शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आॅनलाइन दत्तक गेलेल्या मुलांची ‘अनाथालयवापसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:42 IST

केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी हटवादीपणा करून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी अमलात आणल्याने पालकांचे समुपदेशन योग्य पद्धतीने न झाल्याने दत्तक घेतलेली मुले अनाथालयांकडे परत येण्याचे प्रमाण वाढले आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी हटवादीपणा करून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी अमलात आणल्याने पालकांचे समुपदेशन योग्य पद्धतीने न झाल्याने दत्तक घेतलेली मुले अनाथालयांकडे परत येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोंबिवलीत गेली २५ वर्षे अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या जननी आशीष संस्थेच्या संचालकांनी हा धक्कादायक अनुभव कथन केला.२०१५ पासून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याची पद्धत गांधी यांनी सुरू केली. या पद्धतीमुळे पालकांचे समुपदेशन होत नाही. यामुळे दत्तक दिलेली मुले नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. पालक देशातील कोणत्याही संस्थेतील बालक दत्तक घेतात. या पालकांचे समुपदेशन होत नसल्याने दत्तक दिलेले मूल नाकारले जाते. मूल दत्तक देण्याचा मजबूत पाया समुपदेशन असल्याने व तेच योग्य पद्धतीने होत नाही. पालकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मध्येच ते मूल परत संस्थेत पाठवले जाते. अशा घटना वाढत असल्याची खंत संस्थेच्या समुपदेशक जयश्री देशपांडे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली.आॅफलाइन पद्धतीने मुले दत्तक घेण्याचा काही मार्ग आहे का, अशी विचारणा पालकांकडून केली जाते. मात्र, वेटिंग लिस्ट पाहिल्यावर मुले दत्तक घेण्याच्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे मुले आॅफलाइन पद्धतीने पालकांपर्यंत पोहोचत असण्याची दाट शक्यता आहे. हे शोधून काढण्याचे काम यंत्रणेचे आहे, असे त्या म्हणाल्या.जिमखान्यासमोरच गेली २५ वर्षे अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम जननी आशीष संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. संस्थेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. २५ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने ४६५ बालकांचे पुनर्वसन केले. डॉ. कीर्तिदा प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था स्थापन झाली. संस्थेला ० ते ६ या वयोगटांतील २५ बालकांचे संगोपन करण्याची परवानगी असली, तरी सध्या ५० बालके संस्थेत आहेत. कुमारी मातांनी बाळ संस्थेत सोडल्यानंतर ६० दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत बालकल्याण समितीच्या परवानगीने ते मूल परत नेता येते. मात्र, अशा बालकांना चांगल्या ठिकाणी देण्याचे आमिष दाखवून मुले विक्रीचे प्रमाण वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अपंग, मतिमंद, अंध बालकांचे पुनर्वसन हा मोठा प्रश्न आहे. अशा मुलांसाठी काम करणाºया स्वतंत्र संस्था असूनही त्यांना तेथे पाठवले जाते. सध्या बोल्ड झाल्याने कुमारी माता मुलांची जबाबदारी स्वीकारत आहेत. बाळ अनाथाश्रमात सोडले जाते व पुन्हा परत नेले जाते.पहिली दत्तक मुलगी रमली संसारातसंस्था चालवताना गेल्या २५ वर्षांत अनेक चांगलेवाईट अनुभव आले आहेत. सरकारने आम्हाला कायमस्वरूपी विनाअनुदानित या तत्त्वावर संस्था चालवायला परवानगी दिली असल्याने अनुदान मिळत नाही. त्यामुळे मुलांचा वैद्यकीय खर्च आणि शिक्षण ही आमच्यापुढे मोठी आव्हाने आहेत. बाळ कमी वजनाचे असणे, अचानक येणारे आजारपण यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. नर्सरी ते सीनिअर केजीपर्यंतचे शिक्षण मुलांना संस्थेत शिक्षक ठेवून देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. संस्थेतून दत्तक गेलेल्या पहिल्या मुलीचे आज लग्न होऊन ती संसारात रमली आहे. ही खूप आनंदाची बाब आहे.दत्तक प्रक्रियेत बदल गरजेचा - श्रीकांत शिंदेमुले दत्तक घेण्याची प्रक्रिया चार वर्षांपासून आॅनलाइन केल्याने मूल दत्तक घेतलेल्या पालकांची योग्य प्रकारे माहिती होत नाही. परिणामी, पालक व मुले यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याने काही मुले संस्थेत येऊ लागली आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून मूल दत्तक देण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार असल्याचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.‘जननी आशीष’ च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, २५ वर्षांपूर्वी २१ महिलांनी ही संस्था सुरू करण्याचे धाडस केले. समाजाचे देणे लागतो, असे केवळ न बोलता त्यांनी अनाथ मुलांचे संगोपन केले. ४६० मुलांना पालक दिले.चार वर्षांपूर्वी नवा कायदा आला व मुले आॅनलाइन पद्धतीमुळे देशात कोठेही दत्तक जाऊ लागली. पूर्वी मूल दत्तक घेताना पालकांची चौकशी होत होती. त्यांच्याशी चर्चा होत होती. आॅनलाइन पद्धतीमुळे ती बंद झाली. काही दिवसांत पुन्हा संस्थेत येऊ लागली आहेत. त्यामुळे कायद्यात बदल करण्यावर त्यांनी भर दिला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली