शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

पुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 20:27 IST

येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही

ठळक मुद्देशासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडलेघराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणीपुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धार

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेतावली येथील १३ कातकरी कुटुंबियांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने येथील ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मोर्चा काढून धरणे आंदोलन सुरू केले. घराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणी करून पुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.       येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या या मोर्चेकरांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बिºहाड मांडून बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावर प्रशासन काय निर्णया घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.       नेतावली येथील कातकरी समाजाच्या १३ आदिवासी कुटुंबियांचा हा बि-हाड मोर्चाचे आता बेमुदत बिºहाडासह धरणे आंदोलनात रूपांतर झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत तरी श्रमजीवींचे हे धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलकांकडून आदिवासी माणूस ढोर नाय ... माणूस हाय ... माणूस हाय, माणूसकीची भीक नको... हक्क हवा... हक्क हवा, या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुली पेटवून अन्न शिजवण्याची तयारी देखील या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

      बेघर झालेल्या या अदिवासी कातकरी कुटुंबांचे तत्काळ पुर्नवसन करा, कातकरी उत्थान अभियानातंर्गत कुळ कायदा १९४८ चे कलम १६ व १७ प्रमाणे घराखालील जागा त्यांच्या नावे करावी, बेघर केलेल्या आदिवासींना तात्पुरती निवासाची व्यवस्था करा, विकासक व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे आदी मागण्या यावेळी आंदोलकांकडून निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. यावेळी या कुटुंबाचा प्रश्न सोडविण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यास २६ जानेवारी या प्रजास्ताक दिनी १३ कुटुंबिये या श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करणार असल्याची भोईर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी