शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अक्षय ऊर्जेसाठी पी पी मॉडेल वापरा

By admin | Updated: November 30, 2015 02:05 IST

अक्षय ऊर्जा वाढविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे नसून यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून अक्षय ऊर्जेचे काम हाती घेणे आवश्यक आहे.

ठाणे : अक्षय ऊर्जा वाढविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे नसून यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून अक्षय ऊर्जेचे काम हाती घेणे आवश्यक आहे. तसेच, नविन ऊर्जेच्या कामासाठी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप हे मॉडेल न वापरता पब्लिक पब्लिक पार्टनरशिप हे मॉडेल वापरल्यास नागरिकांना फायदेशीर ठरेल. अनावश्यक ऊर्जा जी आपल्या घरात वापरली जाते त्या ऊर्जेचा वापर टाळल्यास बचत झालेल्या ऊर्जेचा वापर हा नविन ऊर्जा उपकरणांसाठी वापरता येईल असे मत ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उर्जा तज्ज्ञ डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी नुकत्याच डेगु , द. कोरिया येथे पार पडलेल्या जागतिक सोलार कॉंग्रेसमध्ये व्यक्त केले. ‘जागतिक सौर उर्जा परिषद या जगातील सौर उर्जा क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या पुढाकाराने दर दोन वर्षांनी, या क्षेत्रात काम करणारे संशोधक, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ , अर्थकारणी, सरकारी धोरणे ठरवणारे यांची चर्चा व्हावी, माहितीची आदान प्रदान व्हावी आणि अपारंपारिक उर्जेच्या प्रसाराला गती व प्रेरणा मिळावी यासाठी या परीषदेचे आयोजन करण्यात येते. यंदा नुकतेच पार पडलेल्या या परिषदेत जागतिक सौर शहर पुढाकार (इंटरनॅशनल सोलार सिटी इनिशिएटिव्ह (इस्की)’ या संस्थेचे संचालक सदस्य या नात्याने डॉ. संजय मं . गो . यांना या परिषदेत मांडणी करण्यासाठी विशेष आमंत्रित केले होते. डॉ. संजय यांनी ठाण्यात राबवित असलेल्या अक्षय ऊर्जा अभियानाची माहिती देताना सांगितले की या अभियानाच्या सूचनांचे पालन ज्या सोसायटींनी केले त्या सोसायटींची विजेची बिले ही 20 ते 30 टक्क्यांनी कमी आलेली आहेत. यावर परिषदेत सहभागी मान्यवरांनी हे अभियान केवळ ठाण्यात नव्हे तर सर्वंच शहरांत वापरावे असे सांगितल्यावर डॉ. संजय यांनी हे अभियान नक्कीच इतर शहरांत राबवता येईल पण त्यासाठी लोकसहभाग देखील आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)