शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

ठाणे, पालघरसह रायगडमध्ये लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:39 IST

ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा अपुरा पडू लागला आहे. काही ठिकाणचे केंद्र ...

ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा अपुरा पडू लागला आहे. काही ठिकाणचे केंद्र बंद करून काही ठिकाणी त्यांची संख्या कमी केली आहे. ठाण्यात तर विकेन्ड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वास्तविक, ठाणे महापालिकेकडेदेखील अगदी तुरळक लसींचा साठा आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यासह रायगड आणि पालघरसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा अवघा ४१ हजार २०० लसींचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. असे असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागासह काही महापालिकांच्या ठिकाणी लसींचा साठा जवळजवळ संपला आहे.

ठाण्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्यांत सध्या लसींचा अपुरा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यासह या जिल्ह्यांनीदेखील लसींचा साठा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यांतही लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघे एक हजार ८४० डोस शिल्लक आहेत. येथे कोव्हिशिल्डचा साठा शिल्लक नाही, तर रायगड जिल्ह्यातही कोव्हॅक्सिनचे तीन हजार ६८० आणि कोव्हिशिल्डचा १०० लसींचा साठा उपलब्ध आहे. भिवंडीत कोव्हिशिल्डचे ८०० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे २ हजार ६५० आणि कोव्हिशिल्डचे ३० डोस शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे ६ हजार ७२० डोस असून, कोव्हिशिल्डचा साठा संपुष्टात आला आहे, तर मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे ५ हजार ५८० डोस शिल्लक आहेत, नवी मुंबईतही कोव्हॅक्सिनचे पंधरा हजार डोस शिल्लक आहेत, तर उल्हासनगरमध्ये कोव्हिशिल्डचे एक हजार १२० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे येथील अनेक केंद्रे बंद केली आहेत, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसींचा साठा संपल्याने येथील लसीकरणाला आता ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाण्यात दोन दिवस लसीकरण बंद

ठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारी सायंकाळपासून खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. काही रुग्णालयांनी शुक्रवारी केवळ ५० जणांचेच लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट करून तसे फलक लावले होते; तर महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या केंद्रावरदेखील लसीकरण कमी प्रमाणात झाल्याचे दिसत होते, तर काही केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. परंतु, लसींचा साठा मर्यादीत असल्याने अनेकांना घरची वाट धरावी लागली. आता लसींचा तुटवडा जाणवत असतानाच विकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाणे महापालिकेने पुढील दोन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसात साठा उपलब्ध होईल, असा कयास पालिकेमार्फत लावण्यात येत आहे. परंतु तो साठा उपलब्ध झाला नाही, तर मात्र लसीकरण ठप्प होईल, अशी भीतीदेखील प्रशासनाला आहे.