शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या ७४ व्या वर्धापनदिन निमित्त विविध कार्यक्रम

By सदानंद नाईक | Updated: August 7, 2023 15:55 IST

राज्यात नव्हेतर देशात विविध बाजारपेठामुळे शहराने दबदबा निर्माण केला.

उल्हासनगर : राज्यात नव्हेतर देशात विविध बाजारपेठामुळे शहराने दबदबा निर्माण केला. मात्र शहर स्थापनेला ७४ वर्ष उलटूनही सत्ताधाऱ्यांचा उल्हासनगरचे सिंगापूर करण्याचा दावा फोल ठरला. आजही मूलभूत समस्या कायम असून शहरातून उल्हासही गेल्याची टीका होत आहे. 

फाळणी वेळी पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाज बांधवाना देशाच्या विविध भागात वसविण्यात आले. मात्र सर्वाधिक संख्येने कल्याण येथील ब्रिटिशकालीन छावणीतील बैरेक व खुल्या जागेत निर्वासित बहुसंख्य सिंधी समाजाला वसविण्यात आले. त्यांच्या विकासासाठी तत्कालीन शासनाने आयटीआय, लघु उधोग, धंदे, शिक्षण सुरू केले. निर्वासित छावणीच्या बाजूने उल्हास नदी वाहत असल्याने, नदीच्या नावावरून छावणीला भारताचे पहिले गव्हर्नर सी गोपालाचार्य यांनी उल्हासनगर नाव देण्यात आले.

सिंधी बांधवाने उधोगधंदे व व्यापारात प्रगती करून उल्हासनगरच्या नावाचा दबदबा राज्यात नव्हेतर देशात केला. फर्निचर बाजार, कपड्याचे जपानी व गजानन मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, जीन्स पॅन्ट मार्केट आदी शहरातील मार्केट प्रसिद्ध आहे. स्थानिक नेत्यांनी शहराला सिंगापूर करण्याचे आश्वासन दिले, मात्र शहराचा चेहरा जैसे थे राहिल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.

 शहराच्या ७४ वा वर्धापनदिन साजरा करतांना, आजही नागरिक पाणी, रस्ते, साफसफाई, आरोग्य आदी मूलभूत समस्यासाठी झुंजत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आलेल्या ऐतिहासिक शहर स्थापनेच्या शिलालेखाची पूजा करण्यात येते. मात्र येथील शिलालेख इतरत्र सुरक्षितस्थळी हलविण्याची मागणी वर्षानुवर्षे होत आहे.

वर्धापनदिनाचा कार्यक्रम सोडलातर येथे वर्षभर धिंगाणा सुरू असून हा ऐतिहासिक शिलालेखाचा अपमान होत असल्याची भावना अनेक जण व्यक्त करतात. ७४ वा वर्धापन दिवस साजरा करणाऱ्या शहराला शासनाने विविध सवलती देऊनही, शहरात पाणी टंचाई, अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर, दुरावस्था झालेले रस्ते, आरोग्य सुविधा, साफसफाईचा उडालेला बोजवारा, हक्काचे डम्पिंग ग्राऊंड नाही. खुल्या जागा, आरक्षित भूखंड व शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण आदी प्रकारात वाढ होत आहे. 

वर्धापनदिन विविध कार्यक्रम

 महापालिकेने एतिहासिक शिलालेखाचा परिसर स्वच्छ करून सजावट केली. तसेच मंगळवारी सकाळी ९ वाजता रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय आदीच्यांवतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.