शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नुसत्या बाता नकोत, ठोस कृती हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:02 IST

केडीएमसीत गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. आमदार आणि खासदारही त्यांचेच आहेत.

कल्याण : केडीएमसीत गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. आमदार आणि खासदारही त्यांचेच आहेत. राज्यात तेच सत्तेत आहे, तरीही आधारवाडी डम्पिंगचा प्रश्न त्यांना सोडविता आलेला नाही. डम्पिंगमुळे जगणे मुश्किल झाले असताना सत्ताधारी, विरोधी पक्षांकडून प्रश्न सोडवण्याच्या केवळ बाता मारल्या जात आहेत. आता बाता नकोत. ठोस कृती हवी, अशा शब्दात शनिवारी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. निमित्त होते कल्याण-डोंबिवली पत्रकारसंघाने ‘डम्पिंग’ या विषयावर आयोजित केलेल्या रोख-ठोक चर्चेचे. येत्या निवडणुकीपूर्वी डम्पिंगचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा सडेतोड इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.डम्पिंग ग्राऊंडला लागणारी आग आणि धुराने होणारी नागरिकांची घुसमट या पार्श्वभूमीवर वाडेघर परिसरातील लक्ष्मी मंगल कार्यालयात ‘धगधगते डम्पिंग ग्राऊंड आणि धुमसते कल्याण’ या विषयावर चर्चा पार पडली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश पेणकर, मनसेचे नगरसेवक पवन भोसले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते सचिन पोटे आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक-गटनेते वरूण पाटील उपस्थित होते. मात्र आमंत्रण देऊनही पालिका प्रशासनाकडून एकही प्रतिनिधी या कार्यक्रमाला आला नाही. त्यामुळे व्यासपीठावरील त्यांची खुर्ची तशीच रिकामी ठेवण्यात आली. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.आधारवाडी डम्पिंग बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. पण आतापर्यंत डम्पिंगवर मोठ्या प्रमाणात गोळा झालेला कचरा काढण्यासाठी किमान सात वर्षे लागतील. त्यामुळे येथे नव्याने कचरा टाकणे बंद झाले पाहिजे. अनेक सोसायट्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रयोग करीत आहेत. तशीच कृती प्रत्येकाकडून आवश्यक आहे. त्यामुळे कचरा डम्पिंगवर येणार नाही, असे प्रकाश पेणकर म्हणाले.डम्पिंगचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. हा प्रश्न खूप जुना आहे. येथे रोज ७०० टनांच्या आसपास कचरा टाकला जातो. डम्पिंगची क्षमता केव्हाच संपलेली आहे. डम्पिंग बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण केडीएमसीकडून पळवाटा शोधल्या जात आहेत. पर्यायी डम्पिंग का सुरू केले जात नाही? याबाबत प्रशासन तोडगा का काढू शकत नाही? डम्पिंग ग्राऊंड हलविण्यासाठी जो विरोध होतो, त्याबाबत जनसुनावणी झालेली आहे. तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडून मिळाल्यानंतर पर्यावरण विभागाची परवानगी मिळवावी लागेल. ती मिळताच नवीन डम्पिंग सुरू करण्यात येईल, असे भाजपाचे वरूण पाटील म्हणाले. यावर डम्पिंगच्या अवस्थेला सर्वतोपरी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप सचिन पोटे यांनी केला.आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी १५ वर्षापूर्वीच उंबर्डे येथे ३५ एकर जागा संपादित केली आहे. पण तेथील स्थानिक शिवसेना नगरसेवकाचा विरोध असल्याने आजवर तेथे डम्पिंगचे स्थलांतर होऊ शकलेले नाही. त्या जागेचा टीडीआर घेतला गेला आहे. तरीही विरोध केला जात आहे ते योग्य नाही. उंबर्डे परिसरात अनेक गृहनिर्माण प्रकल्प सुरू असल्याने डम्पिंगला विरोध होत असल्याकडे पोटे यांनी लक्ष वेधले.मनसेचे पवन भोसले यांनीही सत्ताधारी शिवसेना-भाजपावर झोड उठविताना सत्ताधाºयांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप केला. मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्या प्रयत्नाने एका संस्थेने कचºयावर मोफत प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली होती. पण यातून सत्ताधाºयांना टक्केवारी मिळणार नसल्याने कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सत्ताधाºयांकडून डम्पिंगच्या मुद्द्यावर कसल्या अपेक्षा करता? उच्च न्यायालयाने डम्पिंगप्रश्नी पालिका क्षेत्रात बांधकामबंदी केली, तरी ठोस कृती झाली नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका