शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या ७४ व्या वर्धापनदिन निमित्त विविध कार्यक्रम

By सदानंद नाईक | Updated: August 7, 2023 15:55 IST

राज्यात नव्हेतर देशात विविध बाजारपेठामुळे शहराने दबदबा निर्माण केला.

उल्हासनगर : राज्यात नव्हेतर देशात विविध बाजारपेठामुळे शहराने दबदबा निर्माण केला. मात्र शहर स्थापनेला ७४ वर्ष उलटूनही सत्ताधाऱ्यांचा उल्हासनगरचे सिंगापूर करण्याचा दावा फोल ठरला. आजही मूलभूत समस्या कायम असून शहरातून उल्हासही गेल्याची टीका होत आहे. 

फाळणी वेळी पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाज बांधवाना देशाच्या विविध भागात वसविण्यात आले. मात्र सर्वाधिक संख्येने कल्याण येथील ब्रिटिशकालीन छावणीतील बैरेक व खुल्या जागेत निर्वासित बहुसंख्य सिंधी समाजाला वसविण्यात आले. त्यांच्या विकासासाठी तत्कालीन शासनाने आयटीआय, लघु उधोग, धंदे, शिक्षण सुरू केले. निर्वासित छावणीच्या बाजूने उल्हास नदी वाहत असल्याने, नदीच्या नावावरून छावणीला भारताचे पहिले गव्हर्नर सी गोपालाचार्य यांनी उल्हासनगर नाव देण्यात आले.

सिंधी बांधवाने उधोगधंदे व व्यापारात प्रगती करून उल्हासनगरच्या नावाचा दबदबा राज्यात नव्हेतर देशात केला. फर्निचर बाजार, कपड्याचे जपानी व गजानन मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, जीन्स पॅन्ट मार्केट आदी शहरातील मार्केट प्रसिद्ध आहे. स्थानिक नेत्यांनी शहराला सिंगापूर करण्याचे आश्वासन दिले, मात्र शहराचा चेहरा जैसे थे राहिल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.

 शहराच्या ७४ वा वर्धापनदिन साजरा करतांना, आजही नागरिक पाणी, रस्ते, साफसफाई, आरोग्य आदी मूलभूत समस्यासाठी झुंजत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आलेल्या ऐतिहासिक शहर स्थापनेच्या शिलालेखाची पूजा करण्यात येते. मात्र येथील शिलालेख इतरत्र सुरक्षितस्थळी हलविण्याची मागणी वर्षानुवर्षे होत आहे.

वर्धापनदिनाचा कार्यक्रम सोडलातर येथे वर्षभर धिंगाणा सुरू असून हा ऐतिहासिक शिलालेखाचा अपमान होत असल्याची भावना अनेक जण व्यक्त करतात. ७४ वा वर्धापन दिवस साजरा करणाऱ्या शहराला शासनाने विविध सवलती देऊनही, शहरात पाणी टंचाई, अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर, दुरावस्था झालेले रस्ते, आरोग्य सुविधा, साफसफाईचा उडालेला बोजवारा, हक्काचे डम्पिंग ग्राऊंड नाही. खुल्या जागा, आरक्षित भूखंड व शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण आदी प्रकारात वाढ होत आहे. 

वर्धापनदिन विविध कार्यक्रम

 महापालिकेने एतिहासिक शिलालेखाचा परिसर स्वच्छ करून सजावट केली. तसेच मंगळवारी सकाळी ९ वाजता रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय आदीच्यांवतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.