शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

कल्याणजवळील पठार पाड्यातील दुर्लक्षित आदिवासी असुरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

By सुरेश लोखंडे | Updated: November 30, 2017 18:23 IST

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय   महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते.

ठळक मुद्देउल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे गंभीर आजारी व्यक्ती, गरोदर महिला, सर्पदंशाचे बळींना या युगातही झोळीत टाकून रूग्णालयात उपचारा करीता न्यावे लागत आहेगावाच्या दोन दिशांना दगड खाणी आहेत. रोज संध्याकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान दगडखणीतील स्फोटांमुळे वस्ती हादरते, घरांना भेगा पडताहेत.

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कल्याणपासून अगदी जवळ असलेल्या पठारपाडा ही आदिवासी लोकवस्ती स्वातंत्र्योत्तर काळात अद्यापही विविध सोयी सुविधांसह सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. याकडे सामाजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकायांचे लक्ष वेधले आहेत. त्यांच्या अपेक्षित व सकारात्मक निर्णयाकडे उपेक्षित आदिवासींचे लक्ष लागून आहे.जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय   महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते. या पठाराच्या भूखंडावर उल्हासनगरची झोपडपट्टी व म्हारळगाव लगतच्या दगडखाणींनी पोखरला आहे. पठारावरील माळरानावर असलेल्या या गावातील आदिवासींचा खाणीच्या स्फोटातील दगडापासून बचावल्यामुळे रोजच पुनर्जन्म अनुभवायला मिळत आहे. पर्यावरणाचा -हास होतो... याचा विचार करण्या आधी रहिवाशी मरण यातना भागताहेत त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची अपेक्षा श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी  भेट देऊस ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना आॅनलाइन साकडे घातले आहे.सुमारे तीन वर्षापूर्वी लोकमतने देखील याकडे म्हारळगाव प्रशासनाचे लक्ष वेधून त्यांच्या पाण्याची समस्या दूर केली होती. गाव तेथे रस्ता म्हणणाऱ्यां प्रशासनाकडून या गावात जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची सुविधा केलेले नाही. या गावात जाण्यासाठी दोन्ही बाजुनी असलेल्या दगडखाणीच्या कडेकडेने पाऊल वाटेव्दारे या गावाकडे जाणे शक्य होते. अतिशय खडतर व निर्मणुष्य डोंगर टेकड्यातून या आदिवासी गावात जावे लागते. महापालिकां दोन नगार परिषदांच्याजवळ असलेल्या या गावपाड्यातील दयनीय अवस्था अतिशय दु:ख व वेधनादायक धक्के देणारी आहे.गावात जायला पक्का गाडीरस्ता रस्ता नाही . गंभीर आजारी व्यक्ती, गरोदर महिला, सर्पदंशाचे बळींना या युगातही झोळीत टाकून रूग्णालयात उपचारा करीता न्यावे लागत आहे. यामुळे बरेचदा बाळंतपण घरीच होते. प्रसंगी उपचारा अभावी रु ग्ण दगावल्याचे धक्कादायक अनुभव येथील गावकऱ्यांकडून सांगितले जात आहेत. गावाच्या दोन दिशांना दगड खाणी आहेत. रोज संध्याकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान दगडखणीतील स्फोटांमुळे वस्ती हादरते, घरांना भेगा पडताहेत. लहान बालके भेदरतात. वस्तीमध्ये खाणीतील दगड पडतात. गावात ४ थीपर्यंत शाळा आहे. त्यानंतर मुलांना याच धोकादायक पायरस्त्याने गोवेली,कंबा येथे शाळेत जावे लागते. संध्याकाळच्या स्फोटात रस्त्यावरही दगड येतात. त्यामुळे कित्येक मुले घाबरून शाळेत जात नाहीत.गावात सहा वयोगटापर्यंतचे सुमारे २२ बालके आहेत. पण अंगणवाडी नसल्यामुळे पूरक आहारापासून बालके वंचित आहेत. बालकांचे वजने घेतली जात नाहीत. या गावाला भेट दिली असता तुळपुळे यांनी किमान पाच बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळून आले आहेत. सुमारे पाच ते सहा पिढ्यापासून असलेल्या या गावाला गावठाण नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ७ / १२ च्या उताऱ्यांवरून ही वस्ती सरकारी जागेवर असल्याचे दिसून येत आहे . गावास लागून असलेल्या जमिनीवर आदिवासी कुटुंबे शेती करीत आहेत. त्यांनी पीकपहाणीसाठी वेळोवेळी अर्जही केलेले आहेत. पण नोंदी केलेल्या नाहीत. आदी विविध तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून त्यांची दलख घेण्यासाठी पाटपुरावा केला जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcollectorतहसीलदार