शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

उत्तनवासीय विजेच्या लपंडावाने त्रस्त; उन्हाळ्यात गरमीनं लोक हैराण

By धीरज परब | Updated: May 24, 2024 18:13 IST

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात, पण कुणाचं बिल राहिलं तर वीज कापतात.

मीरारोड - यंदा उन्हाळा तीव्र असल्याने आधीच उकाड्याने त्रासलेल्या उत्तनवासियांना गेल्या काही दिवसांपासून विजेच्या खेळखंडोबाने आणखी जाच सहन करावा लागत आहे. 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील मच्छीमार , शेतकरी आणि अन्य रहिवाशी हे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने संतप्त आहेत . येथील माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सांगितले कि , गेल्या ४ दिवसां पासून विजेचा लपंडाव सुरु आहे . वीज येते - जाते . त्यातच काल रात्री एका विजेच्या लाल बॉक्स मध्ये स्फोट सारखे जाणवल्याने लोकं घाबरली .  दिवसा तर वीज जात असतेच पण रात्री देखील वीज गुल होत असल्याने लोकांची उकाड्यामुळे झोप उडाली आहे .  

एस्टेलिना तानिया यांनी सांगितले की, दिवसाच्या वेळेत बऱ्याचवेळा वीज गेल्यानंतर अर्धा तास येत नाही . गुरुवारी सायंकाळी वीज गेली ती रात्री साडे दहाच्या सुमारास आली . पुन्हा पावणे बारा वाजता गेली ती मध्यरात्री १ वाजता आली. वीज नसल्याने घरात उकाडा असह्य होतो व झोप मिळत नाही . ज्यांच्या घरात लहान बाळ आहेत त्यांना गरमी मुळे बाळांचे हाल व रडणे सहन होत नाही . 

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात . एखाद्याचे बिल राहिले तर वीज कापतात . पण उत्तन भागातील बहुतांश नागरिक वेळेत वीज बिल भरत असताना सातत्याने विजेचा लपंडाव का सहन करायचा ? वीज गेल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था कंपनीने केली पाहिजे . ह्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोच पण व्यावसायिकांना सुद्धा वीज गेल्याने फटका बसतो असा संताप येथील लोकांनी बोलून दाखवला .