शेलार (५१), वरुणा पासते (६७), दिनेश तानकर (४१) आणि विजय पाटील (५७) या चौघांचाच मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय आणि ठाणे पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, सोमवारी ११.३० वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल राठोड या अन्य एका रुग्णाचाही मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाइकांना सांगण्यात आले. विठ्ठल हे सोमवारी पहाटेपर्यंत चांगले होते. अगदी रविवारीही त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांची ऑक्सिजन पातळीही चांगली होती. मग त्यांचा अचानक मृत्यू कसा झाला, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडल्याचा संशय राठोड यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

आठ तास उलटूनही मृतदेहाची प्रतीक्षा :

या चार जणांचे सकाळी मृत्यू झाल्यानंतर दुपारी ४ पर्यंत नातेवाइकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले नसल्याचीही तक्रार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी हे मृतदेह कोविडचे असल्यामुळे थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेले जातात, परंतु कोणाचीही अडवणूक रुग्णालयाने न करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

महापालिकेकडून सकाळी ऑक्सिजन मिळालेला होता : डॉ. अजय सिंग

ज्या चार जणांचा मृत्यू झाला त्यातील एक  रुग्ण १७ दिवसांपासून ॲडमिट होता. फुप्फुसात इन्फेक्शन अधिक झाल्यानेच त्यांची कॅपिसिटी कमी होऊन त्यांची प्रकृती खालावून या चार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे वेदांत हॉस्पिटलचे रुग्णालय प्रमुख डॉ. अजय सिंग यांनी सांगितले. चाैकशी समितीपुढे आम्ही जे काही पुरावे सादर करायचे आहेत, ते आम्ही सादर करू. महापालिकेकडूनही आम्हाला सकाळी ऑक्सिजन मिळालेला होता, असे त्यांनी सांगितले.

कारवाई मागणी

रात्री माझे नातेवाईक चांगले होते, त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९७ एवढी होती. रात्री ते माझ्याशी बोलले. जेवलेदेखील, असे असताना अचानक रुग्णालय प्रशासनाने तुमच्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर या रुग्णालयात काम करणाऱ्यांनी आम्हाला फोन करून तुमच्या नातेवाइकाचा मृत्यू ऑक्सिजन संपल्यानेच झाल्याचे सांगितले. त्यामुळेच यामध्ये रुग्णालय प्रशासनाची चूक असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या नातेवाइकांनी केली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणे