शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणजवळील पठार पाड्यातील दुर्लक्षित आदिवासी असुरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

By सुरेश लोखंडे | Updated: November 30, 2017 18:23 IST

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय   महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते.

ठळक मुद्देउल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे गंभीर आजारी व्यक्ती, गरोदर महिला, सर्पदंशाचे बळींना या युगातही झोळीत टाकून रूग्णालयात उपचारा करीता न्यावे लागत आहेगावाच्या दोन दिशांना दगड खाणी आहेत. रोज संध्याकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान दगडखणीतील स्फोटांमुळे वस्ती हादरते, घरांना भेगा पडताहेत.

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कल्याणपासून अगदी जवळ असलेल्या पठारपाडा ही आदिवासी लोकवस्ती स्वातंत्र्योत्तर काळात अद्यापही विविध सोयी सुविधांसह सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. याकडे सामाजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकायांचे लक्ष वेधले आहेत. त्यांच्या अपेक्षित व सकारात्मक निर्णयाकडे उपेक्षित आदिवासींचे लक्ष लागून आहे.जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय   महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते. या पठाराच्या भूखंडावर उल्हासनगरची झोपडपट्टी व म्हारळगाव लगतच्या दगडखाणींनी पोखरला आहे. पठारावरील माळरानावर असलेल्या या गावातील आदिवासींचा खाणीच्या स्फोटातील दगडापासून बचावल्यामुळे रोजच पुनर्जन्म अनुभवायला मिळत आहे. पर्यावरणाचा -हास होतो... याचा विचार करण्या आधी रहिवाशी मरण यातना भागताहेत त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची अपेक्षा श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी  भेट देऊस ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना आॅनलाइन साकडे घातले आहे.सुमारे तीन वर्षापूर्वी लोकमतने देखील याकडे म्हारळगाव प्रशासनाचे लक्ष वेधून त्यांच्या पाण्याची समस्या दूर केली होती. गाव तेथे रस्ता म्हणणाऱ्यां प्रशासनाकडून या गावात जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची सुविधा केलेले नाही. या गावात जाण्यासाठी दोन्ही बाजुनी असलेल्या दगडखाणीच्या कडेकडेने पाऊल वाटेव्दारे या गावाकडे जाणे शक्य होते. अतिशय खडतर व निर्मणुष्य डोंगर टेकड्यातून या आदिवासी गावात जावे लागते. महापालिकां दोन नगार परिषदांच्याजवळ असलेल्या या गावपाड्यातील दयनीय अवस्था अतिशय दु:ख व वेधनादायक धक्के देणारी आहे.गावात जायला पक्का गाडीरस्ता रस्ता नाही . गंभीर आजारी व्यक्ती, गरोदर महिला, सर्पदंशाचे बळींना या युगातही झोळीत टाकून रूग्णालयात उपचारा करीता न्यावे लागत आहे. यामुळे बरेचदा बाळंतपण घरीच होते. प्रसंगी उपचारा अभावी रु ग्ण दगावल्याचे धक्कादायक अनुभव येथील गावकऱ्यांकडून सांगितले जात आहेत. गावाच्या दोन दिशांना दगड खाणी आहेत. रोज संध्याकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान दगडखणीतील स्फोटांमुळे वस्ती हादरते, घरांना भेगा पडताहेत. लहान बालके भेदरतात. वस्तीमध्ये खाणीतील दगड पडतात. गावात ४ थीपर्यंत शाळा आहे. त्यानंतर मुलांना याच धोकादायक पायरस्त्याने गोवेली,कंबा येथे शाळेत जावे लागते. संध्याकाळच्या स्फोटात रस्त्यावरही दगड येतात. त्यामुळे कित्येक मुले घाबरून शाळेत जात नाहीत.गावात सहा वयोगटापर्यंतचे सुमारे २२ बालके आहेत. पण अंगणवाडी नसल्यामुळे पूरक आहारापासून बालके वंचित आहेत. बालकांचे वजने घेतली जात नाहीत. या गावाला भेट दिली असता तुळपुळे यांनी किमान पाच बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळून आले आहेत. सुमारे पाच ते सहा पिढ्यापासून असलेल्या या गावाला गावठाण नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ७ / १२ च्या उताऱ्यांवरून ही वस्ती सरकारी जागेवर असल्याचे दिसून येत आहे . गावास लागून असलेल्या जमिनीवर आदिवासी कुटुंबे शेती करीत आहेत. त्यांनी पीकपहाणीसाठी वेळोवेळी अर्जही केलेले आहेत. पण नोंदी केलेल्या नाहीत. आदी विविध तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून त्यांची दलख घेण्यासाठी पाटपुरावा केला जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcollectorतहसीलदार