शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

वरुणराजाचे पुन्हा दमदार आगमन; ठिकठिकाणी साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:58 IST

वृक्षही कोसळले, रेल्वेसेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल, बळीराजा सुखावला

ठाणे : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. शहरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या असून, धरणसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले.शहरात सायंकाळी चारपर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

रेल्वेगाड्याही उशिरा धावत होत्या. सायंकाळनंतर पाऊस ओसरला होता. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता होती. मात्र मंगळवार रात्रीपासूनच पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. बुधवारी सकाळीसुद्धा जोरदार पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील श्रीरंग विद्यालयाजवळ झाड कोसळले, तर आरटीओ आॅफिस येथेही झाडाचा काही भाग कोसळला. मुंब्रा, खारेगाव, दिव्यासह ठाण्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. टिटवाळा, शहाड, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथेही पावसाचा चांगला जोर होता.

या पावसाने बळीराजा सुखावला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवसभराच्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. ठाणे, कल्याण, कसारा, कर्जत येथील गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर रस्त्यांवर वाहतूककोंडी झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

मागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यात सरासरी १०९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे तालुक्यात सर्वाधिक ८३ मिमी पावसाची तर, सर्वात कमी मुरबाडमध्ये १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये १३ मिमी, कल्याणमध्ये ४.०२ मिमी, भिवंडीत ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात मागील २४ तासात पाऊसच झाला नसल्याची नोंददेखील करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने अजून हवी तशी हजेरी न लावल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी ५० ते ६० टक्क्यांवर गेल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस