शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय ऊर्जेसाठी पी पी मॉडेल वापरा

By admin | Updated: November 30, 2015 02:05 IST

अक्षय ऊर्जा वाढविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे नसून यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून अक्षय ऊर्जेचे काम हाती घेणे आवश्यक आहे.

ठाणे : अक्षय ऊर्जा वाढविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे नसून यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून अक्षय ऊर्जेचे काम हाती घेणे आवश्यक आहे. तसेच, नविन ऊर्जेच्या कामासाठी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप हे मॉडेल न वापरता पब्लिक पब्लिक पार्टनरशिप हे मॉडेल वापरल्यास नागरिकांना फायदेशीर ठरेल. अनावश्यक ऊर्जा जी आपल्या घरात वापरली जाते त्या ऊर्जेचा वापर टाळल्यास बचत झालेल्या ऊर्जेचा वापर हा नविन ऊर्जा उपकरणांसाठी वापरता येईल असे मत ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उर्जा तज्ज्ञ डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी नुकत्याच डेगु , द. कोरिया येथे पार पडलेल्या जागतिक सोलार कॉंग्रेसमध्ये व्यक्त केले. ‘जागतिक सौर उर्जा परिषद या जगातील सौर उर्जा क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या पुढाकाराने दर दोन वर्षांनी, या क्षेत्रात काम करणारे संशोधक, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ , अर्थकारणी, सरकारी धोरणे ठरवणारे यांची चर्चा व्हावी, माहितीची आदान प्रदान व्हावी आणि अपारंपारिक उर्जेच्या प्रसाराला गती व प्रेरणा मिळावी यासाठी या परीषदेचे आयोजन करण्यात येते. यंदा नुकतेच पार पडलेल्या या परिषदेत जागतिक सौर शहर पुढाकार (इंटरनॅशनल सोलार सिटी इनिशिएटिव्ह (इस्की)’ या संस्थेचे संचालक सदस्य या नात्याने डॉ. संजय मं . गो . यांना या परिषदेत मांडणी करण्यासाठी विशेष आमंत्रित केले होते. डॉ. संजय यांनी ठाण्यात राबवित असलेल्या अक्षय ऊर्जा अभियानाची माहिती देताना सांगितले की या अभियानाच्या सूचनांचे पालन ज्या सोसायटींनी केले त्या सोसायटींची विजेची बिले ही 20 ते 30 टक्क्यांनी कमी आलेली आहेत. यावर परिषदेत सहभागी मान्यवरांनी हे अभियान केवळ ठाण्यात नव्हे तर सर्वंच शहरांत वापरावे असे सांगितल्यावर डॉ. संजय यांनी हे अभियान नक्कीच इतर शहरांत राबवता येईल पण त्यासाठी लोकसहभाग देखील आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)