शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वांगणी-काराव-पाषाणे पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 05:02 IST

कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे. हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाला तडे गेले असून रेलिंगही गायब झाले आहेत. तसेच रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा पूल धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.वांगणी - पाषाणे पूल हा अंबरनाथ तालुक्यात येत असला तरी कर्जत तालुक्यातील कळंब, सालोख, माले, आर्ढे, पाषाणे, खाड्याचा पाडा आदी गावातील नागरिक या पुलावरून प्रवास करतात.उल्हासनदी बारमाही वाहणारी असल्यामुळे आणि पावसाळ्यात इतर नद्या मिळत असल्याने दुथडी भरून वाहत असते. अशा परिस्थितीत अनेक गावांना जोडणारा हा पूल बांधण्यात आला आहे. सध्या त्याची दुरवस्था झाली आहे.पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे हा पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने पुलाचे स्टक्चरल आॅडिट केल्यानंतर हा पूल धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. तसेच अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशा प्रकारचे फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणे