शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

उल्हासनगरमध्ये युतीला पर्याय नाही

By admin | Updated: February 24, 2017 05:04 IST

उल्हासनगरमध्ये कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता स्थापन

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता स्थापन करायची, या ईर्षेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या भाजपाला या ‘परकीय’ शक्तीचा फायदा झाला, पण स्वबळावर सत्तेचे स्वप्न भंगले. ज्या पप्पू कलानी यांच्याशी संबंधावरून राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा शब्द भाजपाने एकेकाळी राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला, त्याच कलानी यांच्या मुलाला पक्षात प्रवेश दिल्याने भाजपाच्या नेत्यांची इतकी कोंडी झाली, की स्वबळाच्या सत्तेसाठी केल्या जाणाऱ्या प्रचाराला पक्षाचा एकही नेता फिरकला नाही. शिवसेनेने भाजपाच्या राजकारणाला तोडीस तोड उत्तर देत केलेला प्रचार हे या वेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. भाजपा आणि ओमी टीमचे ३३ तर शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले. साई पक्षाने सिंधी परिसरात भाजपाला टक्कर देत ११ जागी विजय मिळविला. बहुतांश नगरसेवक मागल्या दाराने भाजपामध्ये गेल्याच्या धक्क्यातून राष्ट्र्वादी सावरू शकली नाही. तो पक्ष ४ जागांवर स्थिरावला. मनसे या शहरात एकही जागा मिळवू शकली नाही. उल्हासनगरपक्षजागाभाजपा३३शिवसेना२५काँग्रेस०१राष्ट्रवादी०४इतर१५