शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वडवली गाव बुडाले शोकसागरात

By admin | Updated: February 29, 2016 01:54 IST

वडवलीमध्ये अन्वर वरेकर यांच्या घरात एक, दोन नव्हे तर १४ जणांचे खून आणि एकाची आत्महत्या झाल्याचे वृत्त संपूर्ण गावात पसरताच या गावावर एकच सन्नाटा पसरला

जितेंद्र कालेकर,  ठाणेवडवलीमध्ये अन्वर वरेकर यांच्या घरात एक, दोन नव्हे तर १४ जणांचे खून आणि एकाची आत्महत्या झाल्याचे वृत्त संपूर्ण गावात पसरताच या गावावर एकच सन्नाटा पसरला. या हत्याकांडात अगदी दोन आणि चार महिन्यांच्या मुलींसह पाच महिलांचाही समावेश असल्याची माहिती समजताच संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली.अन्वर वरेकर हे कुटुंब शांतताप्रिय, भांडण आणि वादापासून अलिप्त. कोणाच्याही मदतीला धावून जाण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. तर, आपल्या नातेवाईक आणि मित्रांपुढे चांगल्या वागणुकीने एक आदर्श निर्माण करणारा त्यांचा मुलगा हुसनैन याच्याकडूनच हे कृत्य घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात कोपरखैरणे येथील सर्व सात तर ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्वर, हुसनैन यांच्यासह आठ जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन झाले. तीन तास शवविच्छेदन झाल्यानंतर कोपरखैरणे, भिवंडी आणि वडवली येथे हे मृतदेह नेण्यात आले. सर्वात आधी कोपरखैरणे येथे शबिना खान हिच्यासह सात जणांचा तर अरसिया (५ महिने) हिच्यावर भिवंडीतील म्हापोली येथे दफनविधी झाला. त्यानंतर, सायंकाळी ७ वा. नंतर अन्वर वरेकर, हुसनैन वरेकर यांच्यासह सात जणांचा रात्री ८ पर्यंत दफनविधी केला. या काळात या संपूर्ण परिसरात अनेकांच्या घरांमध्ये दुपारचे जेवणही बनविले गेले नव्हते. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना वाढत आहेत. नातेवाइकांची अशी निर्घृणपणे हत्या करणे, हा मोठा गुन्हा आहे आणि त्यानंतर स्वत:चेही जीवन संपवणे, यातून काय साध्य करायचे होते, हे माहीत नाही.- राजेंद्र पगारे, लेखाधिकारी, ठाणेअतिशय थरकाप उडवणारी ही घटना आहे. असे क्रूर कृत्य करायला हात धजावतात तरी कसे? याचे आश्चर्य वाटते. हे कृत्य करणारी व्यक्ती मानसिक दडपणाखाली किंवा रागीट स्वभावाची असावी, असे वाटते. मात्र, खरे कारण समजल्यावर या हत्याकांडाचा उलगडा होईल. या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे.- यशवंत भोसले, ज्येष्ठ नागरिक, ठाणेठाण्यात घडलेले हे हत्याकांड धक्कादायक आहे. या घटनेत थोडक्यात बचावलेल्या जखमी महिलेने आपल्याच भावाने हा प्रकार केल्याचे सांगितले. अद्याप कारण समजले नाही. परंतु, अशा प्रकारे हत्या करणे कितपत योग्य आहे. कौटुंबिक वादातून हे घडले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसे असले तरी यात लहान मुलांचा का जीव घेतला? त्यांचीही दया हे कृत्य करणाऱ्याला आली नसेल का, असा प्रश्न पडतो.- प्रसाद कामते, विद्यार्थी, कळवा एकाच घरातील १४ जणांची हत्या आणि त्यानंतर एक आत्महत्या... या घटनेमागचे कारण काय, हे कळले पाहिजे. मात्र, हे कृत्य करणाऱ्याला माणुसकी असेल, असे वाटत नाही. अक्षरश: लहान बाळांनाही त्याने क्रूरपणे मारले आहे.-रीना राजोळे, गृहिणी, ठाणेकुटुंबामध्ये जर काही वाद असतील, तर ते चर्चेने सोडवले पाहिजेत. कुटुंबातील सदस्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करणे म्हणजे आपणच आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहोत. या कृत्याला कुठेही माफी नाही. -परवेज खान, एनजीओ सदस्यकासारवडवलीत घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. घरातील सगळ्यांची हत्या करण्यामागे नेमके काय कारण होेते, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, इतक्या निर्दयपणे वागणाऱ्या दुष्प्रवृत्ती आजही आपल्या अवतीभोवती आहेत, याचे वाईट वाटते.- अलका सावंत, गृहिणी, ठाणेजन्म दिलेल्या आईवडिलांबरोबरच स्वत:च्या लहान मुलांसह कुटुंबातील इतर लहान मुलांची निर्दयपणे हत्या करणे म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. हे कृत्य जनावरांनाही लाजवणारे आहे.- तबरेज कुरेशी, सामाजसेवक