शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनवासीय विजेच्या लपंडावाने त्रस्त; उन्हाळ्यात गरमीनं लोक हैराण

By धीरज परब | Updated: May 24, 2024 18:13 IST

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात, पण कुणाचं बिल राहिलं तर वीज कापतात.

मीरारोड - यंदा उन्हाळा तीव्र असल्याने आधीच उकाड्याने त्रासलेल्या उत्तनवासियांना गेल्या काही दिवसांपासून विजेच्या खेळखंडोबाने आणखी जाच सहन करावा लागत आहे. 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील मच्छीमार , शेतकरी आणि अन्य रहिवाशी हे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने संतप्त आहेत . येथील माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सांगितले कि , गेल्या ४ दिवसां पासून विजेचा लपंडाव सुरु आहे . वीज येते - जाते . त्यातच काल रात्री एका विजेच्या लाल बॉक्स मध्ये स्फोट सारखे जाणवल्याने लोकं घाबरली .  दिवसा तर वीज जात असतेच पण रात्री देखील वीज गुल होत असल्याने लोकांची उकाड्यामुळे झोप उडाली आहे .  

एस्टेलिना तानिया यांनी सांगितले की, दिवसाच्या वेळेत बऱ्याचवेळा वीज गेल्यानंतर अर्धा तास येत नाही . गुरुवारी सायंकाळी वीज गेली ती रात्री साडे दहाच्या सुमारास आली . पुन्हा पावणे बारा वाजता गेली ती मध्यरात्री १ वाजता आली. वीज नसल्याने घरात उकाडा असह्य होतो व झोप मिळत नाही . ज्यांच्या घरात लहान बाळ आहेत त्यांना गरमी मुळे बाळांचे हाल व रडणे सहन होत नाही . 

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात . एखाद्याचे बिल राहिले तर वीज कापतात . पण उत्तन भागातील बहुतांश नागरिक वेळेत वीज बिल भरत असताना सातत्याने विजेचा लपंडाव का सहन करायचा ? वीज गेल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था कंपनीने केली पाहिजे . ह्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोच पण व्यावसायिकांना सुद्धा वीज गेल्याने फटका बसतो असा संताप येथील लोकांनी बोलून दाखवला .