शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 20:27 IST

येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही

ठळक मुद्देशासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडलेघराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणीपुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धार

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेतावली येथील १३ कातकरी कुटुंबियांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने येथील ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मोर्चा काढून धरणे आंदोलन सुरू केले. घराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणी करून पुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.       येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या या मोर्चेकरांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बिºहाड मांडून बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावर प्रशासन काय निर्णया घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.       नेतावली येथील कातकरी समाजाच्या १३ आदिवासी कुटुंबियांचा हा बि-हाड मोर्चाचे आता बेमुदत बिºहाडासह धरणे आंदोलनात रूपांतर झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत तरी श्रमजीवींचे हे धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलकांकडून आदिवासी माणूस ढोर नाय ... माणूस हाय ... माणूस हाय, माणूसकीची भीक नको... हक्क हवा... हक्क हवा, या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुली पेटवून अन्न शिजवण्याची तयारी देखील या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

      बेघर झालेल्या या अदिवासी कातकरी कुटुंबांचे तत्काळ पुर्नवसन करा, कातकरी उत्थान अभियानातंर्गत कुळ कायदा १९४८ चे कलम १६ व १७ प्रमाणे घराखालील जागा त्यांच्या नावे करावी, बेघर केलेल्या आदिवासींना तात्पुरती निवासाची व्यवस्था करा, विकासक व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे आदी मागण्या यावेळी आंदोलकांकडून निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. यावेळी या कुटुंबाचा प्रश्न सोडविण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यास २६ जानेवारी या प्रजास्ताक दिनी १३ कुटुंबिये या श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करणार असल्याची भोईर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी