शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वामनदादा हा आभाळा ऐवढा माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

कल्याण : लोककवी वामनदादा कर्डक हा जनसामान्यांचा आवाज होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रछाया त्यांना लाभली होती. त्यामुळे हा ...

कल्याण : लोककवी वामनदादा कर्डक हा जनसामान्यांचा आवाज होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रछाया त्यांना लाभली होती. त्यामुळे हा माणूस आभाळा ऐवढा मोठा होता, असे उद्गार लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष कवी किरण येले यांनी येथे काढले.

कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पु. ल. कट्ट्यातर्फे लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास शनिवारपासून सुरुवात झाली. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झाला. याप्रसंगी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, कवी प्रशांत मोरे, कायद्याने वागा चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री वृषाली विनायक यांनी केले.

येले म्हणाले, मी ही रस्त्यावरचा कवी आहे. वामनदादा हेदेखील रस्त्यावरचे कवी होते. ते खऱ्या अर्थाने लोककवी असल्याने त्यांची जन्मशताब्दी रस्त्यावर भरगच्च कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे नियोजन होते. तेथे नंदीबैलवाले, वैदू, पोतराज, गोंधळी आदींना घेऊन शुभारंभ करायचा होता. परंतु, कोरोना नियमावली आणि पावसामुळे ते शक्य नाही. मात्र, ही जन्मशताब्दी देशभर पोहोचवायची आहे. वर्षभर वामनदादांच्या साहित्याचा जागर चालवायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने जमले नाही, तर ऑनलाइन पद्धतीने १० जिल्ह्यांत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्याला सगळ्यांची साथ हवी आहे.

म्हात्रे म्हणाले, साहित्यातही बुद्धी आणि श्रम, अशी विभागणी आहे. त्यात श्रमाच्या साहित्याला फारसे महत्त्व दिले गेले नसले तरी वामनदादांचे साहित्य हे जनमानसात रुजलेले आहे.

शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर कविसंमेलन रंगले. त्यात कवी संदेश ढगे यांनी ‘बादशहा’ ही कविता सादर केली. वामनदादांसारखे कविता करण्याचे धाडस करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. घरातील विजेचे बिल जरी जास्त आले तरी आपला आवाज निघत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विविध कविता सादर

कवी माधव डोळे म्हणाले, वामनदादा हे थेट बाण मारायचे. त्यांच्यासारखी बाण मारणारी गझल त्यांनी सादर केली. कवी आकाश यांनी प्रेमकविता सादर केली. कवी रमेश आव्हाढ यांनी स्वातंत्र्यावरची कविता सादर केली. तर अरुण म्हात्रे यांनी ‘रानाच्या झाडातून जाते माझ्या माहेराची वाट’ ही हळूवार भावना टिपणारी वामनदादांची कविता सादर करून सगळ्यांची दाद मिळविली.

------------------------