शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मुसळधार पावसामुळे वासिंद पूर्व-पश्चिम रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

आसनगाव : शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या पूर्व-पश्चिम भागातून जात असलेल्या मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गाच्या ब्रिटिशकालीन पाणीवाहक मार्गिकेमुळे पश्चिमेच्या ...

आसनगाव : शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या पूर्व-पश्चिम भागातून जात असलेल्या मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गाच्या ब्रिटिशकालीन पाणीवाहक मार्गिकेमुळे पश्चिमेच्या सुमारे ४२ गावांना याही पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.

गावांना वासिंद शहराशी जोडण्यासाठी ठेवलेले रेल्वे फाटक काही वर्षांपासून बंद केल्याने लोहमार्गातील नाल्यावर बांधलेल्या पुलाखालून येथील गावांमधील रहिवाशांना ये-जा करावी लागते. ब्रिटिशांनी रेल्वे मार्गाची उभारणी करताना बांधलेला पूल नाल्यातील पाण्याचा निचरा होण्याकामी बांधला होता. पण, छोट्या रेल्वेपुलाखालून प्रवास करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नसल्याने शहापूर आणि कल्याण तालुक्यातील ४२ गावांतील रहिवासी याच पाणी भरलेल्या पुलाखालून कित्येक वर्षे प्रवास करीत आहेत. शनिवारपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुलाखालून तुडुंब पाणी भरून वाहत आहे. त्यामुळे तब्बल ४२ गावांचा संपर्कच तुटल्याचे दिसत आहे. भातसई, शेई, शेरे, अंबर्जे, मढ, हाल, बावघर, मासवणे, आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेहळे, काकडपाडा, पळसोळी, गेरसे, कोसले, फळेगांव, उशिद, रुंदे आणि इतर गावपाड्यांचा यात समावेश असून या लहान पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातूनच दुचाकी व चारचाकी वाहने वाट काढून पुढे जात आहेत. दरम्यान, विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने वासिंदच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते बांधकाम मंत्रालयाने एकूण २५२ मीटर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ३१.५० कोटी रुपये मंजूर करूनन बांधकाम सुरू केले. पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. डिसेंबर २०१९ पर्यंत हा पूल पूर्णत्वास नेण्याचे निर्धारित केले हाेते. मात्र, अद्याप ते पूर्ण न झाल्यामुळे हाल सुरूच आहे.