शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:39 IST

दररोज १० ते १२ बसमध्ये बिघाड : २६ चालकांवर निलंबनाची कारवाई

वसई : महानगरपालिकेची परिवहन सेवा खिळखिळी झाली असून दररोज तिच्या १० ते १२ बस बंद पडत आहेत.भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत ही सेवा चालविण्यात येते. तिच्या दररोज १० ते १२ बसेस नादुरुस्त होत असल्याचे खुद्द परिवहन विभागाच्या व्यवस्थापकांकडूनच सांगण्यात आले. अनेक चालक भरधाव बस चालवत असून परिवहन विभागाने २६ बसचालकांना निलंबित केले आहे तर ३८ जणांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे.

या बस धूर ओकणाऱ्या आणि खिळखिळ्या झाल्या असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. चालक बसेस भरधाव आणि बेदरकारपणे चालवत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

गेल्या सहा वर्षांत परिवहनच्या बसेसना ४४ मोठे अपघात झाले असून त्यात १८ जणांचे बळी गेले, तर २६ जण जखमी झाले. या सेवेत एकूण १४९ बस असून त्यामध्ये ३० महापलिकेच्या तर ११९ भागीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आहेत. दररोज १३८ बस रस्त्यावर धावतात, त्यांच्या एकूण ८०० फेºया होतात. मात्र अनेक बस रस्त्यात बंद पडतात, अशी तक्र ार प्रवाशांनी केली आहे.

या बस धूर ओकणाºया आणि योग्य दर्जाच्या नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. बहुतांश बसचे इंजिन बंद पडत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

बसेसप्रमाणे त्यांचे चालक आणि वाहक हेदेखील सौजन्यशील नाहीत, उद्धटपणे वागणे, बोलणे, प्रवाशांचा पाणउतारा करणे, सुट्टे पैसे न देणे, चिल्लर जवळ न ठेवणे असे प्रकार सतत घडत असतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे.प्रवाशांकडून रोजच तक्रारीवसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्यावतीने व्हॉट्सअप हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. या क्रमांकावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. २० दिवसांत ३२ तक्र ारी व सूचना आल्या आहेत. बस वेळेवर न पोहोचणे, चालकांचे उर्मट वर्तन, भरधाव गाडी चालवणे, बसमधील आसने नीट नसणे, थांब्याच्या पुढे बस थांबवणे अशा अनेक प्रकारच्या तक्र ारी प्रवाशांनी केल्या आहेत.या तक्र ारींचे निवारण नित्य करण्यात येत असते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार