शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

वरुणराजाचे पुन्हा दमदार आगमन; ठिकठिकाणी साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:58 IST

वृक्षही कोसळले, रेल्वेसेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल, बळीराजा सुखावला

ठाणे : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. शहरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या असून, धरणसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले.शहरात सायंकाळी चारपर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

रेल्वेगाड्याही उशिरा धावत होत्या. सायंकाळनंतर पाऊस ओसरला होता. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता होती. मात्र मंगळवार रात्रीपासूनच पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. बुधवारी सकाळीसुद्धा जोरदार पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील श्रीरंग विद्यालयाजवळ झाड कोसळले, तर आरटीओ आॅफिस येथेही झाडाचा काही भाग कोसळला. मुंब्रा, खारेगाव, दिव्यासह ठाण्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. टिटवाळा, शहाड, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथेही पावसाचा चांगला जोर होता.

या पावसाने बळीराजा सुखावला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवसभराच्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. ठाणे, कल्याण, कसारा, कर्जत येथील गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर रस्त्यांवर वाहतूककोंडी झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

मागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यात सरासरी १०९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे तालुक्यात सर्वाधिक ८३ मिमी पावसाची तर, सर्वात कमी मुरबाडमध्ये १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये १३ मिमी, कल्याणमध्ये ४.०२ मिमी, भिवंडीत ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात मागील २४ तासात पाऊसच झाला नसल्याची नोंददेखील करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने अजून हवी तशी हजेरी न लावल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी ५० ते ६० टक्क्यांवर गेल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस