शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

‘काळू’च्या खोऱ्यात अखेर पीकपंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:17 IST

तहसीलदारांकडून दखल : मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

ठाणे : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खरीप पिकांसह शेतजमीन नुकसानीचे पंचनामे होण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यास अनुसरून मुरबाड तालुक्यातील काळू नदी परिसरातील पीकपंचनामे करण्याच्या दृष्टीने ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच या काळू नदीखोºयातील शेतकºयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी प्राधान्याने केल्याबद्दल शेतकºयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

‘पंचनाम्यासाठी शेतकºयांचे तहसीलदारांना साकडे’ या मथळ्याखाली लोकमतने २६ आॅगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध करून शेतकºयांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. याकडे त्वरित लक्ष केंद्रित करून तहसीलदारांनी कृषी विभागामार्फत काळू नदीच्या परिसरातील तळेगाव, खरशेत-उमरोली, जडई, फांगळोशी, दिघेफळ, आंबिवली, चासोळे, खुटल (बा.), न्याहाडी, फांगणे, भोरांडे, उदाळडोह या महसुली गावासह कुंडाचीवाडी, भट्टीचीवाडी, भिकारवाडी, शिरसोनवाडी आणि वाकळवाडी आदी गावांमधील पीक व शेतजमीन पंचनामे हाती घेतले, तर बहुतांशी पंचनामे पूर्ण करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकºयांनी लोकमतचे आभार मानले.

अतिवृष्टीच्यावेळी काळू नदीसह नाल्याचे पाणी बहुतांश शेतात शिरले, तर काही दिवस पीक पाण्याखाली राहिल्यामुळे पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकºयांनी प्रशासनाकडे सतत हेलपाटे घातल्याचे येथील शेतकºयांकडून सांगितले जात आहे. अखेर, पीक व जमीन नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक बनकर मॅडम व वाघ यांनी केल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. यासाठी काळू प्रकल्प संघर्ष समितीचे पदाधिकारी पोपटराव पवार यांच्यासह रंगनाथ देशमुख, दामू ठाकरे, रामचंद्र देशमुख, पोलीस पाटील देशमुख, गुलाब देशमुख, विनोद चौधरी, दीपक देशमुख, नारायण देशमुख आदींनी लोकमतचे आभार मानले. शेती व पीक नुकसान झालेल्यांमध्ये तळेगाव, खरशेत-उमरोली, जडई ,फांगळोशी, दिघेफळ, आंबिवली, चासोळ आदी गावांतील शेतकºयांचा समावेश आहे.२५० हेक्टर शेती बाधितच्मुरबाड तालुक्यातील काळू नदी परिसरातील ३० ते ४० हेक्टर भातपिकासह २५० हेक्टर शेतजमीन बाधित झाल्याचा अंदाज शेतकºयांकडून व्यक्त केला जात आहे.च् सुमारे २६० पेक्षा अधिक शेतकºयांचे नुकसान झालेले असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :thaneठाणे