शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:39 IST

दररोज १० ते १२ बसमध्ये बिघाड : २६ चालकांवर निलंबनाची कारवाई

वसई : महानगरपालिकेची परिवहन सेवा खिळखिळी झाली असून दररोज तिच्या १० ते १२ बस बंद पडत आहेत.भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत ही सेवा चालविण्यात येते. तिच्या दररोज १० ते १२ बसेस नादुरुस्त होत असल्याचे खुद्द परिवहन विभागाच्या व्यवस्थापकांकडूनच सांगण्यात आले. अनेक चालक भरधाव बस चालवत असून परिवहन विभागाने २६ बसचालकांना निलंबित केले आहे तर ३८ जणांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे.

या बस धूर ओकणाऱ्या आणि खिळखिळ्या झाल्या असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. चालक बसेस भरधाव आणि बेदरकारपणे चालवत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

गेल्या सहा वर्षांत परिवहनच्या बसेसना ४४ मोठे अपघात झाले असून त्यात १८ जणांचे बळी गेले, तर २६ जण जखमी झाले. या सेवेत एकूण १४९ बस असून त्यामध्ये ३० महापलिकेच्या तर ११९ भागीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आहेत. दररोज १३८ बस रस्त्यावर धावतात, त्यांच्या एकूण ८०० फेºया होतात. मात्र अनेक बस रस्त्यात बंद पडतात, अशी तक्र ार प्रवाशांनी केली आहे.

या बस धूर ओकणाºया आणि योग्य दर्जाच्या नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. बहुतांश बसचे इंजिन बंद पडत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

बसेसप्रमाणे त्यांचे चालक आणि वाहक हेदेखील सौजन्यशील नाहीत, उद्धटपणे वागणे, बोलणे, प्रवाशांचा पाणउतारा करणे, सुट्टे पैसे न देणे, चिल्लर जवळ न ठेवणे असे प्रकार सतत घडत असतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे.प्रवाशांकडून रोजच तक्रारीवसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्यावतीने व्हॉट्सअप हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. या क्रमांकावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. २० दिवसांत ३२ तक्र ारी व सूचना आल्या आहेत. बस वेळेवर न पोहोचणे, चालकांचे उर्मट वर्तन, भरधाव गाडी चालवणे, बसमधील आसने नीट नसणे, थांब्याच्या पुढे बस थांबवणे अशा अनेक प्रकारच्या तक्र ारी प्रवाशांनी केल्या आहेत.या तक्र ारींचे निवारण नित्य करण्यात येत असते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार