शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

उल्हासनगरच्या ७४ व्या वर्धापनदिन निमित्त विविध कार्यक्रम

By सदानंद नाईक | Updated: August 7, 2023 15:55 IST

राज्यात नव्हेतर देशात विविध बाजारपेठामुळे शहराने दबदबा निर्माण केला.

उल्हासनगर : राज्यात नव्हेतर देशात विविध बाजारपेठामुळे शहराने दबदबा निर्माण केला. मात्र शहर स्थापनेला ७४ वर्ष उलटूनही सत्ताधाऱ्यांचा उल्हासनगरचे सिंगापूर करण्याचा दावा फोल ठरला. आजही मूलभूत समस्या कायम असून शहरातून उल्हासही गेल्याची टीका होत आहे. 

फाळणी वेळी पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाज बांधवाना देशाच्या विविध भागात वसविण्यात आले. मात्र सर्वाधिक संख्येने कल्याण येथील ब्रिटिशकालीन छावणीतील बैरेक व खुल्या जागेत निर्वासित बहुसंख्य सिंधी समाजाला वसविण्यात आले. त्यांच्या विकासासाठी तत्कालीन शासनाने आयटीआय, लघु उधोग, धंदे, शिक्षण सुरू केले. निर्वासित छावणीच्या बाजूने उल्हास नदी वाहत असल्याने, नदीच्या नावावरून छावणीला भारताचे पहिले गव्हर्नर सी गोपालाचार्य यांनी उल्हासनगर नाव देण्यात आले.

सिंधी बांधवाने उधोगधंदे व व्यापारात प्रगती करून उल्हासनगरच्या नावाचा दबदबा राज्यात नव्हेतर देशात केला. फर्निचर बाजार, कपड्याचे जपानी व गजानन मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, जीन्स पॅन्ट मार्केट आदी शहरातील मार्केट प्रसिद्ध आहे. स्थानिक नेत्यांनी शहराला सिंगापूर करण्याचे आश्वासन दिले, मात्र शहराचा चेहरा जैसे थे राहिल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.

 शहराच्या ७४ वा वर्धापनदिन साजरा करतांना, आजही नागरिक पाणी, रस्ते, साफसफाई, आरोग्य आदी मूलभूत समस्यासाठी झुंजत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आलेल्या ऐतिहासिक शहर स्थापनेच्या शिलालेखाची पूजा करण्यात येते. मात्र येथील शिलालेख इतरत्र सुरक्षितस्थळी हलविण्याची मागणी वर्षानुवर्षे होत आहे.

वर्धापनदिनाचा कार्यक्रम सोडलातर येथे वर्षभर धिंगाणा सुरू असून हा ऐतिहासिक शिलालेखाचा अपमान होत असल्याची भावना अनेक जण व्यक्त करतात. ७४ वा वर्धापन दिवस साजरा करणाऱ्या शहराला शासनाने विविध सवलती देऊनही, शहरात पाणी टंचाई, अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर, दुरावस्था झालेले रस्ते, आरोग्य सुविधा, साफसफाईचा उडालेला बोजवारा, हक्काचे डम्पिंग ग्राऊंड नाही. खुल्या जागा, आरक्षित भूखंड व शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण आदी प्रकारात वाढ होत आहे. 

वर्धापनदिन विविध कार्यक्रम

 महापालिकेने एतिहासिक शिलालेखाचा परिसर स्वच्छ करून सजावट केली. तसेच मंगळवारी सकाळी ९ वाजता रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय आदीच्यांवतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.