शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ग्रामीण भागात लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा ओलांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेली जनजागृती आणि प्रबोधनामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी सरसावू लागले असून, ग्रामीण भागातील शासकीय आणि खासगी केंद्रांवरील लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा पार केला आहे.

ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. वारंवार मोहिमेला ब्रेक लागले. परंतु जेव्हा जेव्हा लस उपलब्ध होती, तेव्हा लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले. दुसरीकडे, ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेप्रती उदासीनता दिसली. याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या ग्रामीण भागात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेसह प्रबोधनामुळेही ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे सरसावत आहेत. त्यात जानेवारी ते १ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पाच तालुक्यात शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांवर पाच लाखांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठ महिन्यात पाच लाख ४५ हजार ५८४ जणांनी पहिला डोस घेतला असून, एक लाख ७६ हजार ५०० जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

लसीकरणाचे गट - पहिला -डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी - १६२४८ - १२३६२

फ्रंटलाईन वर्कर - ३०४६८ - १९४४१

४५ ते ६० वयोगट - १४९२०५ - ७४१९०

६० वर्षांवरील - ८८४५१ - ५३२६७

१८ ते ४४ वयोगट - २६१२१२ - १७२४०