शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मुसळधार पावसामुळे वासिंद पूर्व-पश्चिम रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

आसनगाव : शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या पूर्व-पश्चिम भागातून जात असलेल्या मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गाच्या ब्रिटिशकालीन पाणीवाहक मार्गिकेमुळे पश्चिमेच्या ...

आसनगाव : शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या पूर्व-पश्चिम भागातून जात असलेल्या मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गाच्या ब्रिटिशकालीन पाणीवाहक मार्गिकेमुळे पश्चिमेच्या सुमारे ४२ गावांना याही पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.

गावांना वासिंद शहराशी जोडण्यासाठी ठेवलेले रेल्वे फाटक काही वर्षांपासून बंद केल्याने लोहमार्गातील नाल्यावर बांधलेल्या पुलाखालून येथील गावांमधील रहिवाशांना ये-जा करावी लागते. ब्रिटिशांनी रेल्वे मार्गाची उभारणी करताना बांधलेला पूल नाल्यातील पाण्याचा निचरा होण्याकामी बांधला होता. पण, छोट्या रेल्वेपुलाखालून प्रवास करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नसल्याने शहापूर आणि कल्याण तालुक्यातील ४२ गावांतील रहिवासी याच पाणी भरलेल्या पुलाखालून कित्येक वर्षे प्रवास करीत आहेत. शनिवारपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुलाखालून तुडुंब पाणी भरून वाहत आहे. त्यामुळे तब्बल ४२ गावांचा संपर्कच तुटल्याचे दिसत आहे. भातसई, शेई, शेरे, अंबर्जे, मढ, हाल, बावघर, मासवणे, आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेहळे, काकडपाडा, पळसोळी, गेरसे, कोसले, फळेगांव, उशिद, रुंदे आणि इतर गावपाड्यांचा यात समावेश असून या लहान पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातूनच दुचाकी व चारचाकी वाहने वाट काढून पुढे जात आहेत. दरम्यान, विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने वासिंदच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते बांधकाम मंत्रालयाने एकूण २५२ मीटर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ३१.५० कोटी रुपये मंजूर करूनन बांधकाम सुरू केले. पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. डिसेंबर २०१९ पर्यंत हा पूल पूर्णत्वास नेण्याचे निर्धारित केले हाेते. मात्र, अद्याप ते पूर्ण न झाल्यामुळे हाल सुरूच आहे.