शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उत्तनवासीय विजेच्या लपंडावाने त्रस्त; उन्हाळ्यात गरमीनं लोक हैराण

By धीरज परब | Updated: May 24, 2024 18:13 IST

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात, पण कुणाचं बिल राहिलं तर वीज कापतात.

मीरारोड - यंदा उन्हाळा तीव्र असल्याने आधीच उकाड्याने त्रासलेल्या उत्तनवासियांना गेल्या काही दिवसांपासून विजेच्या खेळखंडोबाने आणखी जाच सहन करावा लागत आहे. 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील मच्छीमार , शेतकरी आणि अन्य रहिवाशी हे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने संतप्त आहेत . येथील माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सांगितले कि , गेल्या ४ दिवसां पासून विजेचा लपंडाव सुरु आहे . वीज येते - जाते . त्यातच काल रात्री एका विजेच्या लाल बॉक्स मध्ये स्फोट सारखे जाणवल्याने लोकं घाबरली .  दिवसा तर वीज जात असतेच पण रात्री देखील वीज गुल होत असल्याने लोकांची उकाड्यामुळे झोप उडाली आहे .  

एस्टेलिना तानिया यांनी सांगितले की, दिवसाच्या वेळेत बऱ्याचवेळा वीज गेल्यानंतर अर्धा तास येत नाही . गुरुवारी सायंकाळी वीज गेली ती रात्री साडे दहाच्या सुमारास आली . पुन्हा पावणे बारा वाजता गेली ती मध्यरात्री १ वाजता आली. वीज नसल्याने घरात उकाडा असह्य होतो व झोप मिळत नाही . ज्यांच्या घरात लहान बाळ आहेत त्यांना गरमी मुळे बाळांचे हाल व रडणे सहन होत नाही . 

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात . एखाद्याचे बिल राहिले तर वीज कापतात . पण उत्तन भागातील बहुतांश नागरिक वेळेत वीज बिल भरत असताना सातत्याने विजेचा लपंडाव का सहन करायचा ? वीज गेल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था कंपनीने केली पाहिजे . ह्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोच पण व्यावसायिकांना सुद्धा वीज गेल्याने फटका बसतो असा संताप येथील लोकांनी बोलून दाखवला .